शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रासंगिक; भावनिक अनुभूतीतून साहित्यनिर्मिती

By admin | Updated: November 18, 2014 23:24 IST

श्रीकृष्ण जोशी : वाचकगट उपक्रमांतर्गत ‘लोक आपल्या भेटीला’ कार्यक्रम

रत्नागिरी : मानवी आयुष्य हे विविध कंगोऱ्यांनी युक्त आहे. आपल्या आजुबाजुला सातत्याने घडत असलेल्या प्रसंगांशी एकरुप होऊन त्या प्रसंगाची भावनिक अनुभूती घेतल्यास आपण उत्तम अशी साहित्यनिर्मिती करु शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘वाचक गट’ उपक्रमांतर्गत ‘लोक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात डॉ. जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व्दितीय वर्ष कला शाखेतील रेणुका जोशी व बारावीचा विद्यार्थी अथर्व भावे यांनी मुलाखत घेतली.डॉ. जोशी यांचा शालेय जीवनापासून लेखन प्रवास सुरु झाला. महाविद्यालयीन जीवनात त्याला विस्तृत रुप प्राप्त झाले. सुरुवातीला आई-वडील आणि समाजातील तत्कालीन मान्यवरांनी त्यांच्या लेखनाला सातत्याने प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. अशा प्रकारे सातत्याने घरच्या मंडळींनी लेखनाचे कौतुक केल्याने लेखनाला चालना मिळाली, असे जोशी म्हणाले. ‘शेंबी’ ही पहिली कादंबरी. या कादंबरीचे नावही त्यांच्या मातोश्रींनी सुचवले होते. त्यानंतर विविध अशा २५ साहित्यकृती लिहिल्या गेल्या. यामध्ये मार्शिलँड, कातळ, भोवरा इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ‘डेथ आॅफ कॉमन सेन्स’ या नभोनाट्याला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच आकाशवाणीकरिताही त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांनी संगीत नाटकांचीही निर्मिती केली आहे. यातील काही नाटकांना विविध स्तरावर पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. याखेरीज ललीत लेखन, विडंबन काव्य इत्यादी साहित्यही त्यांनी लिहिले आहे.आपल्याला शं. ना. नवरे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, जयवंत दळवी भावत असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात आलेल्या अनुभवांचे त्यांनी काव्यरुपी लेखन केले असून, ‘खडूचे अभंग’ या नावाने हा संग्रह लवकरच प्रकाशित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला ग्रंथपाल किरण धांडोरे, ग्रंथालयाचे लिपिक राजेंद्र यादव आणि वाचक गटाचे विद्यार्थी उपस्थित होते. उत्पल वाकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जोशी म्हणतात...सातत्याने घरच्या मंडळींनी लेखनाचे कौतुक केल्याने लेखनाला चालना मिळाली.आजुबाजुला सातत्याने घडत असलेल्या प्रसंगांशी एकरुप होऊनभावनिक अनुभूती घेतल्यास उत्तम साहित्यिक बनण्याची संधी.‘शेंबी’ या पहिल्या कादंबरीचे नाव मातोश्रींनी सुचवले.