शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Satara Bus Accident : अस्वस्थता... हळहळ आणि नियतीचा काळा पडदा दापोलीवर पांघरलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:31 IST

शनिवार, २८ जुलै २०१८ नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलो. बायको विद्यापीठात परीक्षा विभागात कार्यरत असल्याने तिला चौथ्या शनिवारची सुट्टी होती. माझी कार सर्व्हिसिंग करायची असल्याने सुशांत जाधव नावाच्या शिपायाला सोबत घेऊन गेलो. येत असताना त्याने हेमंत पुळेकरच्या बाईक रिपेरिंगच्या दुकानासमोर गाडी थांबवली आणि विचारले ह्यउद्याचे रघुवीर घाटात जायचे फिक्स ना? समोरुन होकार आला.

ठळक मुद्देअस्वस्थता... हळहळ आणि नियतीचा काळा पडदा दापोलीवर पांघरलेलाकाळोखाला काळी किनार गडद

प्रा. कैलास गांधीदापोली : शनिवार, २८ जुलै २०१८ नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहोचलो. बायको विद्यापीठात परीक्षा विभागात कार्यरत असल्याने तिला चौथ्या शनिवारची सुट्टी होती. माझी कार सर्व्हिसिंग करायची असल्याने सुशांत जाधव नावाच्या शिपायाला सोबत घेऊन गेलो. येत असताना त्याने हेमंत पुळेकरच्या बाईक रिपेरिंगच्या दुकानासमोर गाडी थांबवली आणि विचारले उद्याचे रघुवीर घाटात जायचे फिक्स ना? समोरुन होकार आला.कॉलेजात जाताच क्षणी विद्यापीठातील ग्रुपचे देवाचा डोंगर येथे जाण्याचे ठरल्याचे आठवले म्हणून बायकोला फोन करून खातरजमा केली. ती म्हणाली पुढच्या महिन्यात जायचे आहे. विकी (म्हणजे विक्रम शिंदे) सांगणार आहे. आज ते महाबळेश्वरला गेले आहेत. साधारणत: अर्धा तास वगैरे कालावधी गेला असेल बायकोचा फोन परत आला. तिने थरथरत्या आवाजात सांगितले की, विद्यापीठाच्या ट्रीप गेलेल्या गाडीला अपघात झालाय, असे कळते आहे.

प्रकाश सावंतदेसाई वर आलेत, त्यांनी ही माहिती दिलीय. नेहमीप्रमाणे खात्री करण्याची सवय असल्याने मी तिला प्रकाशच्या बायकोला म्हणजे सुषमाला फोन करुन विचारणा करण्याचे सांगितले. मीसुद्धा फोन करायला सुरुवात केली.

प्रकाश इतरांना फोन लावण्यात कार्यरत असेल, त्यामुळे संदीप सुवरेला फोन करायला सुरुवात केली. मात्र, त्याचा फोन एंगेज लागत होता. माझ्या बाजूने जात असलेल्या माझी सहकारी प्राध्यापक प्रियांका साळवी - कदम हिने विचारणा केली. सर! काय झालं? मी ओघात बोलून गेलो विद्यापीठाच्या बसला अपघात झालाय! तिने लगेच विचारलं, सर कोणत्या बसला? मी म्हणालो, आज एक ट्रीप गेली होती, महाबळेश्वरला त्या बसला. ती यावर घाबरली म्हणाली, अरे देवा! त्याच्यात पंकज म्हणजे तिचा नवरादेखील आहे.

मी तिला समजावलं फार काही गंभीर नसावं, पण तिथे आपल्याकडील कुणीच नसल्याने निश्चित काही कळत नाही. मी फोनाफोनी करत होतो. कुलगुरुंचे स्वीय सहाय्यक दुसाने सर यांना फोन लागला, ते म्हणाले, आम्ही खेडपर्यंत पोहोचलो आहोत. जागेवर गेल्याशिवाय परिस्थितीचा अंदाज येणार नाही. तेवढ्यात पुन्हा बायकोचा फोन आला.

कुणीतरी चौघेजण वर आलेत असे म्हणतात. आशावाद बळावला, मी फोन ठेवतोय तोच प्रा. प्रिया करमरकर सांगत आली की, प्रियांका रडते आहे. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, पंकजचा फोन लागत नाही. मी तिला तिकडे रेंजचा प्रॉब्लेम असणार असे सांगितले.

