शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

माणसातलं देवपण जपायला हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची ...

मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट कोरोनाचा दुसरा टप्पा ऐन शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय झाला आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर्षीही शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट कायम राहणार आहे.

कोकणात प्रत्येक भागात होळीची वेगवेगळी परंपरा आहे. वेगवेगळ्या चाली आहेत. मात्र, त्यामागे सर्वांची भावना एकच आहे. या भावनेची जपणूक करताना आजही परंपरेला फाटा न देता कोकणातील गावा-गावात होळी उत्सव साजरा केला जातो. होळी पौर्णिमेला मध्यरात्री होळी जाळणे, त्यानंतर साजरी केली जाणारी धुळवड आणि बाहेर पडणारी सोंगं... या क्रमानुसार जवळजवळ सर्वच ठिकाणी होळी साजरी केली जाते. मात्र, हे करताना त्या-त्या भागातील पद्धती वेगवेगळ्या आहेत. शिमगोत्सवानिमित्ताने काही ठिकाणी यात्रोत्सव, तर काही धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीचा विचार करता, कोरोनाच्या परिस्थितीत खूपच घातक ठरणार आहे. या परिस्थितीचा काही ग्रामस्थ व देवस्थान कमिटी गांभीर्याने विचार करत आहेत. काहींनी तर शिमगोत्सव यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही गावातून कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सव साजरा करण्याचा विचार होताना दिसत आहे. सहाणेवर पालखी बसवून नारळ-ओट्या वाहण्याचा कार्यक्रम तेथेच करण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. तसेच मोजक्याच लोकांकडून पालखीची ने-आण करण्यात येणार आहे. मात्र, त्याचवेळी काही गावांतून मानपान व रितीरिवाज आडवे येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने काही नियमावली ठरवून दिली असली, तरी काही ठिकाणी शिमगोत्सव म्हणजे गुंतागुंतीचा विषय बनला आहे. त्यातच शिमगोत्सव हा नाजूक व भावनिक विषय असल्याने त्यातून मार्ग काढणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनापेक्षा त्या-त्या गावच्या मानकरी व गावकर (वाडीप्रमुख) मंडळींनीच पुढाकार घेऊन अर्थात मानपान बाजूला ठेवून शिमगोत्सव शांततेत व सुरक्षितपणे होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा शेजारच्या गावात शिमगा होतो, मग आपल्या गावात का नाही, असा विचार पुढे आला, तर वर्षभर जीव धोक्यात घालून, कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचे तसेच प्रशासनाचे कष्ट व्यर्थ जाणार आहेत. यावेळी पालखीतील देवाप्रमाणे समाजातील माणुसकीचा देवही प्रत्येकाला जपावा लागणार आहे. कोरोना हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. तो टाळता येऊ शकत नसला तरी, माणसातील माणूसपण जपत त्यावर मात करता येऊ शकते, हेच शिमगोत्सवानिमित्ताने करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींचीही तितकीच जबाबदारी येते. बऱ्याचदा ‘तुम्ही करा कार्यक्रम, मी आहे तुमच्या पाठीशी’ असे बोलून मतांची गणिते बांधली जातात. चाकरमान्यांना खूश करण्यासाठी तर या गोष्टी शिमगोत्सवात घडतातच. परंतु ही वेळ ‘व्होटबँक’ची नव्हे, तर कोरोनाची आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनीही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.