शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लगोडबंद विहीर आष्टेकरांसाठी वरदान

By admin | Updated: April 30, 2016 00:51 IST

नूतनीकरण सुरू : शिवकालीन इतिहासाचा ठेवा; १९७२ च्या दुष्काळाची साक्षीदार

सुरेंद्र शिराळकर --- आष्टा -येथील पुरातन अशा लगोडबंद विहिरीच्या नूतनीकरणाचे काम आष्टा नगरपालिकेने सुरू केले आहे. अल्पसंख्याक आयोगाच्या अनुदानातून दहा लाख रुपये खर्चून ऐतिहासिक अशा या विहिरीचे पुन्हा बांधकाम सुरू झाल्याने आष्ट्याचा शिवकालीन वारसा जपला जात आहे. या विहिरीचे पाणी सोमलिंग तलावात सोडून तेथे बगीचा फुलविण्यात येणार असल्याने, लगोडबंद विहीर पुन्हा आष्टेकरांच्या मदतीला धावून आली आहे.१९७२ च्या दुष्काळातही या विहिरीतील पाण्याने आष्टेकरांची तहान भगविली. मात्र त्यानंतर आष्टा पालिकेने कृष्णा नदीवरून शहराला पिण्यासाठी पाणी आणले. २००७ मध्ये नवीन पाणी पुरवठा योजना झाल्याने प्रत्येकाच्या घरात कृष्णेचे पाणी मिळू लागल्याने, या विहिरीचे पाणी वापरणे बंद झाले. मात्र आष्टा येथील चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवावेळी तसेच काशिलिंग बिरोबाच्या पूजेसाठीही या विहिरीचेच पाणी परंपरागत पद्धतीने वापरले जाते. अतिशय आखीव-रेखील दगडात बांधलेल्या या विहिरीचे बांधकाम ढासळू लागल्याने आष्टा पालिकेने, शेकडो वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्यादृष्टीने अल्पसंख्याक अनुदान आयोगाच्या अनुदानातून या विहिरीचे बांधकाम सुरू केले आहे. ही विहीर आष्टेकरांसाठी वरदान ठरली आहे. माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वीच्या बांधकामानुसार सामग्रीचा वापर करून काम करण्यात येत आहे. कोल्हापूर, बेळगाव येथील कारागीर हा ठेवा जतन करण्याचे काम करीत आहेत. लगोडबंद विहिरीत कायमस्वरुपी जिवंत पाण्याचे झरे असल्याने येथील पाणी कमी होत नाही, काम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीवर कचरा पडू नये, यासाठी जाळी बसविण्यात येणार आहे. या विहिरीतील पाणी विद्युत पंप बसवून सोमलिंग तलावात नेण्यात येणार आहे. आष्ट्याच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या या विहिरीचे पाणी पुन्हा सुरू झाल्याने इतिहासाला उजाळा मिळणार आहे.बारमाही विहीर : धार्मिक कार्याला पाणीआष्टा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हजरत पीर लगोडबंद दर्गा आहे. या ठिकाणीच लगोडबंद विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम तत्कालीन मुस्लिम शासक आदिलशहाने करून दिल्याचे सांगितले जाते. प्राचीनकाळी आष्ट्यातील नागरिक याच लगोडबंद विहिरीचे पाणी वापरत होते. त्याकाळी गावातील सर्वच धार्मिक कार्याला व वर्षानुवर्षे पिण्यासाठी या विहिरीतून पाणी वापरत होते.विहीर आष्टा शहराच्या मध्यवर्ती व सखल भागात असल्याने इतर ठिकाणच्या विहिरींचे पाणी कमी झाले तरी या विहिरीचे पाणी कधीच आटले नाही.ऐतिहासिक विहिरीचे पाणी वापराविना वायाआष्टेकरांची तहान भागविणाऱ्या या विहिरीचे पाणी गेल्या काही वर्षापासून नागरिक वापरत नसल्याने या विहिरीत गवत, गाळ साठला आहे. यामुळे पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या विहिरीला उतरती कळा लागली आहे. विहिरीचा कठडा, बांधकाम पडू लागले आहे.आष्टा येथील शिवकालीन लगोडबंद विहीर.