शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात ऑनलाईन शाळेला थंडा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी जत शहरातील शाळा तयार झाल्या असून, इंटरनेट कनेक्शन, ब्रॉडबँड सेवा जोडण्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी जत शहरातील शाळा तयार झाल्या असून, इंटरनेट कनेक्शन, ब्रॉडबँड सेवा जोडण्या पूर्ण करून ऑनलाईन शिक्षण देणे सुरू केले आहे. मात्र, ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाला थंडा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा कायम राहतो की काय, अशी धास्ती पालकांना आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. सर्व व्यवहार ठप्प असताना शैक्षणिक क्षेत्रही संकटात आहे. दीड वर्षापासून विद्यार्थी घरीच आहेत. प्रशासनाकडून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, असे सांगितले जात असले तरी त्यात सत्यता कमी आहे. शहरातील काही मुलांचे शिक्षण सुरु आहे. त्यातच शिक्षक कोविड सर्वेक्षण, लसीकरण मोहीम, जनजागृती, कोविड सेंटर, टेस्टींग सेंटर आदी कामात गुंतले आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारी साधने उपलब्ध नाहीत. बऱ्याच भागात मोबाईल कव्हरेज उपलब्ध नाही. पालकांचे मोबाईल पालक कामाला जाताना सोबत नेत असल्यामुळे लहान मुलांना ते मिळत नाहीत. ग्रामीण भागातील गोरगरीब पालक स्मार्टफोन कुठून आणणार, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा ग्रामीण भागात केवळ बट्ट्याबोळ होत आहे. आता रेंज नसलेल्या भागात पाठ्यपुस्तके मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन शिक्षणाचे आकडे फसवे आहेत, अशीही चर्चा आहे. खासगी शाळेला पालकांकडून शैक्षणिक शुल्क वसूल करायचे असल्यामुळे काही प्रमाणात ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ज्या पालकांनी शुल्क भरले नाही, त्या विद्यार्थ्यांना ग्रुपमधून बाहेर काढून त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून दूर ठेवल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ही बाब म्हणजे शिक्षणाचा अधिकार अधिनियम - २००९चे उल्लंघन आहे. मानसशास्त्राचा विचार केल्यास १० वर्षांचा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात केवळ २० मिनिटे एकाग्रता साधू शकतो. कोविड - १९मुळे प्रशासनातील कोणत्याही घटकाला स्वतःहून आपत्ती ओढवून घ्यायची नसल्यामुळे शाळा सुरु करण्याचे कुणीही लेखी आदेश देण्यास तयार नाही.

चाैकट

प्रत्यक्ष शाळा सुरु हाेणे गरजेचे

शाळा सुरु न झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणे अटळ आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक बाबी माहिती होत्या, त्या बाबी विद्यार्थी पूर्णतः विसरले आहेत. शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्या तरच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत.