शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार तहान भागविणार

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

तालुक्यातील पाच गावांमधील ६५ कामे पूर्ण झाली आहेत. चिपळूण तालुक्यातील कोसबी, केतकी, अनारी, गाणे, कात्रोळी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश

सुभाष कदम - चिपळूण -ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यात या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील पाच गावांमधील ६५ कामे पूर्ण झाली आहेत. चिपळूण तालुक्यातील कोसबी, केतकी, अनारी, गाणे, कात्रोळी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. या पाच गावातून ६५ कामे झाली. त्यामध्ये केतकी येथे अंगड दगडी बांध २, सिमेंट बंधारा १, समपातळी सलग चर ८ व शेततळे १ ही कामे झाली आहेत. कोसबीमध्ये ५ अंगड दगडी बांध, २ सिमेंट वळण बंधारे, ३ बंधाऱ्यातील गाळ काढणे, ३ ठिकाणी समपातळी सलग चर मारण्यात आले आहेत. कात्रोळी येथे अंगड दगडी बांध २, शेततळे २, समपातळी सलग चर १५, मसगी २ ही कामे झाली. गाणे येथे अंगड दगडी बांध ५, सिमेंट नाला बंधारा १, सिमेंट वळण बंधारा १, शेततळे १, बंधाऱ्यातील गाळ काढणे १, अनारी येथे अंगड दगडी बांध ८, नाल्यातील गाळ काढणे १ अशी एकूण ६५ कामे झाली आहेत. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करुन पिण्याचे पाणी व विकास संरक्षण सिंचन देण्याची व्यवस्था करता येईल. महाराष्ट्र २०१९ यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावात शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्त्वात असलेली व रिकामी झालेली जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, पाणी अडविणे व जिरवणे, याबाबत जनतेला प्रोत्साहित करुन लोकसहभाग वाढविणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. अंगड दगडीबांध घालणे, जुनी भातशेती दुरुस्ती करणे, सिमेंट बंधारे बांधणे, मातीचे बंधारे बांधणे, शेततळी बांधणे, जुने बांध दुरुस्त करणे अशी कामे केली जातात.