शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक पाण्याचे असमान वाटप

By admin | Updated: July 9, 2014 23:55 IST

भातगाव-कोसबीवाडी : डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

गुहागर : तालुक्यातील भातगाव कोसबीवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील डिंगणकरवाडीतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. धरणाचा पऱ्या (कोंडी) येथे मुबलक पाणी असूनही या पाण्याचे असमान वाटप होत असल्याने महिलांना पाण्यासाठी कष्ट उपसावे लागत आहेत.सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही काहीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोसबीवाडी ही तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील डिंगणकरवाडी, वेल्येवाडी आणि मराठवाडी या तीन वाड्यांसाठी धरणाचा पऱ्या (कोंडी) या एकाच ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, तीन वाड्यांना होणारे पाणीवाटप सदोष आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे प्रतिदिन माणसी ४० लीटर पाणी मिळायला हवे. मात्र, या ठिकाणी कमी लोकवस्तीला अनावश्यक इतके मोठ्या प्रमाणात पाणी मिळते. त्या तुलनेत जास्त लोकसंख्या असलेल्या डिंगणकरवाडी आणि वेल्येवाडी ग्रामस्थांना अपुरे पाणी दिले जात आहे.निसर्गाने मुबलक दिलेले पाणी मानसिक विषमतेमुळे आपल्याला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी वारंवार केली. तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दि. २ फेब्रुवारी २०१३ व त्यानंतर वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा केला. तत्कालीन तहसीलदारांनी याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. असमान आणि सदोष पाणीवाटपाचा उपअभियंत्यांचा अहवाल आल्यावर त्यापुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांसह नायब तहसीलदार सुहास थोरात, तत्कालीन गटविकास अधिकारी आदींनी पाहणी केली. उपअभियंत्यांनी आपला अहवाल सादर केला. त्यानुसार नैसर्गिक उद्भव असलेल्या उंचावरील ठिकाणाहून वेल्येवाडीपर्यंत चरी मारुन पाणी आणलेले आहे. तिथे बांधलेल्या हौदांमध्ये पाण्याचे विभाजन होते. मराठवाडीतील १११ घरांसाठी २४ तास २८ हजार ८०० लीटर पाणी, तर डिंगणकरवाडीतील २०७ आणि वेल्येवाडीतील ३११ मिळून एकूण ५१८ लोकसंख्येसाठी प्रतिदिन ७ हजार २०० लीटर पाणी दिले जाते. शासनाच्या निकषानुसार मराठवाडीला २४ हजार लीटर अधिकचे पाणी, तर डिंगणकरवाडी व वेल्येवाडीला मिळून १३ हजार ५२० लीटर कमी पाणी मिळते. समान पाणी वाटप झाल्यास दरडोई प्रतिदिन ५७.२० लीटर पाणी मिळू शकेल. या अधिकाऱ्यांचा अहवाल धूळ खात पडला आहे. भर पावसाळ्यातही डिंगणकरवाडीतील महिला डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढत आहेत. (वार्ताहर)