शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

अत्युच्च तंत्रज्ञानाचा लाभ गरिबांना व्हावा : रघुनाथ माशेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:54 IST

उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानातून महागडी निर्मिती उपयोगाची नाही. गरिबांसाठी त्याचा वापर झाला तरच त्या संशोधनाला अर्थ आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास यावर आधारित संशोधनच दर्जेदार म्हटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर

ठळक मुद्देज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वासावरील संशोधन महत्त्वाचे

सांगली : उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानातून महागडी निर्मिती उपयोगाची नाही. गरिबांसाठी त्याचा वापर झाला तरच त्या संशोधनाला अर्थ आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास यावर आधारित संशोधनच दर्जेदार म्हटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रसायन शास्त्राचे प्राध्यापक डॉ. बी. एन. कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत माशेलकर यांचे ‘नव्या सर्जनशील भारताचे नवनिर्माण’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर सागर देशपांडे, ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी व डॉ. श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते.

माशेलकर म्हणाले की, हळद आणि बासमतीच्या पेटंटचा लढा भारतीय या नात्याने दिला. प्रत्येकाने तत्त्वासाठी लढले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. जगभरात अनेक प्रकारची संशोधने व त्यातून निर्मिती होत असताना, त्याबाबतचे ज्ञान हे फार पूर्वीपासून भारतात आपल्या पूर्वजांनी शोधले आहे. हीच गोष्ट लक्षात आल्यानंतर आपल्याकडील पारंपरिक ज्ञान एकत्रित करीत आम्ही ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी तयार केली. चार कोटी पानांचे हे ई-ग्रंथालय आहे. जगात आता कुठेही पेटंट घेताना भारताच्या या ई-ग्रंथालयाची पाहणी प्रथम करावी लागते. त्यामुळे भारतात पारंपरिक ज्ञानाची कमतरता नाही. त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा. मात्र नुसता अभिमान बाळगण्यापेक्षा त्यातून नवनिर्मिती केली पाहिजे.

हळदीचे शहर म्हणून सांगलीला ओळखले जात असले तरी, नुसत्या हळद निर्मितीपेक्षा त्यातील करक्युमीनच्या निर्मितीचा ध्यास येथील व्यावसायिकांनी ठेवला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. मनातील विचार मोठे असून उपयोग नाही, तर भारतीयांनी मानसिकता बदलली पाहिजे. जगात आपण सर्वांच्या पुढे जाण्याचा विचार जपला पाहिजे. त्यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे.

जग वेगाने बदलत असताना शिक्षण पद्धतीही बदलणार आहे. तंत्रज्ञानातून प्रत्येक क्षेत्र बदलाच्या वेगवान वाऱ्यावर धावणार आहे. परंपरागत नोकºया जाताना नव्या वाटाही सापडतील. त्यामुळे संशोधन, नवे तंत्रज्ञान याच्याशी आपण नाते घट्ट केले पाहिजे. तंत्रज्ञान उच्च दर्जाचे असेल आणि त्याची किंमतही मोठी असेल, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या गोष्टीचा वापर गरिबांसाठी झाला, तर त्याला अर्थ आहे, असे ते म्हणाले.

यावेळी ट्रस्टच्यावतीने डॉ. दत्ता शेटे, डॉ. तृषांत लोहार या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांनी सूत्रसंचालन, अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर डॉ. वर्षा पाटील यांनी आभार मानले.तुमची नव्हे, प्रतिस्पर्ध्यांची गती मोजाजागतिक पातळीवरील स्पर्धेत आपल्या गतीचे मोजमाप करून चालत नाही. प्रतिस्पर्ध्यांची गती किती आहे, हेही पाहिले पाहिजे. त्यावरच तुमच्या प्रगतीचे गणित अवलंबून आहे. जागतिक नवनिर्माण निर्देशांक (ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स) मध्ये भारताने प्रगती करीत आता ५७ वे स्थान मिळविले असले तरी, अन्य प्रगतशील देशांपेक्षा अधिक गतीने पुढे जाण्याची गरज आहे. त्यासाठी भारतातील नवनिर्माणाचा वेग वाढविला पाहिजे, असे माशेलकर म्हणाले.

सांगलीच्या मातीला नवनिर्माणाची परंपराविष्णुदास भावे, ग. दि. माडगूळकर, वसंतदादा पाटील, वि. स. पागे यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी सांगलीत नवनिर्माण केले. या मातीतच नवनिर्माणाची परंपरा आहे. अनेक दिग्गज लोकांनी येथील परंपरा समृद्ध केली आहे. त्यांच्या पश्चात नव्या पिढीने नवनिर्माणाच्या वाटेवरून अधिक गतीने पुढे गेले पाहिजे, असे माशेलकर म्हणाले.सांगलीत गुरुवारी ‘नव्या सर्जनशील भारताचे नवनिर्माण’ या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून श्रीकांत कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, सागर देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानscienceविज्ञानSangliसांगली