शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कोरोना व लॉकडाऊनमध्येही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

संतोष भिसे/सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनकाळातही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. ऐन कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात ४४ हजार १८५ बालकांचा ...

संतोष भिसे/सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनकाळातही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. ऐन कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात ४४ हजार १८५ बालकांचा जन्म झाला. कोरोनापूर्वीदेखील सरासरी इतकाच जन्मदर होता.

लॉकडाऊनमध्ये कुटुंबांचे आर्थिक स्रोत थांबल्याने शहरी भागात दांपत्यांनी अपत्यजन्म लांबणीवर टाकल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. अनेक जोडप्यांनी गर्भधारणाही टाळली होती. खासगी प्रसूतितज्ज्ञांनीदेखील अशीच निरीक्षणे नोंदविली आहेत. मात्र, जन्मदराची आकडेवारी पाहिली असता सरासरी कायम राहिल्याचे आढळले आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी म्हणजे २०१८ या वर्षामध्ये ४३ हजार ४२० बालकांचा जन्म झाला होता. २०१९ च्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची साथ पसरू लागली, त्यावर्षीदेखील ४५ हजार ९१४ बालके जन्मली होती. २०२० हे पूर्ण वर्ष कोरोनामय होते. या वर्षातही जन्मदराचा वेग स्थिर राहीला. या वर्षात ४४ हजार १८५ बालकांनी या जगात प्रवेश केला.

कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला. आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार महापालिका क्षेत्रात जन्मदर सर्वाधिक होता. शिवाय इस्लामपूर, विटा, तासगाव, जत आदी निमशहरी भागातही जन्मदर कायम राहिला. लॉकडाऊनकाळात अपत्यजन्माचे प्रमाण जास्त राहील असा तज्ज्ञांचा अंदाज होता, तो फोल ठरला. सजग जोडप्यांनी लॉकडाऊन काळात एकाच अपत्याला पसंती दिल्याने जन्मदर फारसा वाढला नसल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. कोरोनाकाळात कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला.

बॉक्स

वर्षाकाठी ४४५०० अपत्ये

२०१८ - ४३,४२०

२०१९ - ४५,९१४

२०२० - ४४,१८५

कोट

जिल्ह्यात वर्षाला सरासरी ४८ हजार प्रसूती होतात. त्यापैकी तीन हजार प्रसूतींमध्ये नवजात बालकांचे मृत्यू, गर्भपात किंवा अन्य कारणांनी बालके जगात येऊ शकत नाहीत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात तीनही वर्षांत ४४,५०० जन्मांची सरासरी कायम राहिली आहे.

- डॉ. विवेक पाटील, माता बालसंगोपन अधिकारी.