शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्ह्यात दोन बिबट्यांचा भूकबळी

By admin | Updated: July 8, 2014 00:19 IST

प्राण्यांची आबाळ : बेसुमार वृक्षतोड अन् वणव्यांनी श्वास कोंडला...

सुभाष कदम ल्ल चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यात वस्ती विरळ आहे. दोन वस्त्यांमधील जंगलांचे प्रमाणही चांगले आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि सतत लागणारे वणवे यामुळे जंगलातील विविध जातीच्या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीआधारे जगणाऱ्या प्राण्यांची सध्या आबाळ झाली आहे. त्यातूनच जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात २ बिबट्यांचा भुकेने मृत्यू झाला आहे.कोकणात देवरहाटी व जंगलाचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी येथे बऱ्यापैकी लागवडही केली जाते. त्यामुळे येथील नैसर्गिक सुबत्ता कायम असून, येथे बऱ्यापैकी गारवा असतो. कोकणातील शेतकऱ्यांची उपजीविका निसर्गावरच चालते. त्यामुळे येथील काही प्रमाणात अर्थकरण जंगलावर अवलंबून आहे. पण बरीचशी जमीन पडीक असल्याने पावसाळ्यात तेथे गवत उगवते. उन्हाळ्यात या गवताला आग लावली जाते. त्यामुळे वणवे भडकतात. अनेक दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ जातीचे पशु-पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. यामुळे या लहान जीवांवर जगणाऱ्या बिबट्यासारख्या मोठ्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ येते. जंगलात उपजीविकेचे साधन नसल्याने बिबटे आता मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. दापोली तालुक्यातील उर्फी गावी एप्रिलमध्ये भुकेने मृत्युमुखी पडलेला बिबट्या आढळला होता. लकवा झाल्याने हा बिबट्या स्वत: शिकार करु शकत नव्हता. त्यामुळे त्याची खाण्याची आबाळ झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.चिपळूण तालुक्यातील पोसरे गावी रविवारी सकाळी अविनाश शिर्के या तरुणावर उपाशीपोटी असलेल्या बिबट्याच्या मादीने झडप घातली. परंतु, हा उपाशी बिबट्या तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकल्यामुळे पोटाला गंभीर इजा झाली व अती रक्तस्त्रावामुळे या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्या उपाशी असल्यामुळेच ही घटना घडली.