मी तिला घरी सोडतो, तू घरी जा, म्हणजे आपल्या माणसात तुझा ताण कमी होईल आणि तळमजल्यावर आलो तेव्हा लक्षात आले की, आपण आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकलीय. लगेच प्रा. श्याम साठे यांच्या गाडीच्या किल्ल्या मागायला गेलो, तेव्हा तोही याबाबत अनभिज्ञ होता. त्याच्याकडील किल्ल्या घेऊन सोबत राजेंद्र मोरे याला तसेच दोन महिला सहकाऱ्यांना घेऊन प्रियांकाला घरी सोडायला निघालो. वाटेतच पुन्हा बायकोचा फोन आला, अरे असं म्हणताहेत सगळे सुखरुप आहेत. मी प्रियांकाला गाडीतून उतरवताना ही खबर दिली व मला जशी माहिती मिळेल, तसे कळवतो, असे आश्वासन दिले.तेवढ्यात शिपाई शिवगण धावतच सांगत आले, गांधी सर सात जणांचे मृतदेह बाहेर काढलेत, असे बातम्यात दाखवताहेत. माझ्या पायाखालची वाळू सरकली. खोटा आशावाद संपत चालला होता. कारण ज्या दरीचा फोटो बातम्यात दाखवत होते, ते पाहाता त्या दरीची खोली लक्षात येत होती आणि सर्व आशावादी शक्यतांवर महाबळेश्वरहून अधिक घट्ट धुके पसरत चालले होते आणि ते विरळ होण्याऐवजी क्षणाक्षणाला गडद आणि काळे होत चालले होते.

संध्याकाळी काळोखाला काळी किनार गडद होत असताना विकी शिंदे, राजू रिसबुड याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आल्याचा विद्यापीठातील मित्र सचिन कदम याचा फोन आला. त्यामुळे प्रज्ञा (बायको)ला घेऊन तिकडे गेलो. अख्खी दापोली तेथे लोटली होती. गाडी पार्क करुन रुग्णालयात गेलो तेव्हा एक एक अ‍ॅम्ब्युलन्स १५-२० मिनिटांनी येत होती. सायरनचा आवाज असह्य होऊ लागला होता. खूप काही गमावल्याची जाणीव काळजाला चरे पाडत होती.गाडी खाली गेलेय...विकी शिंदेला फोन केला तरी परिस्थिती बदलली नाही. प्रकाश सावंतदेसाई, जयंत चोगले, राजू बंडबे, संतोष जालगावकर, हेमंत शिंदे सगळ्यांचे फोन बिझी येत होते. स्वाभाविक ही सर्व मंडळी कदाचित आपण सुखरुप आहोत, हे आप्तस्वकियांना कळवत असतील, असा आशावाद बळावला. तेवढ्यात बायकोचा फोन आला, सुषमाशी बोलणं झालंय प्रकाश बरा आहे, पण तो म्हणतोय गाडी खाली दरीत गेलीय आणि त्यात सगळेजण आहेत.क्षणभर कुणालाच काही कळलं नाहीकुलगुरुंचे स्वीय सहाय्यक दुसाने सर यांना फोन लागला, ते म्हणाले, आम्ही खेडपर्यंत पोहोचलो आहोत. जागेवर गेल्याशिवाय परिस्थितीचा अंदाज येणार नाही. प्रियांका बाजूला फारच अस्वस्थ झाली होती. ती ओक्साबोक्सी रडत मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटकडे धावत गेली. याविषयी गंभीरता पसरली नसल्याने कुणाच्या ते लक्षात आलं नाही.  मी महिला सहकाऱ्यांना प्रियांका कुठे आहे, पहा, असे सांगितल्यावर त्यांना कळलं नाही, सर असे का सांगत आहेत.साऱ्यांनीच बातम्या पाहायला सुरुवात केलीतिला सोडून परत येताना पुन्हा प्रज्ञाचा फोन आला, अरे एकटे प्रकाश सावंतदेसाई वाचलेत, बाकीचे सर्व गेलेत, असं म्हणताहेत. मी तिला म्हणालो, मलाही असं कळलंय. पण ही अफवादेखील असू शकते, तू शांत राहा. मात्र, कॉलेजला पोचलो तेव्हा कार्यालय व प्राचार्यांनी बातम्या पाहायला सुरुवात केली होती. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी