शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

भातबियाण्याचा पुरवठा सुरु

By admin | Updated: May 25, 2016 23:33 IST

रत्नागिरी जिल्हा : उर्वरित ३ हजार १० क्विंटल बियाणे लवकरच

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ७,०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ४,०१६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित ३ हजार १० क्विंटल भातबियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात एकूण ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यासाठी साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची पेरणी करण्यात येते. गतवर्षी साडेतीन हजार क्विंटल भात बियाण्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र, कमी पर्जन्यवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. अतिरिक्त भातबियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यासाठी वणवण करावी लागली होती. त्यामुळे यावर्षी ही समस्या पुन्हा उद्भवू नये, याकरिता कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यानुसार महाबीजकडून १२४० तर खासगी कंपन्यांकडून २७७६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे.लवकरच रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. काही ठिकाणी धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, याची काळजी घेत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या पावसावर करण्यात येतात. त्यामुळे उर्वरित बियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे. उपलब्ध भातबियाणे खरेदी - विक्री संघ व जिल्हा संघाकडे विक्रीसाठी उपलब्ध असून, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तालुकास्तरावर हे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर कृ षी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत खते व बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी १९ हजार मेट्रिक टन खतास मंजुरी मिळाली आहे. गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे वाटप १०० टक्के करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ५,२६०.६५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी खताचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४५८ खत विक्रेत्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत शासनमान्य खतांची विक्री केली जाणार आहे. विक्री प्रक्रिया तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण ६५,१०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१,५०३ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३,२९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतींसाठीदेखील खते मागविण्यात येतात. साधारणत: आंबा काढणीनंतर खते घालण्याची कामे सुरु होतात. भात लागवडीपूर्वी बागायतींना खते घातल्यास पावसाळ्यात ती चांगली लागू पडतात. त्यामुळे शेतकरी सध्या खते खरेदी करत आहेत. (प्रतिनिधी)