शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

खेड खाडीपट्टा अजून अविकसितच

By admin | Updated: September 2, 2014 00:02 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : करोडो रुपये खर्चूनही पन्हाळजे मार्गाची चाळण

खाडीपट्टा : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग येथील लोकप्रतिनिधींच्या उदासीन कारभारामुळे मागासलेलाच राहिला आहे. करोडो रुपये खर्चूनही पन्हाळजे मार्गाची महसूल खात्याच्या आशीर्वादाने वाळूमाफियांच्या अवजड वाहनांनी चाळण केली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला खाडीपट्टा विभाग पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे होते. मात्र, शासनाच्या तसेच येथील लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे खाडीपट्टा विभाग आजही अविकसित राहिला आहे. जगबुडी नदीच्या काठावर वसलेल्या खाडीपट्ट्याला निसर्गत: सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, हिरवागार परिसर आणि नागमोडी वळणे हे दृश्य पावसाळ्यात विलोभनीय वाटते. तसेच वाहणारी जगबुडी नदी, नारळी, पोफळी व आंब्यांच्या बागा यामुळे निसर्गमय ठिकाण म्हणूनही या परिसराची ओळख आहे. किनाऱ्यावरील वस्त्या आणि परिसर विकासाअभावी दुर्लक्षित राहिला आहे. या परिसराचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल. जगबुडी नदी, दाभोळ खाडी व वाशिष्ठी नद्यांच्या संगमावर बहिरवली येथे मुघलकालीन दिवाबेट आहे. हा ठेवा म्हणजे निसर्गप्रेमी आणि जलपर्यटन प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. दुर्लक्षित असलेला हा खाडीतील भूभाग आणि येथे असलेले ऐतिहासिक अवशेष पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे आहेत. मात्र या भागातील सुविधांकडे शासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे पर्यटकांचे या भागाकडे लक्ष गेलेले दिसत नाही. उन्हाळ्यातही पाण्याची विपुलता असल्याने खाडीकिनारे हिरवेगार असतात. डोळ्यांना सुखावणारी हिरवळ व गारवा यामुळे या ठिकाणी आलेल्या पर्यटकाला पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. सुमारे ४५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या भागात २३ गावांचा समावेश आहे. हा विभाग गुुहागर विधानसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे नेतृत्व कामगारमंत्री भास्कर जाधव करीत आहेत. त्यांनी हा विभाग पर्यटनस्थळ बनवण्याची घोषणा केली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांची घोषणा हवेतच विरली आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडूनही खेड-पन्हाळजे मार्गाची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांना दिवा बेटपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. दिवा बेटापुढे काही अंतरावर उन्हवरे येथे असलेल्या गरम पाण्याचे कुंड व कर्जी येथील कऱ्याचा डोंगर येथील धबधबा व पाण्याचा झरा अशा या दोन किलोमीटरच्या पट्ट्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. येथील नदीकिनारच्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ते, पाणी, दळणवळणाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पर्यटक फिरकतानाही दिसत नाहीत. (वार्ताहर)पर्यटनाच्या विकासाऐवजी या ठिकाणी महसूल विभागाच्या आशीर्वादाने चोरट्या पध्दतीने वाळू उत्खनन होते. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. येथील बेरोजगार युवक व युवतींना पर्यटनातून रोजगार मिळावा, या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.