शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

तालुके नऊ, बंब फक्त सहाच..

By admin | Updated: February 1, 2015 00:48 IST

दखलपात्र विषय बेदखल : लांजा, गुहागर, मंडणगडची सुरक्षा ऐरणीवर

रत्नागिरी : जिल्ह्यात नऊ तालुके असले, तर आपत्कालीन संकटाच्या निवारणासाठी शासकीय अग्निशमन बंबांची संख्या केवळ सहाच आहे. पाच नगरपरिषदांकडेच सहा बंब असून, संगमेश्वर, लांजा, मंडणगड, गुहागर हे तालुके या सुविधेपासून वंचितच आहेत. यावरून आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा सुरक्षितेबाबत बेदखल असल्याचे दिसून येत आहे. दापोली तालुक्यातील हर्णै येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे हा विषय पुन्हा एकदा पुढे आला आहे. मात्र जिल्ह्यातील उदासीन राजकीय लोकप्रतिनिधींना अजूनही या विषयाचे गांभीर्य समजलेले नाही. आगीची घटना घडल्यानंतर त्यावर चर्चा होते. पण पुढे कोणतीच हालचाल होत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार वेगाने होत आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे प्रमुख ठिकाण असलेल्या शहरांचाही विस्तार वेगाने होत आहे. आजूबाजुचा परिसरही विकसित होत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी आणि चिपळूणनजीक लोटे येथे औद्योगिक वसाहतही विस्तारलेली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. उन्हाळ्यात वणव्यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. यातून होणारे नुकसानही काही वेळा लक्षणीय असते. रत्नागिरी शहरात रासायनिक उद्योगांचे प्रमाण नगण्य असले, तरी लोटे एम. आय. डी. सी. भागात रासायनिक कारखाने आहेत. यापूर्वी काही भागात तसेच महामार्गावर आगीच्या तसेच वायू गळतीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, या आपत्कालीन घटनांचा सामना करण्यासाठी आवश्यक तेवढी अग्निशमन बंबाची संख्या नसल्याने अनेकदा भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण या चार नगरपरिषदा आणि दापोली नगरपंचायतीकडे स्वत:ची अग्निशामक यंत्रणा कार्यरत आहे. चिपळूणला दोन अग्निशमन बंब आहेत. मात्र, ही यंत्रणा पुरेशी नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले. संगमेश्वर, लांजा, गुहागर आणि मंडणगड या तालुक्यांकडे तर ही यंत्रणाच नाही. आपत्कालीन परिस्थितीत नजिकच्या तालुक्याचा आधार घेऊन बंबाची मागणी करावी लागते. यासाठी वेळही बराच लागतो. शहराच्या विस्ताराबरोबरच विकासाचीही प्रक्रिया होत असल्याने, आपत्कालीन परिस्थितीत केवळ एकच बंब अपुरा पडतो. परिणामी अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खासगी कंपन्यांच्या सुरक्षायंत्रणेचा आधार घ्यावा लागतो. रत्नागिरी परिसरात अशी घटना घडल्यास नजीकच्या फिनोलेक्स व जिंदाल कंपनीच्या बंबांची गरज भासते. चिपळूणातही काही वेळा नगरपरिषदेचे दोन बंब अपुरे पडतात. त्यामुळे, येथील एमआयडीसी आणि खासगी कंपन्यांकडील अग्निशमन यंत्रणेचा आधार घ्यावा लागतो, हे दुर्दैव आहे. (प्रतिनिधी)