शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Satara Bus Accident शोकसागरात बुडाले दापोलीकर, कमवता माणूसच गेल्याचे दु:ख, चिमुकल्या लेकरांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:13 IST

आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे.

ठळक मुद्दे मृतदेह घरी येताच कुटुंबियांनी फोडला हंबरडा, अनेकांचे हात सरसावलेअंत्यसंस्काराला प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती

रत्नागिरी : सकाळी ते घरातून सांगून बाहेर पडले... घरी परतणारच नाही, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती... घरी येणाऱ्या माणसाच्या मृत्यूची बातमी आली आणि सारेच हादरून गेले. आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे.

संतोष जालगावकर हे (वडाचा कोंड) शिक्षण संचालनालय कार्यालयात काम करत होते. सचिन गिम्हवणेकर (गिम्हवणे) हे संशोधन संचालक कार्यालयात, तर सुनील कदम हे (विद्यापीठ कॉलनी, मूळ खेर्डी) अधीक्षक, निम्नस्तर शिक्षण विभागात काम करत होते. हे तिघे सहलीसाठी शनिवारी आपल्या मित्रांसमवेत गेले होते. मात्र, आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत या तिघांचा मृत्यू झाला.

सचिन गिम्हवणेकर यांच्या घरी पत्नी, आई, भाऊ आणि श्रीशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा भाऊ हंगामी कर्मचारी म्हणून विद्यापीठात काम करत आहे. त्यांचा मृतदेह शनिवारीच ताब्यात देण्यात आला होता. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यापीठाच्या वस्तू भंडार सोसायटीवर सचिव म्हणून ते काम करत होते. तसेच दापोली रोहिदास समाजन्नोती मंडळाचे सचिव म्हणूनही काम करत होते.संतोष जालगावकर यांचा कुटुंबाला मोठा आधार होता. त्यांच्या घरी वयोवृद्ध आई, पत्नी, पारस व पराग ही दोन मुले आहेत. पारस हा नववीत, तर पराग हा सातवी शिकत आहे. त्यांचा मृतदेह आज (रविवारी) त्यांच्या घरी आणण्यात आला. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने त्याठिकाणी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील कदम यांच्या घरी पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. पत्नी खेर्डी येथील पोस्टात काम करत आहे. त्यांचा एक मुलगा लांजा येथे एका बँकेत उपशाखाधिकारीपदावर काम करत आहे. दुसरा मुलगा मुंबई येथे एमसीए करत असून, मुलीने पीएच.डी. केली असून, हंगामी तत्त्वावर ती विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करत आहे. त्यांचा मृतदेहदेखील आजच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खेर्डी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आधारच हरपलाआंबेनळी अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष जालगावकर आणि सचिन गिम्हवणेकर हे त्यांच्या कुटुंबांचा आधार होते. वडिलांच्या पश्चात त्यांनीच आपल्या घराला सावरले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांच्या कुटुंबियांचा आधारच हरपला आहे. पत्नींच्या पदरात चिमुकली लेकर देऊन ते काळाच्या पडद्याआड निघून गेले. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी