शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन बिबट्यांचा भूकबळी

By admin | Updated: July 8, 2014 00:19 IST

प्राण्यांची आबाळ : बेसुमार वृक्षतोड अन् वणव्यांनी श्वास कोंडला...

सुभाष कदम ल्ल चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यात वस्ती विरळ आहे. दोन वस्त्यांमधील जंगलांचे प्रमाणही चांगले आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि सतत लागणारे वणवे यामुळे जंगलातील विविध जातीच्या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीआधारे जगणाऱ्या प्राण्यांची सध्या आबाळ झाली आहे. त्यातूनच जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात २ बिबट्यांचा भुकेने मृत्यू झाला आहे.कोकणात देवरहाटी व जंगलाचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी येथे बऱ्यापैकी लागवडही केली जाते. त्यामुळे येथील नैसर्गिक सुबत्ता कायम असून, येथे बऱ्यापैकी गारवा असतो. कोकणातील शेतकऱ्यांची उपजीविका निसर्गावरच चालते. त्यामुळे येथील काही प्रमाणात अर्थकरण जंगलावर अवलंबून आहे. पण बरीचशी जमीन पडीक असल्याने पावसाळ्यात तेथे गवत उगवते. उन्हाळ्यात या गवताला आग लावली जाते. त्यामुळे वणवे भडकतात. अनेक दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ जातीचे पशु-पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. यामुळे या लहान जीवांवर जगणाऱ्या बिबट्यासारख्या मोठ्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ येते. जंगलात उपजीविकेचे साधन नसल्याने बिबटे आता मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. दापोली तालुक्यातील उर्फी गावी एप्रिलमध्ये भुकेने मृत्युमुखी पडलेला बिबट्या आढळला होता. लकवा झाल्याने हा बिबट्या स्वत: शिकार करु शकत नव्हता. त्यामुळे त्याची खाण्याची आबाळ झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.चिपळूण तालुक्यातील पोसरे गावी रविवारी सकाळी अविनाश शिर्के या तरुणावर उपाशीपोटी असलेल्या बिबट्याच्या मादीने झडप घातली. परंतु, हा उपाशी बिबट्या तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकल्यामुळे पोटाला गंभीर इजा झाली व अती रक्तस्त्रावामुळे या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्या उपाशी असल्यामुळेच ही घटना घडली.