शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Satara Bus Accident शोकसागरात बुडाले दापोलीकर, कमवता माणूसच गेल्याचे दु:ख, चिमुकल्या लेकरांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:13 IST

आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे.

ठळक मुद्दे मृतदेह घरी येताच कुटुंबियांनी फोडला हंबरडा, अनेकांचे हात सरसावलेअंत्यसंस्काराला प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती

रत्नागिरी : सकाळी ते घरातून सांगून बाहेर पडले... घरी परतणारच नाही, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती... घरी येणाऱ्या माणसाच्या मृत्यूची बातमी आली आणि सारेच हादरून गेले. आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे.

संतोष जालगावकर हे (वडाचा कोंड) शिक्षण संचालनालय कार्यालयात काम करत होते. सचिन गिम्हवणेकर (गिम्हवणे) हे संशोधन संचालक कार्यालयात, तर सुनील कदम हे (विद्यापीठ कॉलनी, मूळ खेर्डी) अधीक्षक, निम्नस्तर शिक्षण विभागात काम करत होते. हे तिघे सहलीसाठी शनिवारी आपल्या मित्रांसमवेत गेले होते. मात्र, आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत या तिघांचा मृत्यू झाला.

सचिन गिम्हवणेकर यांच्या घरी पत्नी, आई, भाऊ आणि श्रीशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा भाऊ हंगामी कर्मचारी म्हणून विद्यापीठात काम करत आहे. त्यांचा मृतदेह शनिवारीच ताब्यात देण्यात आला होता. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यापीठाच्या वस्तू भंडार सोसायटीवर सचिव म्हणून ते काम करत होते. तसेच दापोली रोहिदास समाजन्नोती मंडळाचे सचिव म्हणूनही काम करत होते.संतोष जालगावकर यांचा कुटुंबाला मोठा आधार होता. त्यांच्या घरी वयोवृद्ध आई, पत्नी, पारस व पराग ही दोन मुले आहेत. पारस हा नववीत, तर पराग हा सातवी शिकत आहे. त्यांचा मृतदेह आज (रविवारी) त्यांच्या घरी आणण्यात आला. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने त्याठिकाणी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील कदम यांच्या घरी पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. पत्नी खेर्डी येथील पोस्टात काम करत आहे. त्यांचा एक मुलगा लांजा येथे एका बँकेत उपशाखाधिकारीपदावर काम करत आहे. दुसरा मुलगा मुंबई येथे एमसीए करत असून, मुलीने पीएच.डी. केली असून, हंगामी तत्त्वावर ती विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करत आहे. त्यांचा मृतदेहदेखील आजच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खेर्डी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आधारच हरपलाआंबेनळी अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष जालगावकर आणि सचिन गिम्हवणेकर हे त्यांच्या कुटुंबांचा आधार होते. वडिलांच्या पश्चात त्यांनीच आपल्या घराला सावरले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांच्या कुटुंबियांचा आधारच हरपला आहे. पत्नींच्या पदरात चिमुकली लेकर देऊन ते काळाच्या पडद्याआड निघून गेले. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी