शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

लगोडबंद विहीर आष्टेकरांसाठी वरदान

By admin | Updated: April 30, 2016 00:51 IST

नूतनीकरण सुरू : शिवकालीन इतिहासाचा ठेवा; १९७२ च्या दुष्काळाची साक्षीदार

सुरेंद्र शिराळकर --- आष्टा -येथील पुरातन अशा लगोडबंद विहिरीच्या नूतनीकरणाचे काम आष्टा नगरपालिकेने सुरू केले आहे. अल्पसंख्याक आयोगाच्या अनुदानातून दहा लाख रुपये खर्चून ऐतिहासिक अशा या विहिरीचे पुन्हा बांधकाम सुरू झाल्याने आष्ट्याचा शिवकालीन वारसा जपला जात आहे. या विहिरीचे पाणी सोमलिंग तलावात सोडून तेथे बगीचा फुलविण्यात येणार असल्याने, लगोडबंद विहीर पुन्हा आष्टेकरांच्या मदतीला धावून आली आहे.१९७२ च्या दुष्काळातही या विहिरीतील पाण्याने आष्टेकरांची तहान भगविली. मात्र त्यानंतर आष्टा पालिकेने कृष्णा नदीवरून शहराला पिण्यासाठी पाणी आणले. २००७ मध्ये नवीन पाणी पुरवठा योजना झाल्याने प्रत्येकाच्या घरात कृष्णेचे पाणी मिळू लागल्याने, या विहिरीचे पाणी वापरणे बंद झाले. मात्र आष्टा येथील चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवावेळी तसेच काशिलिंग बिरोबाच्या पूजेसाठीही या विहिरीचेच पाणी परंपरागत पद्धतीने वापरले जाते. अतिशय आखीव-रेखील दगडात बांधलेल्या या विहिरीचे बांधकाम ढासळू लागल्याने आष्टा पालिकेने, शेकडो वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्यादृष्टीने अल्पसंख्याक अनुदान आयोगाच्या अनुदानातून या विहिरीचे बांधकाम सुरू केले आहे. ही विहीर आष्टेकरांसाठी वरदान ठरली आहे. माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वीच्या बांधकामानुसार सामग्रीचा वापर करून काम करण्यात येत आहे. कोल्हापूर, बेळगाव येथील कारागीर हा ठेवा जतन करण्याचे काम करीत आहेत. लगोडबंद विहिरीत कायमस्वरुपी जिवंत पाण्याचे झरे असल्याने येथील पाणी कमी होत नाही, काम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीवर कचरा पडू नये, यासाठी जाळी बसविण्यात येणार आहे. या विहिरीतील पाणी विद्युत पंप बसवून सोमलिंग तलावात नेण्यात येणार आहे. आष्ट्याच्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या या विहिरीचे पाणी पुन्हा सुरू झाल्याने इतिहासाला उजाळा मिळणार आहे.बारमाही विहीर : धार्मिक कार्याला पाणीआष्टा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हजरत पीर लगोडबंद दर्गा आहे. या ठिकाणीच लगोडबंद विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम तत्कालीन मुस्लिम शासक आदिलशहाने करून दिल्याचे सांगितले जाते. प्राचीनकाळी आष्ट्यातील नागरिक याच लगोडबंद विहिरीचे पाणी वापरत होते. त्याकाळी गावातील सर्वच धार्मिक कार्याला व वर्षानुवर्षे पिण्यासाठी या विहिरीतून पाणी वापरत होते.विहीर आष्टा शहराच्या मध्यवर्ती व सखल भागात असल्याने इतर ठिकाणच्या विहिरींचे पाणी कमी झाले तरी या विहिरीचे पाणी कधीच आटले नाही.ऐतिहासिक विहिरीचे पाणी वापराविना वायाआष्टेकरांची तहान भागविणाऱ्या या विहिरीचे पाणी गेल्या काही वर्षापासून नागरिक वापरत नसल्याने या विहिरीत गवत, गाळ साठला आहे. यामुळे पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या विहिरीला उतरती कळा लागली आहे. विहिरीचा कठडा, बांधकाम पडू लागले आहे.आष्टा येथील शिवकालीन लगोडबंद विहीर.