शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तासगावच्या २६ ग्रामपंचायतींत रंगणार धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:52 IST

वर्चस्वाची लढाई : भाजप, राष्ट्रवादीत चढाओढ; सरपंच पदाला ग्लॅमर, सत्ताधारी-विरोधकांमध्ये व्यूहरचना सुरु

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यावरील वर्चस्ववादाचा जुनाच पट या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात रंगणार असून, भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार चढाओढीचे संकेत मिळत आहेत. थेट सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय झाल्याने, सदस्यांपेक्षा सरपंच पदालाच ग्लॅमर आले असून, सरपंच पदाची लढत लक्षवेधी होणार आहे.तासगाव तालुक्यातील २६ गावांत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे. गावाची सूत्रे ताब्यात घेण्यासाठी विद्यमान सत्ताधारी आणि विरोधकांकडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरुवात झाली आहे, तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचा भांडाफोड करण्यास सुरुवात केली जात आहे. गट, तट, भावकी, गावकीची जुळवाजुळव करुन इच्छुकांकडून साखरपेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश गावात राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील गटाविरोधात भाजपच्या खासदार संजयकाका पाटील यांच्या गटातच दुरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. काही गावांत मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत गटांतर्गत फूट पडली आहे. या ठिकाणी पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. या निवडणुकीनंतर तालुक्यातील वर्चस्वाचा फैसला होणार असल्याने खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचेही लक्ष या ग्रामपंचायत निवडणुकीकडे केंद्रित होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणूक होणाऱ्या गावांतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत जाणार हे निश्चित आहे.थेट सरपंच निवडीमुळे बहुतांश गावात थोडी खुशी, थोडा गम असेच वातावरण आहे. अनेक गावांतील प्रस्थापित नेतृत्वाची थेट सरपंच निवडीमुळे कोंडी झाली आहे, तर बहुमताची मॅजिक फिगर गाठून सरपंचपद पदारात पाडून घेणाऱ्या काही कारभाऱ्यांची निराशा झाली आहे. तसेच एकाच पक्षात दोन गट असणाऱ्या काही नेत्यांचे दुसऱ्या पक्षातील गटाशी हातमिळवणी करण्याचे मनसुबेही धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे थेट सरपंच निवडही रंगतदार ठरणार आहे.आरवडे येथे राष्ट्रवादीचे युवराज पाटील यांच्याविरोधात जुना राष्ट्रवादीचा गट आणि भाजपचा एक गट एकत्रित येऊन लढण्याची शक्यता आहे. भैरववाडीत भाजपअंतर्गत दोन गट आहेत. नागावमध्ये भाजपच्या गटात फूट पडली आहे. सावर्डेत भाजप, राष्ट्रवादीबरोबरच अजितराव घोरपडे समर्थक स्वप्नील पाटील यांचा तिसरा स्वतंत्र गट रिंगणार उतरणार आहे. वायफळेत बाजार समितीचे तत्कालीन संंचालक साहेबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर मणेराजुरी हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे या गावांतील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीअंजनी (११ सदस्य), आरवडे (११), बलगवडे (९), बस्तवडे (११), बेंद्री (७), भैरववाडी (७), चिंचणी (१७), कचरेवाडी (७), खुजगाव (९), कुमठे (१५), लिंब (७), मणेराजुरी (१७), मतकुणकी (९), नागाव (९), नागेवाडी (७), नेहरुनगर (९), निमणी (९), पानमळेवाडी (७), पुणदी (९), सावर्डे (१३), शिरगाव (९), उपळावी (११), वंजारवाडी (९), वासुंबे (१३), वायफळे (१३), योगेवाडी (७).लक्षवेधी ग्रामपंचायती आमदार सुमनताई पाटील यांच्या अंजनी आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या चिंंचणी ग्रामपंचायतीचा यावेळच्या निवडणुकीत समावेश आहे. चिंंचणीत खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाविरोधात बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील यांच्या गटाचे आव्हान आहे.प्रशासकीय तयारी सुरूतासगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८ आॅगस्टपर्यंत प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ८ ते १४ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. १९ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचना विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करण्यात येणार आहेत, तर २१ आॅगस्टला प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करुन अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.