शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माणसातलं देवपण जपायला हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची ...

मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट कोरोनाचा दुसरा टप्पा ऐन शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय झाला आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर्षीही शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट कायम राहणार आहे.

कोकणात प्रत्येक भागात होळीची वेगवेगळी परंपरा आहे. वेगवेगळ्या चाली आहेत. मात्र, त्यामागे सर्वांची भावना एकच आहे. या भावनेची जपणूक करताना आजही परंपरेला फाटा न देता कोकणातील गावा-गावात होळी उत्सव साजरा केला जातो. होळी पौर्णिमेला मध्यरात्री होळी जाळणे, त्यानंतर साजरी केली जाणारी धुळवड आणि बाहेर पडणारी सोंगं... या क्रमानुसार जवळजवळ सर्वच ठिकाणी होळी साजरी केली जाते. मात्र, हे करताना त्या-त्या भागातील पद्धती वेगवेगळ्या आहेत. शिमगोत्सवानिमित्ताने काही ठिकाणी यात्रोत्सव, तर काही धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीचा विचार करता, कोरोनाच्या परिस्थितीत खूपच घातक ठरणार आहे. या परिस्थितीचा काही ग्रामस्थ व देवस्थान कमिटी गांभीर्याने विचार करत आहेत. काहींनी तर शिमगोत्सव यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही गावातून कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सव साजरा करण्याचा विचार होताना दिसत आहे. सहाणेवर पालखी बसवून नारळ-ओट्या वाहण्याचा कार्यक्रम तेथेच करण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. तसेच मोजक्याच लोकांकडून पालखीची ने-आण करण्यात येणार आहे. मात्र, त्याचवेळी काही गावांतून मानपान व रितीरिवाज आडवे येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने काही नियमावली ठरवून दिली असली, तरी काही ठिकाणी शिमगोत्सव म्हणजे गुंतागुंतीचा विषय बनला आहे. त्यातच शिमगोत्सव हा नाजूक व भावनिक विषय असल्याने त्यातून मार्ग काढणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनापेक्षा त्या-त्या गावच्या मानकरी व गावकर (वाडीप्रमुख) मंडळींनीच पुढाकार घेऊन अर्थात मानपान बाजूला ठेवून शिमगोत्सव शांततेत व सुरक्षितपणे होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा शेजारच्या गावात शिमगा होतो, मग आपल्या गावात का नाही, असा विचार पुढे आला, तर वर्षभर जीव धोक्यात घालून, कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचे तसेच प्रशासनाचे कष्ट व्यर्थ जाणार आहेत. यावेळी पालखीतील देवाप्रमाणे समाजातील माणुसकीचा देवही प्रत्येकाला जपावा लागणार आहे. कोरोना हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. तो टाळता येऊ शकत नसला तरी, माणसातील माणूसपण जपत त्यावर मात करता येऊ शकते, हेच शिमगोत्सवानिमित्ताने करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींचीही तितकीच जबाबदारी येते. बऱ्याचदा ‘तुम्ही करा कार्यक्रम, मी आहे तुमच्या पाठीशी’ असे बोलून मतांची गणिते बांधली जातात. चाकरमान्यांना खूश करण्यासाठी तर या गोष्टी शिमगोत्सवात घडतातच. परंतु ही वेळ ‘व्होटबँक’ची नव्हे, तर कोरोनाची आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनीही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.