शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे सेंद्रिय उत्पादनांच्या व्यापारवाढीला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना काळात खाद्यान्नाबाबत वाढलेली जागरुकता सेंद्रिय उत्पादनांसाठी लाभदायी ठरत आहे. त्यामुळे देशांतर्गत ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना काळात खाद्यान्नाबाबत वाढलेली जागरुकता सेंद्रिय उत्पादनांसाठी लाभदायी ठरत आहे. त्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारवृद्धीला खतपाणी मिळाले आहे. देशातील सेंद्रिय शेती क्षेत्र १८ टक्क्यांनी वाढले असून, निर्यातीमध्ये ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र कृषी सेवा विभागाच्या मते भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनात २०२५पर्यंत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

कोरोनामुळे भारतात आरोग्याबाबत जशी जागरुकता निर्माण झाली आहे, तशीच ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाली आहे. यात पोषक अन्न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी वाढली आहे. जगातील एकूण सेंद्रिय उत्पादनांच्या उलाढालीत भारताचा वाटा ३० टक्के इतका आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा दबदबा या उत्पादनातून वाढण्याची शक्यता आहे.

कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)ने दिलेल्या अहवालानुसार, भारतात सेंद्रिय उत्पादनांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. २०१९-२०मध्ये भारतीय सेंद्रिय उत्पादनांची एकूण निर्यात ४ हजार ६८५ कोटी ९० लाख रुपयांची झाली होती. २०२०-२१मध्ये ही निर्यात ७ हजार ७८ कोटी ७९ लाख इतकी म्हणजे ५१.०६ टक्क्यांनी वाढली.

उत्पादनांचा विचार केला तर भारतात २०१९मध्ये एकूण लागवडीखालील सेंद्रिय शेतीक्षेत्र ३६ लाख ६९ हजार ८०१ हेक्टर इतके होते. २०२०-२१मध्ये ते ४३ लाख ३९ हजार १८४ हेक्टरपर्यंत म्हणजेच १८ टक्क्यांनी वाढले. देशातील एकूण सेंद्रिय उत्पादनांमध्ये सर्वाधिक वाटा मध्य प्रदेशचा आहे. त्याखालोखाल राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आदी राज्यांचा क्रमांक लागतो.

चौकट

चार वर्षांत मोठा बहर

अमेरिकेच्या परराष्ट्र कृषी सेवा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, भारतातील सेंद्रिय अन्नधान्य उत्पादनाचा वार्षिक चक्रवृद्धी दर २०१६ ते २०२१ या काळात १० टक्के राहिला. तो येत्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून, या क्षेत्रातील एकूण उलाढाल ८० हजार १०७ कोटी ३८ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

चौकट

आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला संधी

जगातील एकूण सेंद्रिय शेती क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात आठव्या क्रमांकावर असून, उत्पादकांच्या संख्येचा विचार केल्यास तो अव्वल आहे. भारतातील एकूण शेती क्षेत्राचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात वृद्धी झाल्यास सेंद्रिय उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात भारत मोठा दबदबा निर्माण करु शकतो.