शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम चिपळूणला अधिक तडाखा अवकाळी पाऊस : झाडे तोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरु

By admin | Updated: May 9, 2014 00:21 IST

चिपळूण : शहरातील पश्चिम भागात बुधवारी सायंकाळी वादळी वारा व पावसाचा सर्वाधिक फटका गोवळकोट, उक्ताड, खेंड, कांगणेवाडी या परिसराला बसला.

चिपळूण : शहरातील पश्चिम भागात बुधवारी सायंकाळी वादळी वारा व पावसाचा सर्वाधिक फटका गोवळकोट, उक्ताड, खेंड, कांगणेवाडी या परिसराला बसला. गोवळकोट रोड येथे शंभरहून अधिक पोल वादळी वार्‍याने वाकल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे, तर विविध भागात पडलेली झाडे तोडण्याचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे सुरु आहेत. वीजखांब कोसळल्याने महावितरणला सर्वाधिक फटका बसला आहे. नगराध्यक्ष रिहाना बिजले, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, तहसीलदार वृषाली पाटील, आरोग्य समिती सभापती आदिती देशपांडे, माजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेश देवळेकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती शिल्पा सप्रे-भारमल, महिला मागासवर्गीय समितीच्या सभापती तेजश्री संकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिक्षण समिती सभापती निर्मला चिंगळे, शिवसेनेचे शहरप्रमुख भगवान शिंदे, नगरसेवक राजेश देवळेकर, नगरसेवक सुरेखा खेराडे, बांधकाम सभापती बरकत वांगडे, माजी बांधकाम सभापती शहाबुद्दिन सुर्वे, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, पाणी पुरवठा सभापती कबीर काद्री, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा बैकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याबाबत तहसील कार्यालयातर्फे तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वादळी वार्‍याने उक्ताड गणेश मंदिर येथील पत्र्याची शेड व स्मशानभूमीवरील पत्रेही उडून गेले आहेत. पांडुरंग सनगरे, रमेश गोरिवले यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. रवींद्र जोगळे यांच्या घराची पत्राशेडही उडाली आहे. गोवळकोट बौद्धवाडी येथेही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशोक सकपाळ, गंगाधर तांबे, रवींद्र सकपाळ, राजाराम जाधव यांचा यामध्ये समावेश आहे. कांगणेवाडी येथे दिनेश वीर, संगीता पाष्टे, राजेश बुरटे, शंकर बुरटे, दिलीप मोरे यांच्याही घराचे नुकसान झाले आहे. काही ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा स्वत: पुढाकार घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. गोवळकोट परिसरात १००हून अधिक विजेचे खांब वाकले असून, काही दिवसांपूर्वीच नवीन वीजखांब या भागात टाकण्यात आले होते. हे खांब निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या कामाची चौकशी करावी, अशी मागणीही गोवळकोट परिसरातून होत आहे. गोवळकोट भागातील वीज सुरळीत करण्यासाठी अजूनही दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात पडलेली झाडे तोडण्याचे काम बारा तासांहून अधिक काळ नगर परिषद कर्मचारी यांच्या मदतीने सुरु होते. वादळी वारा व पावसाचा तडाखा पाणीपुरवठा योजनेवरही झाला आहे. आज शहर व परिसरात सकाळचा पाणीपुरवठा झाला नाही. तसेच नेहमी प्रभागात फिरणारी घंटागाडीही आली नाही. एकंदरीत वादळी वार्‍याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही झाला. सायंकाळी उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार, चिपळुणातील ३९ गावात ३४८ घरांचे अंशत: मिळून २९ लाख ३३ हजार ५१५ रुपये, १८ गोठ्यांचे १ लाख ७ हजार ७७५ रुपयांचे नुकसान झाले.कात्रोली येथे एका बैलाचा या वादळी पावसामुळे मृत्यू झाला. (वार्ताहर)