शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी मनोरूग्णालय अधीक्षकपद रिक्त

By admin | Updated: August 31, 2014 23:30 IST

दीड वर्ष वालीच नाही : वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची फरपट

रत्नागिरी : शहरातील मनोरूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची बदली झाली असल्याने गेले दीड वर्ष हे पद रिक्त आहे. भूलतज्ज्ञांकडे प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय मनोरूग्णालयात वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे रूग्णांना जिल्हा शासकीय रूग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे सध्या कर्मचारी व रूग्णांची अक्षरश: फरपट होत आहे.मानसिक स्थिती असंतुलित असणाऱ्या रूग्णांसाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालय १८८६ मध्ये स्थापन झाले. ब्रिटिशकालीन मनोरूग्णालयात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांवर उपचार केले जातात. सुरूवातीला विद्युतशॉक पध्दती अवलंबण्यात येत होती. मात्र, कालांतराने त्यामध्ये बदल झाला असून, अ‍ॅडव्हॉन्स उपचार पध्दती अवलंबविण्यात येत आहे.ऐश्चिक व पोलिसांमार्फत या ठिकाणी रूग्ण दाखल केले जातात. मात्र, १८ वर्षांपुढे असणाऱ्या रूग्णांवर याठिकाणी उपचार केले जात आहेत. १८ वर्षांखालील रूग्णांवर उपचार करताना त्याच्या नातेवाईकांना सोबत ठेवले जाते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १८ वर्षांपुढील रुग्णांना उपचार देताना त्यांच्याशी समुपदेशन साधून त्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न अधिक केला जातो. जेणेकरून त्यांच्याबद्दल माहिती मिळविली जाते. परराज्यातील रूग्णाचा पत्ता शोधण्यासाठी कार्यालयीन कामानंतर इंटरनेटवर सर्च केले जाते. आदिवासी समाजातील रूग्ण असतात, तेव्हा मात्र अडचण निर्माण होते.काही रूग्ण असे असतात की, त्यांना खाण्याचेही भान नसते. त्यांना शिकवावे लागते. काहीजण बरे झाल्यानंतर घरी जातात. मात्र, काहींना नातेवाईक स्विकारतच नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना, पोलीसपाटील, सरपंच यांच्यामार्फत समज देऊन ताब्यात देण्यात येते. काही गुन्हेगारीक्षेत्रातून मनोरूग्ण दाखल केले जातात. त्यांना नातेवाईक ताब्यात घेण्यास धजावत नाहीत, तेव्हा समज देऊन ताब्यात देण्यात येतात. काही रूग्ण बरे होतात. मात्र, त्यांचे नातेवाईक सापडत नाहीत. अशावेळी या व्यक्तिंना मनोरूग्णालयातच ठेवून घेतले जाते. असे असताना अधीक्षकपद रिक्त असणे किंवा वैद्यकीय अधिकारी नसणे, याबाबत रूग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालिन अधीक्षक डॉ. राजेंद्र शिरसाट यांची बदली मार्च २0१३ मध्ये झाल्यानंतर भूलतज्ज्ञ माने यांच्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. परजिल्ह्यातून खासगी वाहनाने रूग्ण उपचारासाठी आणला जातो. भूलतज्ज्ञाकडून तात्पुरते उपचार केले जात असले तरी ते प्रभावी नाहीत. त्यामुळे दीड वर्ष पद रिक्त असणे आश्चर्यकारक गोष्ट आहे. याबाबत डॉ. माने यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसापूर्वी जिल्हा शासकीय रूग्णालयातील डॉ. पराग पाथरे यांच्याकडे प्रभारी अधीक्षकपदाची धुरा देण्यात आली आहे.मनोरूग्णालयासाठी पाच आरोग्य अधिकारी पद मंजूर असताना याठिकाणी एकही आरोग्य अधिकारी उपलब्ध नाही. शासनाकडून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोरूग्ण आजारी पडला तर त्यास जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. एकूणच कर्मचाऱ्यांनाच त्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. डॉ. पाथरे एकटे बाह्यरूग्ण व अंतर्गत रूग्णांवर उपचार कसे करू शकतील? एकूण पाच वैद्यकीय अधिकारी व एक अधीक्षक मिळून सहा डॉक्टरांची जबाबादारी सांभाळणे अवघड आहे. त्यामुळे नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)भूलतज्ज्ञांकडे अधीक्षकांची जबाबदारी पुरूष रूग्ण १३६ ते १४०स्त्री रूग्ण ६६ ते ७०, ७५ ते ८५ वयोगटातील रूग्ण ४० ते ४५वृध्द थकलेले रूग्ण ६ ते ८परजिल्ह्यातील ६० टक्के रूग्णपरराज्यातील २० रूग्ण, बाह्यरूग्ण कक्षात दररोज ८० ते ११० रूग्ण उपचार घेतात. असे असतानाही या महत्वाच्या मनोरुग्णालयात अधीक्षक नसावेत हे दुर्दैवी आहे. भूलतज्ज्ञांकडे अधीक्षकांची जबाबदारी पुरूष रूग्ण १३६ ते १४०स्त्री रूग्ण ६६ ते ७०, ७५ ते ८५ वयोगटातील रूग्ण ४० ते ४५वृध्द थकलेले रूग्ण ६ ते ८परजिल्ह्यातील ६० टक्के रूग्णपरराज्यातील २० रूग्ण, बाह्यरूग्ण कक्षात दररोज ८० ते ११० रूग्ण उपचार घेतात. असे असतानाही या महत्वाच्या मनोरुग्णालयात अधीक्षक नसावेत हे दुर्दैवी आहे.