शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

रासायनिक सांडपाण्याचा प्रश्नही न सुटणाराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीसमोर केवळ स्फोट व आगीच्या घटनांचीच समस्या नाही, तर येथील ...

सुनील आंब्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीसमोर केवळ स्फोट व आगीच्या घटनांचीच समस्या नाही, तर येथील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्नही अजून निकाली निघालेला नाही. कंपन्यांनी कधी त्यांच्या आवाराबाहेर, कधी नाल्यात, तर कधी खाडीच्या पाण्यात रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले आहे. त्यामुळे जलचर सृष्टीला धक्का बसला आहेच, शिवाय शेती, बागायतीवरही त्याचा परिणाम झाला आहे. रासायनिक द्रव्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्याही अनेकदा उद्भवली आहे. पाण्याचे अनेक स्रोत नष्ट झाले आहेत.

लोटे औद्योगिक वसाहत रासायनिक उद्योगांसाठी म्हणूनच प्रसिद्ध आहे. मात्र, त्यामुळे या वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न आतापर्यंत अनेकवेळा निर्माण झाला आहे. आजवरचे स्फोट आणि अपघात हा जितका चिंतेचा विषय आहे, तेवढाच चिंतेचा विषय म्हणजे रासायनिक सांडपाणी. येथील कंपन्यांनी आपले रासायनिक सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडेच देणे अपेक्षित आहे. तेथे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते हानिकारक होणार नाही, इतक्या स्तरावर आणणे अपेक्षित आहे. कंपनीकडून दिले जाणारे सांडपाणी कसे असावे, त्यात काय घटक असावेत, काय असू नयेत, याबाबत निकष आहेत. मात्र, निकष बाजूला ठेवून काही कंपन्या सांडपाणी थेट सोडून देतात.

आतापर्यंत सांडपाण्यामुळे नदी, नाले, खाडीतील मासे इतर जलचर, जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पाण्यामुळे शेती, फळबागांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भातशेती पूर्ण संपूनच गेली आहे. रासायनिक सांडपाण्याचा खूप मोठा उपद्रव म्हणजे पाण्याचे स्रोत खराब किंवा नष्ट होणे. हा प्रकार परिसरात अनेक ठिकाणी झाला आहे. त्याबाबत अनेकदा ओरडही करण्यात आली आहे. मात्र, संबंधित यंत्रणांनी त्याची फार गांभीर्याने दखल घेतलेली नाही. रासायनिक सांडपाणी नाल्यात जाणे किंवा सोडले जाणे, एमआयडीसीचे चेंबर ओव्हर फ्लो होणे, सीईटीपीमधून सांडपाणी थेट खाडीत जाणे हे प्रकार केवळ पावसाळ्यातच नाही तर वर्षभरात कधीही होतात.

रासायनिक सांडपाण्याप्रमाणेच वायूगळती हाही लोटे परिसराला मिळालेला एक शाप आहे. वायूगळतीमुळे कामगार दगावल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्याचबरोबर नजीकच्या वस्तीला त्याचा त्रास होण्याचा प्रकारही अनेकदा झाला आहे. सुप्रिया लाईफसायन्सेस, एक्सेल इंडस्ट्रीज, युएसव्ही, कन्साई नेरोलॅक, रिव्हरसाईड, गोदरेज ॲग्रोव्हॅट, रॅलिज इंडिया, दीपक नोव्हाकेम, उर्ध्वा केमिकल्स या व अन्य काही कंपन्यांमधून वायूगळतीचे अपघात घडले आहेत.

२००२मध्ये घरडा केमिकल्सच्या वायूगळतीमुळे आवाशी येथील प्राथमिक शाळेतील ४५ मुलांना बाधा झाली होती. मोरॅक्स ही कंपनी वायूगळतीने आग लागून पूर्णपणे बेचिराख झाली होती.

सातत्याने होणाऱ्या वायूगळतीमुळे येथील रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासले आहे. कर्करोग, दमा, टी.बी. यासारखे आजार या भागात वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. स्फोट आणि आगीइतकेच गंभीर परिणाम वायूगळती आणि रासायनिक सांडपाण्यामुळे झाले आहेत.