शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

अर्थकारणाचे राजकारण केल्याने शेती अडचणीत

By admin | Updated: August 29, 2015 00:21 IST

जयंत पाटील : जे. एफ. पाटील लिखित ‘भारतीय शेतीचे अर्थकारण’ पुस्तकाचे प्रकाशन

इस्लामपूर : भारतीय राजकारणातील शेतीचे महत्त्व आणि शेतीच्या अर्थकारणातील राजकारण हे विषय गुंतागुंतीचे आहेत. शेतीच्या अर्थकारणाचे राजकारण करण्याची प्रवृत्ती बळावल्याने शेतकरी मूलभूत मदतीपासून वंचित राहून शेती अडचणीत आली आहे. प्रत्येक शेतमालासाठी किमान आणि कमाल किंमत ठरवल्यास शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील, असे मत माजी ग्रामविकास मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी लिहिलेल्या ‘भारतीय शेतीचे अर्थकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. पाटील यांच्याहस्ते येथे झाले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. जे. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, टी. ए. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. पाटील म्हणाले की, डॉ. जे. एफ. पाटील यांचे सर्वांगांनी परिपूर्ण पुस्तक शेतीच्या अर्थकारणावर भाष्य करणाऱ्यांसाठी अभ्यासावे असे आहे. यामध्ये शेतीच्या अर्थकारणाची उत्तम मांडणी करण्यात आली आहे. आपली शेती जगण्यासाठी परिपूर्ण नाही, अशा निष्कर्षापर्यंत समाज आला आहे. त्यामुळेच आज गुजरातमध्ये प्रगत शेती करणारा पाटीदार-पटेल समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातही मराठा समाज याच मन:स्थितीत आहे. याची मूळ कारणे शेतीमध्ये आहेत. ते म्हणाले की, किफायतशीर शेती करता यावी म्हणून शेतकऱ्याने माहितीशास्त्राची मदत घ्यावी. त्याला संशोधनाचा मोठा पाठिंबा मिळायला हवा. त्याच्या पिकाची माहिती बाजारपेठेत पोहोचली पाहिजे. ग्राहकांना महत्त्व देतानाच त्याच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे. प्रा. डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले की, भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे दुखणे कायमचे मिटवायचे असेल तर वैद्यनाथन समितीच्या शिफारशींची अंमबजावणी व्हायला हवी. शेतीपूरक मूल्यवर्धित प्रकल्प उभारून रोजगार संधी निर्माण केल्या पाहिजेत.डॉ. जे. एस. पाटील म्हणाले की, शेअर बाजार, रुपयाची घसरण, परकीय देशातील घडामोडी याच्या चर्चा करतानाच शेतीचीही चर्चा झाली पाहिजे. शेती किफायतशीर करून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास आत्महत्या होणार नाहीत. यावेळी डॉ. एम. एन. शिंदे, डॉ. ए. एस. महाडिक, प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी यांचीही भाषणे झाली.प्राचार्य आर. डी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दशरथ पाटील, सौ. रेखा कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी आभार मानले. यावेळी प्रकाशक अमेय जोशी, विद्यापीठाचे प्रबंधक बी. पी. साबळे, प्राचार्य बी. एस. काळे उपस्थित होते. (वार्ताहर)