शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अवकाळीने बेदाणा उत्पादक देशोधडीला...

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

उत्पादकांना झटका : रॅकवरील जाळ्यांमध्ये पाणी गेल्याने हजारो टन बेदाणा काळा पडण्याची चिन्हे

प्रवीण जगताप - लिंगनूर -आज पहाटेपासून जिल्ह्यातील मिरज पूर्व, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या परिसराला मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. रॅकवरील जाळ्यांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने हजारो टन बेदाणा भिजला आहे. तसेच द्राक्षबागांतील बेदाणा निर्मितीच्या हेतूने तयार असलेली द्राक्षेही या अवकाळीच्या तडाख्यात सापडल्याने, बेदाणा रॅकवरील बेदाणे अन् रॅकवर जाणारी द्राक्षेही खराब होणार आहेत. बेदाणा निर्मिती सुरू असलेल्या व शेडवर येऊन पडलेल्या द्राक्षांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे एकरी दोन ते अडीच लाखाचे नुकसान प्रत्येक बेदाणा उत्पादकाचे झाले आहे. हजारो टन बेदाण्याचे व निर्मितीक्षम द्राक्षांचे नुकसान झाले असून, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ व तासगाव परिसरातील बेदाणा शेडवरील नुकसानीचा अंदाज करणेही मुश्कील होऊन बसले आहे.मिरज पूर्व भागात सध्या २५ टक्के द्राक्षे बेदाणा निर्मितीसाठी तयार आहेत, तर २५ टक्के द्राक्षांची रॅकवर बेदाणा निर्मिती सुरू आहे. २१ दिवसात द्राक्षापासून बेदाणे तयार होत असल्याने, मागील २१ दिवसांपासून आजअखेर विविध टप्प्यात असलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मिरज पूर्व भागातील सुभाषनगर, बेळंकी, डोंगरवाडी, संतोषवाडी, सलगरे, जानराववाडी, आरग, सीमावर्ती गावे, डोंगरवाडी, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, बनेवाडी परिसर तसेच कवठेमहांकाळ तालुक्याच्या उत्तर भागातील माळरानावर उभारलेल्या हजारो बेदाणा शेडवरही बेदाणा निर्मिती प्रक्रिया वेगात सुरू आहे. पण कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, नागज, आगळगाव, शेळकेवाडी, चोरोची, घोरपडी, जुनोनी या भागातही मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ, इतकेच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, शेडशाळ, आलास या गावांतील द्राक्षेही पूरक वातावरणामुळे बेदाणा निर्मितीसाठी वाहनांतून येथे पोहोचविली आहेत. त्यांची बेदाणा निर्मितीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण मुसळधार, संततधार पावसाच्या सरींमुळे हजारो टन बेदाणा पावसात भिजून खराब झाला आहे. तसेच हा बेदाणा १०० टक्के काळा पडणार आहे.गाऱ्हाणेबेदाण्याचे बेदाणा व निर्मितीक्षम रॅकवरील द्राक्षे संपूर्ण भिजल्याने पूर्ण बेदाणा काळा पडणार आहे. काळा पडलेला बेदाणा कवडीमोल दराने विकला जातो. गतवर्षी २०० ते ३०० रूपये इतका चांगला दर मिळाला होता, तर यंदाही १५० ते १७० रूपये इतका दराचा आकडा सुरू असताना, आता काळा पडलेला बेदाणा चार नंबरचा म्हणून त्याला ३० रूपये किलोचाही भाव मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे एकरी दोन ते तीन लाख रूपयांचे आर्थिक नुकसान आता बेदाणा उत्पादकाला सोसावे लागणार आहे.ज्या बेदाणा उत्पादकांचा तयार बेदाणा काल, शनिवारअखेर कोल्ड स्टोअरेजपर्यंत पोहोचला आहे, त्यांचाच बेदाणा आज अचानक पहाटेपासून झालेल्या पावसापासून नशिबाने वाचला आहे. बाकी सर्व बेदाणा अन् द्राक्षांचा सुपडा साफ होणार आहे.अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या बेदाणा निर्मितीस व बेदाण्यासाठी पिकविलेल्या द्राक्षांना फटका बसला आहे. एकरी दोन ते अडीच लाखाचा फटका बसला आहे. माझा १५ टन माल खटावच्या रॅकवर आहे, तर सुमारे १५ टन द्राक्षे अद्याप बागांमध्ये आहेत. माझ्याप्रमाणेच येथील सर्व बेदाणा उत्पादक देशोधडीला लागले आहेत. मागील दोन वर्षात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपेक्षा हे नुकसान जास्त आहे. - बाळासाहेब व्हणाणावर, बेदाणा उत्पादक, खटाव (ता. मिरज)