शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

कोरोना व लॉकडाऊनमध्येही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

संतोष भिसे/सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनकाळातही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. ऐन कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात ४४ हजार १८५ बालकांचा ...

संतोष भिसे/सांगली : कोरोना आणि लॉकडाऊनकाळातही जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. ऐन कोरोनाकाळात गेल्या वर्षभरात ४४ हजार १८५ बालकांचा जन्म झाला. कोरोनापूर्वीदेखील सरासरी इतकाच जन्मदर होता.

लॉकडाऊनमध्ये कुटुंबांचे आर्थिक स्रोत थांबल्याने शहरी भागात दांपत्यांनी अपत्यजन्म लांबणीवर टाकल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. अनेक जोडप्यांनी गर्भधारणाही टाळली होती. खासगी प्रसूतितज्ज्ञांनीदेखील अशीच निरीक्षणे नोंदविली आहेत. मात्र, जन्मदराची आकडेवारी पाहिली असता सरासरी कायम राहिल्याचे आढळले आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी म्हणजे २०१८ या वर्षामध्ये ४३ हजार ४२० बालकांचा जन्म झाला होता. २०१९ च्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची साथ पसरू लागली, त्यावर्षीदेखील ४५ हजार ९१४ बालके जन्मली होती. २०२० हे पूर्ण वर्ष कोरोनामय होते. या वर्षातही जन्मदराचा वेग स्थिर राहीला. या वर्षात ४४ हजार १८५ बालकांनी या जगात प्रवेश केला.

कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला. आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार महापालिका क्षेत्रात जन्मदर सर्वाधिक होता. शिवाय इस्लामपूर, विटा, तासगाव, जत आदी निमशहरी भागातही जन्मदर कायम राहिला. लॉकडाऊनकाळात अपत्यजन्माचे प्रमाण जास्त राहील असा तज्ज्ञांचा अंदाज होता, तो फोल ठरला. सजग जोडप्यांनी लॉकडाऊन काळात एकाच अपत्याला पसंती दिल्याने जन्मदर फारसा वाढला नसल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. कोरोनाकाळात कोरोनाग्रस्त मातांनीही ठणठणीत व सुदृढ बालकांना जन्म दिला.

बॉक्स

वर्षाकाठी ४४५०० अपत्ये

२०१८ - ४३,४२०

२०१९ - ४५,९१४

२०२० - ४४,१८५

कोट

जिल्ह्यात वर्षाला सरासरी ४८ हजार प्रसूती होतात. त्यापैकी तीन हजार प्रसूतींमध्ये नवजात बालकांचे मृत्यू, गर्भपात किंवा अन्य कारणांनी बालके जगात येऊ शकत नाहीत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याचा जन्मदर स्थिर राहिला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात तीनही वर्षांत ४४,५०० जन्मांची सरासरी कायम राहिली आहे.

- डॉ. विवेक पाटील, माता बालसंगोपन अधिकारी.