शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मुबलक पाण्याचे असमान वाटप

By admin | Updated: July 9, 2014 23:55 IST

भातगाव-कोसबीवाडी : डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

गुहागर : तालुक्यातील भातगाव कोसबीवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. धरणाचा पऱ्या (कोंडी) येथे मुबलक पाणी असूनही या पाण्याचे असमान वाटप होत असल्याने महिलांना पाण्यासाठी कष्ट उपसावे लागत आहेत.सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही काहीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोसबीवाडी ही तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील डिंगणकरवाडी, वेल्येवाडी आणि मराठवाडी या तीन वाड्यांसाठी धरणाचा पऱ्या (कोंडी) या एकाच ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, तीन वाड्यांना होणारे पाणीवाटप सदोष आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे प्रतिदिन माणसी ४० लीटर पाणी मिळायला हवे. मात्र, या ठिकाणी कमी लोकवस्तीला अनावश्यक इतके मोठ्या प्रमाणात पाणी मिळते. त्या तुलनेत जास्त लोकसंख्या असलेल्या डिंगणकरवाडी आणि वेल्येवाडी ग्रामस्थांना अपुरे पाणी दिले जात आहे.निसर्गाने मुबलक दिलेले पाणी मानसिक विषमतेमुळे आपल्याला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी वारंवार केली. तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दि. २ फेब्रुवारी २०१३ व त्यानंतर वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा केला. तत्कालीन तहसीलदारांनी याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. असमान आणि सदोष पाणीवाटपाचा उपअभियंत्यांचा अहवाल आल्यावर त्यापुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांसह नायब तहसीलदार सुहास थोरात, तत्कालीन गटविकास अधिकारी आदींनी पाहणी केली. उपअभियंत्यांनी आपला अहवाल सादर केला. त्यानुसार नैसर्गिक उद्भव असलेल्या उंचावरील ठिकाणाहून वेल्येवाडीपर्यंत चरी मारुन पाणी आणलेले आहे. तिथे बांधलेल्या हौदांमध्ये पाण्याचे विभाजन होते. मराठवाडीतील १११ घरांसाठी २४ तास २८ हजार ८०० लीटर पाणी, तर डिंगणकरवाडीतील २०७ आणि वेल्येवाडीतील ३११ मिळून एकूण ५१८ लोकसंख्येसाठी प्रतिदिन ७ हजार २०० लीटर पाणी दिले जाते. शासनाच्या निकषानुसार मराठवाडीला २४ हजार लीटर अधिकचे पाणी, तर डिंगणकरवाडी व वेल्येवाडीला मिळून १३ हजार ५२० लीटर कमी पाणी मिळते. समान पाणी वाटप झाल्यास दरडोई प्रतिदिन ५७.२० लीटर पाणी मिळू शकेल. या अधिकाऱ्यांचा अहवाल धूळ खात पडला आहे. भर पावसाळ्यातही डिंगणकरवाडीतील महिला डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढत आहेत. (वार्ताहर)