शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-मीटर’च्या दोऱ्या आता वजन-मापे विभागाच्या हाती

By admin | Updated: June 28, 2015 23:15 IST

रिक्षाचालकांचा विरोध : शुल्कामध्ये वाढ; पासिंग थांबले

सचिन लाड -सांगली --रिक्षातील ‘ई-मीटर’ची तपासणी आता वजन-मापे विभागाकडे सोपविण्यात आली आहे. रिक्षा पासिंगला नेण्यापूर्वी चालकांना वजन-मापे विभागात मीटरची तपासणी करून त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेऊनच पुढे जावे लागत आहे. पण वजन-मापे विभागाने आठवड्यातून केवळ दोनचवेळा तपासणीसाठी वेळ दिली आहे. तसेच यासाठी २१० रुपये शुल्क आकारले जात आहे. मीटर तपासणीच्या नावाखाली जवळपास तीनशे रुपये मोजावे लागत असल्याने रिक्षा चालकांचा यास विरोध केला आहे.आरटीओ कार्यालयाकडून वर्षातून एकवेळ रिक्षाचा ‘फिटनेस’ (पासिंग) तपासणी केली जाते. यासाठी चालकांना रिक्षा सुसज्ज करुन न्यावी लागते. दोन वर्षापूर्वी रिक्षात ‘ई-मीटर’ बसविण्यात आले. मीटर सुरू आहे का नाही, याची तपासणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) कार्यालयाकडे होत होती. यासाठी ते ५० रुपये शुल्क आकारत होते. पासिंगला जाण्यापूर्वी चालक आयटीआयमध्ये रिक्षा नेत होते. तिथे मीटरची तपासणी करून त्याचे एक किलोमीटर अंतरापर्यंत रिडिंग पडते का, याची पाहणी केली जायची. त्यानंतर ते मीटर सुसज्ज आहे, असे प्रमाणपत्र द्यायचे. मात्र शासनाने ५ जूनपासून मीटर तपासणीची जबाबदारी वजन-मापे विभागाकडे सोपविली आहे. या विभागाने पंधरा दिवस मीटरची तपासणी करण्यास टाळाटाळ केली. यामुळे एकही रिक्षा पासिंगला गेली नाही. चालकांनी आरटीओ दशरथ वाघुले यांच्याकडे तक्रार केली. वाघुले यांनी या विभागाकडे विचारणा केल्यानंतर, १६ जूनपासून त्यांनी तपासणी सुरू केली आहे.वजन-मापेकडून शंभर फुटी रस्त्यावर मीटर तपासले जात आहे. पण त्यांनी आठवड्यातून बुधवार आणि गुरुवार या दोनचदिवशी तपासणी केली जाईल, असे जाहीर केल्याने चालकांची तेथे मोठी गर्दी होत आहे. तपासणीला ते २१० रुपये शुल्क आकारत आहेत. रिक्षात बसून ते एक किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन येतात. या अंतरानुसार मीटरचे रिडिंग पडते का नाही, हे पाहून प्रमाणपत्र देत आहेत. तत्पूर्वी चालकांना मीटर सुस्थितीत आहे का नाही, याची बाहेरून तपासणी करुन घ्यावी लागत आहे. त्यासाठी पुन्हा त्यांना शंभर रुपये मोजावे लागत आहेत. चालकांना केवळ मीटर तपासणीला तीनशे रुपये द्यावे लागत आहेत. याशिवाय आठवड्यातून दोनच दिवस तपासणी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. परिणामी पासिंगची मुदत संपल्यास आरटीओ कार्यालय त्यांच्याकडून दररोज २० रुपये दंड आकारत आहे. रिक्षाचालकांना दणकारिक्षाचालकांनी सुरुवातीपासून राज्यस्तरावरून ‘ई-मीटर’ला विरोध केला आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील रिक्षाचालकांनीही उडी घेतली होती. अनेक रिक्षात आजही ई-मीटर नाही. अनेकदा सांगूनही ते बसविले नाही. चालकांनी ते बसावावे, त्याशिवाय रिक्षा पासिंग केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. त्यानुसार चालक ते बसवित आहेत; पण नुसते मीटर बसवून चालणार नाही, तर ते सुस्थितीत आहे का नाही, याची तपासणी करुन त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचाही शासनाने घाट घातला.ई-मीटरची ही तपासणी रिक्षाचालकांचा खिसा कापणारी आहे. सातत्याने कोणत्या ना कोणत्या शुल्कामध्ये वाढ करून रिक्षाचालकांचे कंबरडे मोडण्याचा डाव आखला जात आहे. आरटीओंनी वजन-मापे विभागाकडून ही तपासणी बंद करुन पूर्वीप्रमाणे आयटीआयकडे सोपवावी; अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.- महादेव पवार, जिल्हाध्यक्ष, रिक्षा संघटना.