शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

खेड खाडीपट्टा अजून अविकसितच

By admin | Updated: September 2, 2014 00:02 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : करोडो रुपये खर्चूनही पन्हाळजे मार्गाची चाळण

खाडीपट्टा : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग येथील लोकप्रतिनिधींच्या उदासीन कारभारामुळे मागासलेलाच राहिला आहे. करोडो रुपये खर्चूनही पन्हाळजे मार्गाची महसूल खात्याच्या आशीर्वादाने वाळूमाफियांच्या अवजड वाहनांनी चाळण केली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला खाडीपट्टा विभाग पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे होते. मात्र, शासनाच्या तसेच येथील लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे खाडीपट्टा विभाग आजही अविकसित राहिला आहे. जगबुडी नदीच्या काठावर वसलेल्या खाडीपट्ट्याला निसर्गत: सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, हिरवागार परिसर आणि नागमोडी वळणे हे दृश्य पावसाळ्यात विलोभनीय वाटते. तसेच वाहणारी जगबुडी नदी, नारळी, पोफळी व आंब्यांच्या बागा यामुळे निसर्गमय ठिकाण म्हणूनही या परिसराची ओळख आहे. किनाऱ्यावरील वस्त्या आणि परिसर विकासाअभावी दुर्लक्षित राहिला आहे. या परिसराचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल. जगबुडी नदी, दाभोळ खाडी व वाशिष्ठी नद्यांच्या संगमावर बहिरवली येथे मुघलकालीन दिवाबेट आहे. हा ठेवा म्हणजे निसर्गप्रेमी आणि जलपर्यटन प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. दुर्लक्षित असलेला हा खाडीतील भूभाग आणि येथे असलेले ऐतिहासिक अवशेष पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे आहेत. मात्र या भागातील सुविधांकडे शासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे पर्यटकांचे या भागाकडे लक्ष गेलेले दिसत नाही. उन्हाळ्यातही पाण्याची विपुलता असल्याने खाडीकिनारे हिरवेगार असतात. डोळ्यांना सुखावणारी हिरवळ व गारवा यामुळे या ठिकाणी आलेल्या पर्यटकाला पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. सुमारे ४५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या भागात २३ गावांचा समावेश आहे. हा विभाग गुुहागर विधानसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे नेतृत्व कामगारमंत्री भास्कर जाधव करीत आहेत. त्यांनी हा विभाग पर्यटनस्थळ बनवण्याची घोषणा केली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांची घोषणा हवेतच विरली आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडूनही खेड-पन्हाळजे मार्गाची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांना दिवा बेटपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. दिवा बेटापुढे काही अंतरावर उन्हवरे येथे असलेल्या गरम पाण्याचे कुंड व कर्जी येथील कऱ्याचा डोंगर येथील धबधबा व पाण्याचा झरा अशा या दोन किलोमीटरच्या पट्ट्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. येथील नदीकिनारच्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ते, पाणी, दळणवळणाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पर्यटक फिरकतानाही दिसत नाहीत. (वार्ताहर)पर्यटनाच्या विकासाऐवजी या ठिकाणी महसूल विभागाच्या आशीर्वादाने चोरट्या पध्दतीने वाळू उत्खनन होते. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. येथील बेरोजगार युवक व युवतींना पर्यटनातून रोजगार मिळावा, या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.