शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

खेड तालुक्यात ग्राम ‘निर्मल’ होईना!

By admin | Updated: November 21, 2014 00:38 IST

दोनच तालुके निर्मल : काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता

श्रीकांत चाळके -खेड -जिल्हाभरात अनेक ग्रामपंचायती निर्मल झाल्या असल्या तरी खेडमध्ये १८ ग्रामपंचापयती शौचालयाविना आहेत. जिल्ह्यात केवळ दोन तालुके निर्मल असून, उर्वरित तालुक्यांतील अनेक गावे निर्मल होण्यापासून वंचित आहेत.‘स्वच्छ ग्राम निर्मल ग्राम’ हे घोषवाक्य घेऊन राज्य सरकारने ही योजना सुरू केली़ मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना अनेकांनी राजकीय तसेच स्वत:च्या हिताकडेच जास्त पाहिले़ खेड तालुक्यात १८ ग्रामपंचायतींना अद्याप शौचालये नाहीत, ही स्थिती गंभीर नसली तरीही राजकीय स्वार्थापोटी हा आकडा तसाच राहणार असल्याने या योजनेची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.उघड्या जागेवर शौचास बसणे हे कोणत्याही रोगराईस आमंत्रण देण्यासारखे आहे़ याबाबत अनेकांनी अनेक ठिकाणी जनजागृतीही केली. मात्र, याविषयी किती नागरिक जागरूक झाले, हाच संशोधनाचा विषय बनून राहीला आहे. ग्रामीण भागातील हे चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने ही योजना अमलात आणली. ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण मोठे आहे. याचा विचार करून सरकारने या योजनेस मूर्त स्वरूप दिले. साधारणपणे ६ ते ७ वर्षांपूर्वी ही स्थिती गंभीर होती़ आज यामध्ये काही प्रमाणात बदल झाला. मात्र, याचे प्रमाण नगण्य आहे. सरकारी योजनेचा अनेकांनी लाभ घेतला असला तरीही वैयक्तिक शौचालयांची आकडेवारी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे़ जिल्ह्यात २० टक्के कुटुंब आजही शौचालयाविना आहेत. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रूपयांचे अनुदान, तर निर्मल ग्राम योजनेतून १० हजार रूपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात गुहागर आणि लांजा हे दोन तालुके १०० टक्के हगणदारीमुक्त झाले आहेत. त्यामुळे हे दोन्ही तालुके निर्मल झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने २०२२पर्यंत निर्मल भारत अभियानाअंतर्गत ही शौचालये बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे़ याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून या शौचालयाकरिता प्रस्ताव मागविले असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींकडून यासाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचा सूर आळविला जात आहे़ जिल्ह्याची स्थितीजिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायती आजही शौचालयाविना आहेत़ तीन लाख ६४ हजार ९८० कुटुंबांकडे आजही शौचालये नाहीत. हा आकडा काहीसा कमी झाला असला तरी हे प्रमाण नगण्य आहे़ शौचालयाविना असलेली दारिद्र्यरेखेखालील आणि रेषेवरील कुटुंबांची यादीही हजारोंच्या घरात आहे.शौचालयांविना ग्रामपंचायतीअद्याप जिल्हाभरात ८८ ग्रामपंचायती शौचालयाविना आहेत. या गावात शौचालय बाधणी कधी होणार व गावात शौचालयांची गरज तातडीने पूर्ण केली जाणार का? हा प्रश्न आहे.