शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यात दोन बिबट्यांचा भूकबळी

By admin | Updated: July 8, 2014 00:19 IST

प्राण्यांची आबाळ : बेसुमार वृक्षतोड अन् वणव्यांनी श्वास कोंडला...

सुभाष कदम ल्ल चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यात वस्ती विरळ आहे. दोन वस्त्यांमधील जंगलांचे प्रमाणही चांगले आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि सतत लागणारे वणवे यामुळे जंगलातील विविध जातीच्या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीआधारे जगणाऱ्या प्राण्यांची सध्या आबाळ झाली आहे. त्यातूनच जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात २ बिबट्यांचा भुकेने मृत्यू झाला आहे.कोकणात देवरहाटी व जंगलाचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी येथे बऱ्यापैकी लागवडही केली जाते. त्यामुळे येथील नैसर्गिक सुबत्ता कायम असून, येथे बऱ्यापैकी गारवा असतो. कोकणातील शेतकऱ्यांची उपजीविका निसर्गावरच चालते. त्यामुळे येथील काही प्रमाणात अर्थकरण जंगलावर अवलंबून आहे. पण बरीचशी जमीन पडीक असल्याने पावसाळ्यात तेथे गवत उगवते. उन्हाळ्यात या गवताला आग लावली जाते. त्यामुळे वणवे भडकतात. अनेक दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ जातीचे पशु-पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. यामुळे या लहान जीवांवर जगणाऱ्या बिबट्यासारख्या मोठ्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ येते. जंगलात उपजीविकेचे साधन नसल्याने बिबटे आता मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. दापोली तालुक्यातील उर्फी गावी एप्रिलमध्ये भुकेने मृत्युमुखी पडलेला बिबट्या आढळला होता. लकवा झाल्याने हा बिबट्या स्वत: शिकार करु शकत नव्हता. त्यामुळे त्याची खाण्याची आबाळ झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.चिपळूण तालुक्यातील पोसरे गावी रविवारी सकाळी अविनाश शिर्के या तरुणावर उपाशीपोटी असलेल्या बिबट्याच्या मादीने झडप घातली. परंतु, हा उपाशी बिबट्या तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकल्यामुळे पोटाला गंभीर इजा झाली व अती रक्तस्त्रावामुळे या बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्या उपाशी असल्यामुळेच ही घटना घडली.