शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

जलयुक्त शिवार तहान भागविणार

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

तालुक्यातील पाच गावांमधील ६५ कामे पूर्ण झाली आहेत. चिपळूण तालुक्यातील कोसबी, केतकी, अनारी, गाणे, कात्रोळी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश

सुभाष कदम - चिपळूण -ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यात या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाच गावांमधील ६५ कामे पूर्ण झाली आहेत. चिपळूण तालुक्यातील कोसबी, केतकी, अनारी, गाणे, कात्रोळी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. या पाच गावातून ६५ कामे झाली. त्यामध्ये केतकी येथे अंगड दगडी बांध २, सिमेंट बंधारा १, समपातळी सलग चर ८ व शेततळे १ ही कामे झाली आहेत. कोसबीमध्ये ५ अंगड दगडी बांध, २ सिमेंट वळण बंधारे, ३ बंधाऱ्यातील गाळ काढणे, ३ ठिकाणी समपातळी सलग चर मारण्यात आले आहेत. कात्रोळी येथे अंगड दगडी बांध २, शेततळे २, समपातळी सलग चर १५, मसगी २ ही कामे झाली. गाणे येथे अंगड दगडी बांध ५, सिमेंट नाला बंधारा १, सिमेंट वळण बंधारा १, शेततळे १, बंधाऱ्यातील गाळ काढणे १, अनारी येथे अंगड दगडी बांध ८, नाल्यातील गाळ काढणे १ अशी एकूण ६५ कामे झाली आहेत. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करुन पिण्याचे पाणी व विकास संरक्षण सिंचन देण्याची व्यवस्था करता येईल. महाराष्ट्र २०१९ यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावात शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्त्वात असलेली व रिकामी झालेली जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, पाणी अडविणे व जिरवणे, याबाबत जनतेला प्रोत्साहित करुन लोकसहभाग वाढविणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. अंगड दगडीबांध घालणे, जुनी भातशेती दुरुस्ती करणे, सिमेंट बंधारे बांधणे, मातीचे बंधारे बांधणे, शेततळी बांधणे, जुने बांध दुरुस्त करणे अशी कामे केली जातात.