शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात ग्राम ‘निर्मल’ होईना!

By admin | Updated: November 21, 2014 00:38 IST

दोनच तालुके निर्मल : काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता

श्रीकांत चाळके -खेड -जिल्हाभरात अनेक ग्रामपंचायती निर्मल झाल्या असल्या तरी खेडमध्ये १८ ग्रामपंचापयती शौचालयाविना आहेत. जिल्ह्यात केवळ दोन तालुके निर्मल असून, उर्वरित तालुक्यांतील अनेक गावे निर्मल होण्यापासून वंचित आहेत.‘स्वच्छ ग्राम निर्मल ग्राम’ हे घोषवाक्य घेऊन राज्य सरकारने ही योजना सुरू केली़ मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेकांनी राजकीय तसेच स्वत:च्या हिताकडेच जास्त पाहिले़ खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत, ही स्थिती गंभीर नसली तरीही राजकीय स्वार्थापोटी हा आकडा तसाच राहणार असल्याने या योजनेची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.उघड्या जागेवर शौचास बसणे हे कोणत्याही रोगराईस आमंत्रण देण्यासारखे आहे़ याबाबत अनेकांनी अनेक ठिकाणी जनजागृतीही केली. मात्र, याविषयी किती नागरिक जागरूक झाले, हाच संशोधनाचा विषय बनून राहीला आहे. ग्रामीण भागातील हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने ही योजना अमलात आणली. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठे आहे. याचा विचार करून सरकारने या योजनेस मूर्त स्वरूप दिले. साधारणपणे ६ ते ७ वर्षांपूर्वी ही स्थिती गंभीर होती़ आज यामध्ये काही प्रमाणात बदल झाला. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. सरकारी योजनेचा अनेकांनी लाभ घेतला असला तरीही वैयक्तिक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे़ जिल्ह्यात २० टक्के कुटुंब आजही शौचालयाविना आहेत. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपयांचे अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रूपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने २०२२पर्यंत निर्मल भारत अभियानाअंतर्गत ही शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे़ याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून या शौचालयाकरिता प्रस्ताव मागविले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींकडून यासाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचा सूर आळविला जात आहे़ जिल्ह्याची स्थितीजिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायती आजही शौचालयाविना आहेत़ तीन लाख ६४ हजार ९८० कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत. हा आकडा काहीसा कमी झाला असला तरी हे प्रमाण नगण्य आहे़ शौचालयाविना असलेली दारिद्र्यरेखेखालील आणि रेषेवरील कुटुंबांची यादीही हजारोंच्या घरात आहे.शौचालयांविना ग्रामपंचायतीअद्याप जिल्हाभरात ८८ ग्रामपंचायती शौचालयाविना आहेत. या गावात शौचालय बाधणी कधी होणार व गावात शौचालयांची गरज तातडीने पूर्ण केली जाणार का? हा प्रश्न आहे.