शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

विभागातील भाराभर योजना राबवणार कोण

By admin | Updated: July 11, 2014 00:17 IST

कृषी विभाग : ५८ पैकी ३७ पदे रिक्त; मग गुहागरमधील विकासाचे काय?

श्रीकर भोसले _ गुहागर , तालुक्याच्या विकासासाठी फलोद्यान, कृषी आणि कृषी पर्यटन विकासाला शासनाकडून चालना मिळत आहे. शासनाच्या विविध योजनांचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासन कृषी विभागासमोर आहे. मात्र, या विभागातील तालुक्यासाठी मंजूर असलेल्या ५८ पदांपैकी तब्बल ३७ पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. भाराभर योजना आहेत, त्या राबवणार कोण? भुकेला चणे आहेत पण दात नाहीत, अशी अवस्था इथल्या शेतकऱ्यांची झाली आहे.मुंबईकडे डोळे लावून जगणारा कोकणातील एक तालुका ही ओळख तालुक्यातील शेतकरी बदलू पाहात आहे. ३ हजार ९५० हेक्टर भातशेती, १ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात नागली, ४ हजार ८२० हेक्टर आंबा, ७ हजार ६५० हेक्टरातील काजू लागवड, ६६० हेक्टर नारळ, २७५ हेक्टर सुपारी, केळी या पारंपरिक पिकाबरोबरच तूर, मसालेची आंतरशेती, कलिंगड, अननस, कंद आणि पुष्पशेती, कोरफड, शतावरी औषधी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानातून नवनवे प्रयोग करत कृषी क्षेत्राला विकासाचा कणा बनवण्याची आस इथल्या शेतकऱ्याला लागली आहे. मात्र, शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोचवणाऱ्या कृषी सहायकासह महाराष्ट्र शासन कृषी विभागातील ३७ पदे रिक्त असल्याने येथील शेतकरी वंचित राहात आहेत.गुहागर कार्यालयांतर्गत एकूण ५८ पदे मंजूर आहेत. यापैकी कमी अधिक प्रमाणात गेली दोन वर्षे मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. मंडल कृषी अधिकारी ४ पदांपैकी २ रिक्त आहेत. कृषी पर्यवेक्षकांच्या ७ पदांपैकी १ रिक्त, कृषी सहायकांच्या ३७ पैकी २८ पदे रिक्त, वरिष्ठ लिपीक १ रिक्त, कनिष्ठ लिपिक ४ पैकी ३ रिक्त, शिपाई ४ पैकी २ रिक्त अशी एकूण ३६ पदे रिक्त आहेत. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झालेल्या तालुका कृषी अधिकारीपदावरही अद्याप नेमणूक झालेली नाही.एकीकडे शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होत नाही तर अपुऱ्या मनुष्यबळाच्या सहायाने मिळालेले उद्दिष्ट साध्य करताना आणि शासनाच्या योजना राबवताना येथील अधिकारी आणि कर्मचारीवर्गही मेटाकुटीला आला आहे. यावर्षी विभागाला ग्रामीण रोजगार हमी योजना १०० हेक्टरचा लाभांश मिळाला आहे. साग, काजू, आंबा, फळ लागवड, रानकोटी, गिरीपुष्प आदींचे २ लाख नवीन लागवडीचे लक्षांश ठेवण्यात आले आहे. भातपीक प्रात्यक्षिक ३०० हेक्टरचे लाभांश आहे. अपुऱ्या संख्याबळामुळे प्रात्यक्षिक सोडाच ३०० हेक्टर क्षेत्रावर पोहोचणेही शक्य नाही. एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनसारख्या योजनेतून या क्षेत्राच्या दूरगामी विकासाची संधीही हातची जाते की काय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कृषी विकासाच्या योजना केवळ कागदावर न रंगवता त्या शिवारात फुलवायच्या असतील तर या योजना राबवण्यााठी आवश्यक पदे कायमस्वरुपी पूर्ण ताकदीने भरली जावीत. यासाठी शेतऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींही आग्रह धरायला हवा.सध्या या भागात कृषीविभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करावी यासाठी खात्यातील रिक्त पदांची भरती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.