शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विजयदुर्ग-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: November 19, 2014 23:20 IST

प्रमोद जठार : वैभववाडी तालुक्यातील जनसंपर्क दौऱ्यात माहिती

वैभववाडी : विजयदुर्ग-गिर्ये येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारण्यास केंद्र सरकार आणि जेएनपीटी अनुकूल आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय बंदराला पश्चिम महाराष्ट्राशी जोडण्यासाठी विजयदुर्ग- वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी भाजप प्रयत्नशील आहे, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.जनसंपर्क दौऱ्यानिमित्त जठार बुधवारी वैभववाडीत आले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष सुहास सावंत, प्रमोद रावराणे, राजेंद्र राणे, उत्तम सुतार, मनोहर फोंडके, सुधीर नकाशे, रामेश्वर सावंत आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, आंतरराष्ट्रीय बंदरासाठी लागणारी समुद्राची खोली गिर्ये येथे उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शविल्यानंतर बंदर उभारणीसंदर्भात जेएनपीटीने ठराव संमत करून विजयदुर्ग गिर्ये येथे सर्व्हेही सुरू केला आहे. या बंदरामुळे धान्य, मळी, साखर आदी मालाच्या जलवाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरला रेल्वेने जोडण्यासाठी विजयदुर्ग- वैभववाडी- कोल्हापूर हा रेल्वे मार्ग होणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. या मार्गामुळे कमी अंतरात आणि कमीत कमी पुनर्वसनात कोल्हापूर व विजयदुर्ग जोडले जाऊ शकते.गौणखनिजाच्या संदर्भातील न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने गुरूवारी पर्यावरण संचालकांसमवेत मुंबईत बैठक होत आहे. त्यामध्ये आवाज फाऊंडेशनचा मूळ मुद्दा आणि सरसकट घातली गेलेली उत्खनन बंदी यातील फरक पर्यावरण खात्याच्या निदर्शनास आणला जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प, तसेच महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत २० ते २२ दरम्यान संबंधित खात्यांच्या मंत्र्यांच्या भेटी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मी तसेच राजन तेली व अतुल काळसेकर जिल्हा विकासाचे प्रश्न मांडणार आहोत. असे स्पष्ट करतानाच सरकारच्या माध्यमातून विकासनिधी गावागावात पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जठार यांनी सांगितले.जनसंपर्क दौऱ्यानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांना गावांचा विकास आराखडा तयार करून कामांची विभागणी करण्याची सूचना देण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गावात भाजपातर्फे मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील धरणांच्या कालव्यांसाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाणार असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना माजी आमदार राजन तेली, काळसेकर आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)मिरजेत रेल्वे परिषदविजयदुर्ग- गिर्ये येथे आंतरराष्ट्रीय बंदर होऊ घातले जात असतानाच सुरेश प्रभूंना रेल्वे मंत्रालय मिळाले आहे. त्यामुळे विजयदुर्ग- कोल्हापूर रेल्वे मार्ग होण्यासाठी लवकरच मिरज येथे प्रभू यांच्या उपस्थितीत रेल्वे परिषद आयोजित केली जाणार आहे. त्या परिषदेमध्ये कारखानदार, उद्योजक व शेतकऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. परिषदेच्या माध्यमातूनच विजयदुर्ग- कोल्हापूर रेल्वे मार्गाची मागणी रेटण्याची भाजपा प्रयत्न करणार असल्याचे जठार यांनी सांगितले.