शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हजार प्राथमिक शाळांना टाळे ?

By admin | Updated: February 27, 2016 01:15 IST

कमी पटसंख्येचा फटका : १४ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १ ते २० पटापर्यंतच्या १२४२ प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या शाळांमधील १३९९५ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, त्याचबरोबर या शाळांतील अतिरिक्त ठरणाऱ्या २000 शिक्षकांना कुठे सामावून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला असून, शिक्षकवर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे. डोंगराळ, अतिदुर्गम भागातील अत्यल्प पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आरटीईची फटका बसणार असल्याने शैक्षणिक क्षेत्रात याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे़ ग्रामीण भागातही खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक शाळांची संख्या वाढत चालली असून, त्याकडे पालकवर्ग आकर्षित होत आहे़ तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते़ मात्र, आता खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ चिंता निर्माण करणारी आहे. जिल्हा परिषदेच्या १२४२ प्राथमिक शाळांची स्थिती फार बिकट झाली आहे. १ ते २० पटसंख्या असलेल्या तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पुढील प्रमाणे आहेत. या शाळांमध्ये १ पटसंख्या - ११ शाळा, २ पटसंख्या- ३३ शाळा, ३ पटसंख्या- ४६ शाळा, ४ पटसंख्या- ४६ शाळा, ५ पटसंख्या- ५४ शाळा, ६ पटसंख्या- ७३ शाळा, ७ पटसंख्या- ६७ शाळा, ८ पटसंख्या- ७१ शाळा, ९ पटसंख्या- ६६ शाळा, १० पटसंख्या- ६१ शाळा, ११ पटसंख्या- ९२ शाळा, १२ पटसंख्या- १०० शाळा, १३ पटसंख्या- ७८ शाळा, १४ पटसंख्या- ७९ शाळा, १५ पटसंख्या- ७४ शाळा, १६ पटसंख्या- ७५ शाळा, १७ पटसंख्या- ५६ शाळा, १८ पटसंख्या- ४७ शाळा, १९ पटसंख्या ५३ शाळा आणि २० पटसंख्या असलेल्या ६० शाळा आहेत़ जिल्हा परिषदेकडून पाठ्यपुस्तकांसह गणवेश देऊनही या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ ० ते २० पर्यंत पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२४२ प्राथमिक शाळा बंद होणार असून, या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १३९९५ विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. २०पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा वाहतूक खर्च देण्यात येणार आहे. तसेच निवास व्यवस्थाही करण्यात येणार आहे. मात्र, हा शासन निर्णय सर्वच जिल्ह्यांना लागू असला तरी रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. दोन हजार शिक्षक : विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावणार १ ते २० पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या १२४२ शाळा लवकरच बंद होऊन त्या शाळांमधील १३९९५ विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावून घेण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. यामुळे सुमारे २००० शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. शाळा बंद झाल्यास या शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग कुठे सामावून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. वेतन देणे परवडणारे नाही... १ ते ६० पटसंख्येच्या शाळांसाठी २ शिक्षक देण्यात येतात. प्रत्येक शिक्षकाला सुमारे ३५ ते ४० हजार रुपये वेतन देण्यात येते. त्यामुळे १ ते ६० शाळांमधील शिक्षकांना वेतन देणे परवडणारे नाही. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देणे परवडेल, असा विचार करून आर्थिक बचत करताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचारच करण्यात आलेला नाही.