शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

माणसातलं देवपण जपायला हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची ...

मागीलवर्षी शिमगोत्सवाच्या मुखावर कोरोना दाखल झाला आणि अगदी घाईघाईने शिमगोत्सव आटाेपून चाकरमानी मुंबई-पुण्यात निघून गेले होते. मात्र, अजूनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट कोरोनाचा दुसरा टप्पा ऐन शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय झाला आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर्षीही शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट कायम राहणार आहे.

कोकणात प्रत्येक भागात होळीची वेगवेगळी परंपरा आहे. वेगवेगळ्या चाली आहेत. मात्र, त्यामागे सर्वांची भावना एकच आहे. या भावनेची जपणूक करताना आजही परंपरेला फाटा न देता कोकणातील गावा-गावात होळी उत्सव साजरा केला जातो. होळी पौर्णिमेला मध्यरात्री होळी जाळणे, त्यानंतर साजरी केली जाणारी धुळवड आणि बाहेर पडणारी सोंगं... या क्रमानुसार जवळजवळ सर्वच ठिकाणी होळी साजरी केली जाते. मात्र, हे करताना त्या-त्या भागातील पद्धती वेगवेगळ्या आहेत. शिमगोत्सवानिमित्ताने काही ठिकाणी यात्रोत्सव, तर काही धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीचा विचार करता, कोरोनाच्या परिस्थितीत खूपच घातक ठरणार आहे. या परिस्थितीचा काही ग्रामस्थ व देवस्थान कमिटी गांभीर्याने विचार करत आहेत. काहींनी तर शिमगोत्सव यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही गावातून कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सव साजरा करण्याचा विचार होताना दिसत आहे. सहाणेवर पालखी बसवून नारळ-ओट्या वाहण्याचा कार्यक्रम तेथेच करण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. तसेच मोजक्याच लोकांकडून पालखीची ने-आण करण्यात येणार आहे. मात्र, त्याचवेळी काही गावांतून मानपान व रितीरिवाज आडवे येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने काही नियमावली ठरवून दिली असली, तरी काही ठिकाणी शिमगोत्सव म्हणजे गुंतागुंतीचा विषय बनला आहे. त्यातच शिमगोत्सव हा नाजूक व भावनिक विषय असल्याने त्यातून मार्ग काढणे कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनापेक्षा त्या-त्या गावच्या मानकरी व गावकर (वाडीप्रमुख) मंडळींनीच पुढाकार घेऊन अर्थात मानपान बाजूला ठेवून शिमगोत्सव शांततेत व सुरक्षितपणे होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा शेजारच्या गावात शिमगा होतो, मग आपल्या गावात का नाही, असा विचार पुढे आला, तर वर्षभर जीव धोक्यात घालून, कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचे तसेच प्रशासनाचे कष्ट व्यर्थ जाणार आहेत. यावेळी पालखीतील देवाप्रमाणे समाजातील माणुसकीचा देवही प्रत्येकाला जपावा लागणार आहे. कोरोना हा सुद्धा निसर्गाचाच भाग आहे. तो टाळता येऊ शकत नसला तरी, माणसातील माणूसपण जपत त्यावर मात करता येऊ शकते, हेच शिमगोत्सवानिमित्ताने करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींचीही तितकीच जबाबदारी येते. बऱ्याचदा ‘तुम्ही करा कार्यक्रम, मी आहे तुमच्या पाठीशी’ असे बोलून मतांची गणिते बांधली जातात. चाकरमान्यांना खूश करण्यासाठी तर या गोष्टी शिमगोत्सवात घडतातच. परंतु ही वेळ ‘व्होटबँक’ची नव्हे, तर कोरोनाची आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनीही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.