शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व लॉकडाऊनमध्येही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

संतोष भिसे/सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनकाळातही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. ऐन कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात ४४ हजार १८५ बालकांचा ...

संतोष भिसे/सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनकाळातही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. ऐन कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात ४४ हजार १८५ बालकांचा जन्म झाला. कोरोनापूर्वीदेखील सरासरी इतकाच जन्मदर होता.

लॉकडाऊनमध्ये कुटुंबांचे आर्थिक स्रोत थांबल्याने शहरी भागात दांपत्यांनी अपत्यजन्म लांबणीवर टाकल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. अनेक जोडप्यांनी गर्भधारणाही टाळली होती. खासगी प्रसूतितज्ज्ञांनीदेखील अशीच निरीक्षणे नोंदविली आहेत. मात्र, जन्मदराची आकडेवारी पाहिली असता सरासरी कायम राहिल्याचे आढळले आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी म्हणजे २०१८ या वर्षामध्ये ४३ हजार ४२० बालकांचा जन्म झाला होता. २०१९ च्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची साथ पसरू लागली, त्यावर्षीदेखील ४५ हजार ९१४ बालके जन्मली होती. २०२० हे पूर्ण वर्ष कोरोनामय होते. या वर्षातही जन्मदराचा वेग स्थिर राहीला. या वर्षात ४४ हजार १८५ बालकांनी या जगात प्रवेश केला.

कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला. आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार महापालिका क्षेत्रात जन्मदर सर्वाधिक होता. शिवाय इस्लामपूर, विटा, तासगाव, जत आदी निमशहरी भागातही जन्मदर कायम राहिला. लॉकडाऊनकाळात अपत्यजन्माचे प्रमाण जास्त राहील असा तज्ज्ञांचा अंदाज होता, तो फोल ठरला. सजग जोडप्यांनी लॉकडाऊन काळात एकाच अपत्याला पसंती दिल्याने जन्मदर फारसा वाढला नसल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. कोरोनाकाळात कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला.

बॉक्स

वर्षाकाठी ४४५०० अपत्ये

२०१८ - ४३,४२०

२०१९ - ४५,९१४

२०२० - ४४,१८५

कोट

जिल्ह्यात वर्षाला सरासरी ४८ हजार प्रसूती होतात. त्यापैकी तीन हजार प्रसूतींमध्ये नवजात बालकांचे मृत्यू, गर्भपात किंवा अन्य कारणांनी बालके जगात येऊ शकत नाहीत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात तीनही वर्षांत ४४,५०० जन्मांची सरासरी कायम राहिली आहे.

- डॉ. विवेक पाटील, माता बालसंगोपन अधिकारी.