शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
5
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
6
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
7
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
8
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
9
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
10
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
11
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
12
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
13
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
14
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
15
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
16
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
17
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
18
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
19
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
20
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...

पावसाने दिले, पावसानेच हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

रत्नागिरी जिल्ह्याचे भात हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात जिल्ह्यात ठिकठिकाणी लागवड केलेली ...

रत्नागिरी जिल्ह्याचे भात हे मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात जिल्ह्यात ठिकठिकाणी लागवड केलेली भातशेती वाहून गेली. शिवाय पुराचे पाणी भात खाचरात साचले. पाण्यासह चिखल येऊन साचल्याने लागवड केलेल्या भातक्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर चिखल, दगड येऊन भात खाचरात साचले असल्याने दुबार पेरणीही शक्य झाली नाही. पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून नेला असून, पुरामुळे जिल्ह्यातील २३६९.८५ हेक्टर भातक्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच १४२ हेक्टर फळबागायतींचे नुकसान झाले आहे. एकूण १२ हजार ५०० शेतकऱ्यांचे एक कोटी ७० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

यावर्षी पावसाने दमदार सुरूवात केली होती. तौक्ते वादळानंतर सुरू झालेल्या पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सुरू झाल्याने रोहिणी नक्षत्रावरच पेरण्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्याने रोपे चांगली वाढल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी लागवडीच्या कामांना प्रारंभ केला. पावसाने विश्रांती घेतली तरी पाणथळ, मळेशेती व त्यानंतर पावसाच्या पाण्यावर लवकर निचरा होणाऱ्या वरकस जमिनीवर लागवड करण्यात आली. जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात भात लागवडीची कामे पूर्ण करण्यात आली होती. जिल्ह्यात सरासरी ३,५९१ मिलिमीटर पाऊस पडत असल्याने ६९ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येत असून, १० हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड करण्यात आली आहे. १.४९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ०.६३ हेक्टर क्षेत्रावर गळितधान्य तसेच ०.४७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य लागवड केली आहे.

संततधार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी नदी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये शिरले होते. नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान तर झाले शिवाय भातशेती, फळबागायतीचेही नुकसान झाले आहे. भात लावणीची कामे पूर्ण होताच, पूर आल्याने भातशेती वाहून गेली. पुराच्या पाण्यासह माती, दगड भात खाचरात येऊन साचले. त्यामुळे लागवड केलेल्या शेतीचे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यातील २३६९.८५ भात क्षेत्राचे, १४२ बागायती पुरामुळे बाधित झाल्या आहेत. १२ हजार ५०० शेतकऱ्यांचे एक कोटी ७० लाखांचे नुकसान झाले आहे.

चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यात बाधित क्षेत्र अधिक आहे. पूरग्रस्त भागात तेरा दिवस भातशेती पाण्याखाली राहिल्यामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित शेती (हेक्टर), पुढीलप्रमाणे:

तालुका एकूण क्षेत्र बाधित क्षेत्र

मंडणगड ४८९५ ४.९२

दापोली ७०९२ १४.५०

खेड १०२५१.२४ ८५६.२४

चिपळूण १०२४२.६६ ६७१.३२

गुहागर ५८२८ ५.४१

संगमेश्वर ११५८८.१५ ४७७.९५

रत्नागिरी ७६२४ ११०.६९

लांजा ७२२४ ५१.५४

राजापूर ८६०० १७७.२८

एकूण ७३३९३.०५ २३६९.८५

-----------------

पुरामुळे जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांचे एक कोटी ७० लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर झाली की, शेतकऱ्यांना वितरीत केली जाणार आहे.

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी