शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

प्रासंगिक; भावनिक अनुभूतीतून साहित्यनिर्मिती

By admin | Updated: November 18, 2014 23:24 IST

श्रीकृष्ण जोशी : वाचकगट उपक्रमांतर्गत ‘लोक आपल्या भेटीला’ कार्यक्रम

रत्नागिरी : मानवी आयुष्य हे विविध कंगोऱ्यांनी युक्त आहे. आपल्या आजुबाजुला सातत्याने घडत असलेल्या प्रसंगांशी एकरुप होऊन त्या प्रसंगाची भावनिक अनुभूती घेतल्यास आपण उत्तम अशी साहित्यनिर्मिती करु शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘वाचक गट’ उपक्रमांतर्गत ‘लोक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात डॉ. जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्दितीय वर्ष कला शाखेतील रेणुका जोशी व बारावीचा विद्यार्थी अथर्व भावे यांनी मुलाखत घेतली.डॉ. जोशी यांचा शालेय जीवनापासून लेखन प्रवास सुरु झाला. महाविद्यालयीन जीवनात त्याला विस्तृत रुप प्राप्त झाले. सुरुवातीला आई-वडील आणि समाजातील तत्कालीन मान्यवरांनी त्यांच्या लेखनाला सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे सातत्याने घरच्या मंडळींनी लेखनाचे कौतुक केल्याने लेखनाला चालना मिळाली, असे जोशी म्हणाले. ‘शेंबी’ ही पहिली कादंबरी. या कादंबरीचे नावही त्यांच्या मातोश्रींनी सुचवले होते. त्यानंतर विविध अशा २५ साहित्यकृती लिहिल्या गेल्या. यामध्ये मार्शिलँड, कातळ, भोवरा इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ‘डेथ आॅफ कॉमन सेन्स’ या नभोनाट्याला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच आकाशवाणीकरिताही त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांनी संगीत नाटकांचीही निर्मिती केली आहे. यातील काही नाटकांना विविध स्तरावर पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. याखेरीज ललीत लेखन, विडंबन काव्य इत्यादी साहित्यही त्यांनी लिहिले आहे.आपल्याला शं. ना. नवरे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, जयवंत दळवी भावत असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात आलेल्या अनुभवांचे त्यांनी काव्यरुपी लेखन केले असून, ‘खडूचे अभंग’ या नावाने हा संग्रह लवकरच प्रकाशित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला ग्रंथपाल किरण धांडोरे, ग्रंथालयाचे लिपिक राजेंद्र यादव आणि वाचक गटाचे विद्यार्थी उपस्थित होते. उत्पल वाकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जोशी म्हणतात...सातत्याने घरच्या मंडळींनी लेखनाचे कौतुक केल्याने लेखनाला चालना मिळाली.आजुबाजुला सातत्याने घडत असलेल्या प्रसंगांशी एकरुप होऊनभावनिक अनुभूती घेतल्यास उत्तम साहित्यिक बनण्याची संधी.‘शेंबी’ या पहिल्या कादंबरीचे नाव मातोश्रींनी सुचवले.