शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

Satara Bus Accident शोकसागरात बुडाले दापोलीकर, कमवता माणूसच गेल्याचे दु:ख, चिमुकल्या लेकरांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 17:13 IST

आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे.

ठळक मुद्दे मृतदेह घरी येताच कुटुंबियांनी फोडला हंबरडा, अनेकांचे हात सरसावलेअंत्यसंस्काराला प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती

रत्नागिरी : सकाळी ते घरातून सांगून बाहेर पडले... घरी परतणारच नाही, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती... घरी येणाऱ्या माणसाच्या मृत्यूची बातमी आली आणि सारेच हादरून गेले. आंबेनळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष उत्तम जालगावकर आणि सचिन मोतिराम गिम्हवणेकर हे कुटुंबाचे कर्ते पुरूषच काळाने हिरावून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात पडला आहे.

संतोष जालगावकर हे (वडाचा कोंड) शिक्षण संचालनालय कार्यालयात काम करत होते. सचिन गिम्हवणेकर (गिम्हवणे) हे संशोधन संचालक कार्यालयात, तर सुनील कदम हे (विद्यापीठ कॉलनी, मूळ खेर्डी) अधीक्षक, निम्नस्तर शिक्षण विभागात काम करत होते. हे तिघे सहलीसाठी शनिवारी आपल्या मित्रांसमवेत गेले होते. मात्र, आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत या तिघांचा मृत्यू झाला.

सचिन गिम्हवणेकर यांच्या घरी पत्नी, आई, भाऊ आणि श्रीशा ही दोन वर्षांची मुलगी आहे. त्यांचा भाऊ हंगामी कर्मचारी म्हणून विद्यापीठात काम करत आहे. त्यांचा मृतदेह शनिवारीच ताब्यात देण्यात आला होता. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यापीठाच्या वस्तू भंडार सोसायटीवर सचिव म्हणून ते काम करत होते. तसेच दापोली रोहिदास समाजन्नोती मंडळाचे सचिव म्हणूनही काम करत होते.संतोष जालगावकर यांचा कुटुंबाला मोठा आधार होता. त्यांच्या घरी वयोवृद्ध आई, पत्नी, पारस व पराग ही दोन मुले आहेत. पारस हा नववीत, तर पराग हा सातवी शिकत आहे. त्यांचा मृतदेह आज (रविवारी) त्यांच्या घरी आणण्यात आला. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने त्याठिकाणी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील कदम यांच्या घरी पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. पत्नी खेर्डी येथील पोस्टात काम करत आहे. त्यांचा एक मुलगा लांजा येथे एका बँकेत उपशाखाधिकारीपदावर काम करत आहे. दुसरा मुलगा मुंबई येथे एमसीए करत असून, मुलीने पीएच.डी. केली असून, हंगामी तत्त्वावर ती विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करत आहे. त्यांचा मृतदेहदेखील आजच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खेर्डी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आधारच हरपलाआंबेनळी अपघातात मृत्युमुखी पडलेले संतोष जालगावकर आणि सचिन गिम्हवणेकर हे त्यांच्या कुटुंबांचा आधार होते. वडिलांच्या पश्चात त्यांनीच आपल्या घराला सावरले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांच्या कुटुंबियांचा आधारच हरपला आहे. पत्नींच्या पदरात चिमुकली लेकर देऊन ते काळाच्या पडद्याआड निघून गेले. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरी