शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

भातबियाण्याचा पुरवठा सुरु

By admin | Updated: May 25, 2016 23:33 IST

रत्नागिरी जिल्हा : उर्वरित ३ हजार १० क्विंटल बियाणे लवकरच

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ७,०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ४,०१६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित ३ हजार १० क्विंटल भातबियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात एकूण ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यासाठी साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची पेरणी करण्यात येते. गतवर्षी साडेतीन हजार क्विंटल भात बियाण्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र, कमी पर्जन्यवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. अतिरिक्त भातबियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यासाठी वणवण करावी लागली होती. त्यामुळे यावर्षी ही समस्या पुन्हा उद्भवू नये, याकरिता कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यानुसार महाबीजकडून १२४० तर खासगी कंपन्यांकडून २७७६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे.लवकरच रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. काही ठिकाणी धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, याची काळजी घेत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या पावसावर करण्यात येतात. त्यामुळे उर्वरित बियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे. उपलब्ध भातबियाणे खरेदी - विक्री संघ व जिल्हा संघाकडे विक्रीसाठी उपलब्ध असून, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तालुकास्तरावर हे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर कृ षी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत खते व बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी १९ हजार मेट्रिक टन खतास मंजुरी मिळाली आहे. गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे वाटप १०० टक्के करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ५,२६०.६५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी खताचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४५८ खत विक्रेत्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत शासनमान्य खतांची विक्री केली जाणार आहे. विक्री प्रक्रिया तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण ६५,१०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१,५०३ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३,२९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतींसाठीदेखील खते मागविण्यात येतात. साधारणत: आंबा काढणीनंतर खते घालण्याची कामे सुरु होतात. भात लागवडीपूर्वी बागायतींना खते घातल्यास पावसाळ्यात ती चांगली लागू पडतात. त्यामुळे शेतकरी सध्या खते खरेदी करत आहेत. (प्रतिनिधी)