शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अवकाळीग्रस्तांसाठी अधिवेशनात घोषणा!

By admin | Updated: March 6, 2015 01:05 IST

चंद्रकांत पाटील यांची माहिती : प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारणार

सांगली : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उघडण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात काही ठिकाणी दुष्काळाने, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचे पंचनामे १० मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले आहेत. केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राज्य शासनच आता यासाठी पुढाकार घेणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल आल्यानंतर यासाठी किती मदत द्यायची, याची घोषणा विधिमंडळातच करण्यात येईल. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज समजण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारी घेण्यास मदत होणार आहे. अवकाळीने झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देताना शासन केवळ नियमावर बोट ठेवून काम करणार नाही. जास्तीत जास्त शेतकरी कसे उभे राहतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबरपासून अवकाळीने झालेल्या नुकसानीसाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अवकाळी व दुष्काळासाठी गेल्या वर्षभरात ४२०० कोटी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)