शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन कोलमडलेलेच..

By admin | Updated: September 4, 2014 23:34 IST

आपत्ती आहे, व्यवस्थापन नाही : दोन विभाग आणि आठ तालुके व्यवस्थापन अधिकाऱ्याविना

रत्नागिरी : राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटना घडत आहेत. मात्र, याबाबत राज्य शासनामध्ये एवढी उदासीनता आहे की ६ विभागापैकी २ विभागात अद्याप विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयच नाही. यात माळीणसारखी दुर्घटना घडलेल्या पुणे आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच ३३ जिल्ह्यांपैकी ८ जिल्ह्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीच नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कोलमडले आहे. विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी २००३ साली राष्ट्रीय विकास कार्यक्रम (यु. एन. डी, पी.) आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील बहुआपत्तीप्रवण १४ जिल्ह्यात व ७ महानगर पालिकांमध्ये राबविण्यात आला. यात जिल्हा, तालुका व गाव आपत्ती व्यवस्थापन समिती व आराखडे तयार करणे, जनजागृती, प्रशिक्षण, शालेय सुरक्षा कार्यक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण, गवंडी व वास्तू विशारदांना प्रशिक्षण, शोध व बचाव पथक, प्रथमोपचार पथक निर्मिती, रंगीत तालीम यांचा समावेश होता. हा कार्यक्रम संपल्यावर २००९ मध्येच राज्य शासनाने १४ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम (एम. डी. आर. एम.) राबवण्याचा निर्णय घेतला. जून २०१० पासून या कार्यक्रमाची (एम. डी. आर. एम.) अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व प्रत्येक जिल्ह्यात म्हणजेच ३४ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशी ४० पदे निर्माण करण्यात आली. असे असूनही अनेक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी स्वतंत्र पदनिर्मितीच न करण्यात आल्याने या प्राधिकरणाचा राज्यभर बोजवारा झाला आहे. राज्यातील सहा विभागांपैकी केवळ दोन विभागातच विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी नियुक्ती झाली असून, उर्वरित ४ मध्ये अद्याप नियुक्तीच केलेली नाही. काही विभागात जिल्हा स्तरावरील अधिकारीच नाही. खरतर या अधिकाऱ्यालाकडेच जिल्हा स्तरावरील कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी असते. पण काही जिल्ह्यात हे पदच रिक्त आहे. मुख्य म्हणजे या अधिकाऱ्यांना मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु त्यांचे मार्च १४ पर्यंतचेच वेतन दिले गेले आहे.राज्यात आपत्तीच्या घटना घडत असताना जनजागृती, सुरक्षा कार्यक्रम घेणारे आपत्ती व्यवस्थापनच कोलमडून पडले आहे. (प्रतिनिधी)औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण या चार विभागात विभागीय अधिकारी आहेत. पुणे आणि नाशिक येथे हे पद रिक्त आहे.विभागअधिकारी असलेले जिल्हेअधिकारी नाहीपुणेसातारा, सांगली, कोल्हापूर,पुणे, सोलापूर----------औरंगाबादपरभणी, लातूर, बीड, हिंगोली, जालना,औरंगाबाद, लातूर.उस्मानाबादनागपूरभंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर.गोंदिया, वर्धा.अमरावतीअकोला, यवतमाळ, वाशिम बुलढाणा, अमरावतीनाशिकनाशिक, नगर, धुळे, जळगाव.नंदुरबारकोकण रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे (मुंबई-----------शहर व उपनगरासाठी स्वतंत्र )