शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

आणखी किती वर्षे इमारतीसाठी प्रतीक्षा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

मालकीचे घर असतानाही बेघर होण्याची वेळ अनेकांवर येण्याची कित्येक उदाहरणे देता येतील. अनेकदा तर गुंडशाहीला कंटाळून काही जण घरदार ...

मालकीचे घर असतानाही बेघर होण्याची वेळ अनेकांवर येण्याची कित्येक उदाहरणे देता येतील. अनेकदा तर गुंडशाहीला कंटाळून काही जण घरदार सोडून निघून जातात. ही परिस्थिती आपल्याकडे नसली तरी मोठमोठ्या शहरांमध्ये आहे. एखाद्या अपप्रवृत्तीला एखाद्याला बेघर करून ते ओरबडून घ्यायचे झाल्यास ती व्यक्ती मागचा पुढचा विचार न करता कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत मजल मारते. त्याचबरोबर शासनाकडूनही अनेकदा जमीन अधिग्रहण केल्यानंतर अनेकदा संबंधित जमीन मालकाला त्याचा मोबदला किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करताना कित्येक वर्षे लोटली जातात. अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी शासन दरबारी पायपीट करावी लागते. शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही वेळेवर मोबदला न मिळाल्यास त्याचा फायदा काय, या जन्मात नाही मिळाले तर काय पुढचा जन्म घ्यायचा काय, असे प्रश्न करूनही त्याचे उत्तर मिळत नाही. जमिनी देऊनही त्यांना हलाखीचे दिवस जगावे लागतात. केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवून दिवस काढावे लागतात. स्थलांतरानंतरही जमीनधारकांच्या कुटुंबीयांना किती कष्टमय जीवन जगावे लागते, हे पाहिल्यास त्याचे विदारक चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळेल.

धरणासाठी किंवा अन्य कारणासाठी जमिनी अधिग्रहण केल्यानंतर तेथील जमीन मालकांच्या कुटुंबीयांना सोयीसुविधांपासूनही वंचित राहावे लागते. जमीन अधिग्रहण करताना संबंधित जमीन मालकांसह त्यांच्या कुटुंबीयांचा अगोदरच विचार होणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही. जमिनी अधिग्रहण करताना त्या मालकाला तसेच त्याच्या कुटुंबीयांना पुरेपूर त्याचा फायदा, लाभ मिळेल कसा, याकडेही लक्ष देणे अवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याचे चित्र आहे. शासनदारी एखाद्या विषयाचे घोंगडे भिजत पडले की, त्याचा कधी निर्णय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे घोंगडे भिजत ठेवण्यापेक्षा त्यावर वेळीच उपाययोजना तसेच त्यावर पर्याय शोधून तो विषय वेळीच मार्गी लागल्यास संपूर्ण यंत्रणेचाही वेळ वाया जाणार नाही.

रत्नागिरी पंचायत समिती स्वत:च्या मालकीची इमारत असतानाही ती मोडकळीस आल्याने अन्य ठिकाणी कार्यालय हलविण्यात आले. परिषद भवनाच्या आवारातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीमध्ये सुरू आहे, तर पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे कार्यालय अन्य ठिकाणी वसविण्यात आले आहे. अशी परिस्थिती पंचायत समितीची स्वत:च्या मालकीची जमीन असतानाही शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे झाली आहे. इमारत मोडकळीस आल्याने ती पाडून नवीन इमारत बांधणीची तयारीही जिल्हा परिषदेने केली होती. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. अखेर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे गेली तीन वर्षे पंचायत समितीच्या इमारतीचे काम अडकले आहे. काही लोकप्रतिनिधींनी या इमारतीचे काम आपल्याच कारकीर्दीत मार्गी लागावे, यासाठी प्रशासकीय स्तरावरही प्रयत्न केले. निधी मंजूर असतानाही रत्नागिरी पंचायत समितीची इमारत होऊ शकलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ही इमारत कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पंचायत समितीची स्वत:च्या मालकीची जमीन असतानाही जिल्हा प्रशासनाने ती जमीन ताब्यात घेतली. पंचायत समितीला अन्य ठिकाणी जमीन दिली आहे. मात्र, तीही जमीन पंचायत समितीला वेळेत मिळालेली नाही. त्यामुळे जमीन असतानाही पंचायत समितीवर बेघर असल्यासारखीच परिस्थिती ओढवली आहे.