शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भातबियाण्याचा पुरवठा सुरु

By admin | Updated: May 25, 2016 23:33 IST

रत्नागिरी जिल्हा : उर्वरित ३ हजार १० क्विंटल बियाणे लवकरच

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ७,०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार ४,०१६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित ३ हजार १० क्विंटल भातबियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यात एकूण ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यासाठी साडेचार हजार क्विंटल भात बियाण्याची पेरणी करण्यात येते. गतवर्षी साडेतीन हजार क्विंटल भात बियाण्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र, कमी पर्जन्यवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. अतिरिक्त भातबियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यासाठी वणवण करावी लागली होती. त्यामुळे यावर्षी ही समस्या पुन्हा उद्भवू नये, याकरिता कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. यानुसार महाबीजकडून १२४० तर खासगी कंपन्यांकडून २७७६ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे.लवकरच रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. काही ठिकाणी धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, याची काळजी घेत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या पावसावर करण्यात येतात. त्यामुळे उर्वरित बियाणे लवकरच उपलब्ध होणार आहे. उपलब्ध भातबियाणे खरेदी - विक्री संघ व जिल्हा संघाकडे विक्रीसाठी उपलब्ध असून, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तालुकास्तरावर हे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर कृ षी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत खते व बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी १९ हजार मेट्रिक टन खतास मंजुरी मिळाली आहे. गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे वाटप १०० टक्के करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ५,२६०.६५ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पावसाळ्यापूर्वी खताचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४५८ खत विक्रेत्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत शासनमान्य खतांची विक्री केली जाणार आहे. विक्री प्रक्रिया तपासणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण ६५,१०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१,५०३ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३,२९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याशिवाय नारळ व अन्य बागायतींसाठीदेखील खते मागविण्यात येतात. साधारणत: आंबा काढणीनंतर खते घालण्याची कामे सुरु होतात. भात लागवडीपूर्वी बागायतींना खते घातल्यास पावसाळ्यात ती चांगली लागू पडतात. त्यामुळे शेतकरी सध्या खते खरेदी करत आहेत. (प्रतिनिधी)