शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

हजार प्राथमिक शाळांना टाळे ?

By admin | Updated: February 27, 2016 01:15 IST

कमी पटसंख्येचा फटका : १४ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १ ते २० पटापर्यंतच्या १२४२ प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या शाळांमधील १३९९५ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, त्याचबरोबर या शाळांतील अतिरिक्त ठरणाऱ्या २000 शिक्षकांना कुठे सामावून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, शिक्षकवर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे. डोंगराळ, अतिदुर्गम भागातील अत्यल्प पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आरटीईची फटका बसणार असल्याने शैक्षणिक क्षेत्रात याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे़ ग्रामीण भागातही खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक शाळांची संख्या वाढत चालली असून, त्याकडे पालकवर्ग आकर्षित होत आहे़ तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते़ मात्र, आता खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ चिंता निर्माण करणारी आहे. जिल्हा परिषदेच्या १२४२ प्राथमिक शाळांची स्थिती फार बिकट झाली आहे. १ ते २० पटसंख्या असलेल्या तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पुढील प्रमाणे आहेत. या शाळांमध्ये १ पटसंख्या - ११ शाळा, २ पटसंख्या- ३३ शाळा, ३ पटसंख्या- ४६ शाळा, ४ पटसंख्या- ४६ शाळा, ५ पटसंख्या- ५४ शाळा, ६ पटसंख्या- ७३ शाळा, ७ पटसंख्या- ६७ शाळा, ८ पटसंख्या- ७१ शाळा, ९ पटसंख्या- ६६ शाळा, १० पटसंख्या- ६१ शाळा, ११ पटसंख्या- ९२ शाळा, १२ पटसंख्या- १०० शाळा, १३ पटसंख्या- ७८ शाळा, १४ पटसंख्या- ७९ शाळा, १५ पटसंख्या- ७४ शाळा, १६ पटसंख्या- ७५ शाळा, १७ पटसंख्या- ५६ शाळा, १८ पटसंख्या- ४७ शाळा, १९ पटसंख्या ५३ शाळा आणि २० पटसंख्या असलेल्या ६० शाळा आहेत़ जिल्हा परिषदेकडून पाठ्यपुस्तकांसह गणवेश देऊनही या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ ० ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२४२ प्राथमिक शाळा बंद होणार असून, या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १३९९५ विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. २०पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा वाहतूक खर्च देण्यात येणार आहे. तसेच निवास व्यवस्थाही करण्यात येणार आहे. मात्र, हा शासन निर्णय सर्वच जिल्ह्यांना लागू असला तरी रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. दोन हजार शिक्षक : विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावणार १ ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या १२४२ शाळा लवकरच बंद होऊन त्या शाळांमधील १३९९५ विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावून घेण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. यामुळे सुमारे २००० शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. शाळा बंद झाल्यास या शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग कुठे सामावून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. वेतन देणे परवडणारे नाही... १ ते ६० पटसंख्येच्या शाळांसाठी २ शिक्षक देण्यात येतात. प्रत्येक शिक्षकाला सुमारे ३५ ते ४० हजार रुपये वेतन देण्यात येते. त्यामुळे १ ते ६० शाळांमधील शिक्षकांना वेतन देणे परवडणारे नाही. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देणे परवडेल, असा विचार करून आर्थिक बचत करताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचारच करण्यात आलेला नाही.