शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती
2
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
3
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
4
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
6
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
7
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
8
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
9
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
10
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
11
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
13
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
14
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
15
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
16
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
17
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
18
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
19
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
20
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६४५ वाहन चालकांना दणका

By admin | Updated: February 2, 2015 00:14 IST

आरटीओंना प्रस्ताव : अपघात प्रकरणातील संशयितांचे वाहन परवाने होणार निलंबित

सचिन लाड - सांगलीअपघात करून लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संशयित वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओंकडे सादर करण्याची तयारी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सुरू ठेवली आहे. गेल्या दोन वर्षात १ हजार ७११ अपघात झाले आहेत. यामध्ये ६४५ जणांचा बळी गेला आहे. या सर्वांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे चालकही ६४५ आहेत. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत त्यांचे लायसन्स निलंबित ठेवण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यास येत्या पंधरा दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र अपवाद वगळता रस्त्यांची लांबी-रुंदी तेवढीच राहिली आहे. प्रत्येकास पुढे जाण्याची घाई, वाहतूक नियमांचे पालन न करणे, ओव्हरटेक करणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, ट्रिपल सिट बसून जाणे, भरधाव वेगाने जाणे ही अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताला आळा बसू शकतो. मात्र स्पर्धेच्या युगात नियम धाब्यावर बसवून रस्ता आणि आजूबाजूच्या स्थितीचा कोणताही अंदाज न घेता वाहनेचालविली जात आहेत. विशेषत: तरुण वर्ग रस्त्यावर आडवे-तिडवे भरधाव वेगाने वाहन चालविताना दिसतो. अपघातात बळी गेलेल्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. पालकही आपल्या मुलांकडे लायसन्स व वाहतूक नियमांची माहिती आहे का नाही, याची चौकशी न करता वाहन घेऊन देत आहेत.दररोज कुठे ना कुठे अपघात होतो. दुचाकीवरून घसरून पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामागे भरधाव वेगाने जाणे, हे प्रमुख कारण आहे. आपल्यासह दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही तरुण भरधाव वेगाने वाहन चालवित आहेत. अपघात करुन दुसऱ्याचा बळी घेणाऱ्या वाहनांत दुचाकी, रिक्षा, मोटार, ट्रक, डम्पर, एसटी या वाहनांचा समावेश आहे. अपघातग्रस्त वाहनाच्या चालकास अटक केली जाते; पण दुसऱ्यादिवशी तो जामिनावर बाहेर येतो. तो पुन्हा वाहन चालवून लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. यासाठी त्याचे लायसन्स निलंबित करण्याचा निर्णय पोलीसप्रमुख सावंत यांनी घेतला. त्यानुसार गेल्या दोन वर्षात अपघात करुन लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ६४५ संशयित वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश त्यांनी वाहतूक पोलिसांना दिला आहे. अपघातांवर एक नजरजिल्ह्यात २०१३ मध्ये ८३२ अपघात होऊन ३२५ जणांचा बळी गेला, तर २०१४ मध्ये ८७९ अपघातात ३२० जणांचा बळी गेला आहे. या दोन्ही वर्षातील अपघातांच्या आकडेवारीची तुलना केल्यास, अपघात होण्याचे व लोक मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी-जास्त असल्याचे दिसून येते.अपघातात बळी गेलेले अनेक लोक कुटुंबप्रमुख असतात. त्यांच्या जाण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. अपघात करुन लोकांना मारण्याचे कुणाला लायसन्स दिलेले नाही. कायद्यातील त्रुटींमुळे संशयितांना फायदा मिळतो. ते पुन्हा वाहन चालविण्यास बसतात. यासाठी जोपर्यंत त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्यांचे लायसन्स निलंबित ठेवण्याचे प्रस्तावात सुचविणार आहे. त्यास आरटीओंकडून मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.- दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख अपघाताची ६४ ठिकाणेजिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या अपघातांना आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना अपघात होणाऱ्या ठिकाणांचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. या सर्व्हेमध्ये जिल्ह्यात सातत्याने अपघात होणारी ६४ ठिकाणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी काय उपाययोजना करायला हव्यात, हेही पोलिसांनी सुचविले आहे. या उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाने करायच्या आहेत. मात्र त्यांनी केवळ रस्त्यावरील झाडे तोडण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे अशा घटना घडतच आहेत.