शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती वर्षे इमारतीसाठी प्रतीक्षा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

मालकीचे घर असतानाही बेघर होण्याची वेळ अनेकांवर येण्याची कित्येक उदाहरणे देता येतील. अनेकदा तर गुंडशाहीला कंटाळून काही जण घरदार ...

मालकीचे घर असतानाही बेघर होण्याची वेळ अनेकांवर येण्याची कित्येक उदाहरणे देता येतील. अनेकदा तर गुंडशाहीला कंटाळून काही जण घरदार सोडून निघून जातात. ही परिस्थिती आपल्याकडे नसली तरी मोठमोठ्या शहरांमध्ये आहे. एखाद्या अपप्रवृत्तीला एखाद्याला बेघर करून ते ओरबडून घ्यायचे झाल्यास ती व्यक्ती मागचा पुढचा विचार न करता कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत मजल मारते. त्याचबरोबर शासनाकडूनही अनेकदा जमीन अधिग्रहण केल्यानंतर अनेकदा संबंधित जमीन मालकाला त्याचा मोबदला किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करताना कित्येक वर्षे लोटली जातात. अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी शासन दरबारी पायपीट करावी लागते. शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही वेळेवर मोबदला न मिळाल्यास त्याचा फायदा काय, या जन्मात नाही मिळाले तर काय पुढचा जन्म घ्यायचा काय, असे प्रश्न करूनही त्याचे उत्तर मिळत नाही. जमिनी देऊनही त्यांना हलाखीचे दिवस जगावे लागतात. केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवून दिवस काढावे लागतात. स्थलांतरानंतरही जमीनधारकांच्या कुटुंबीयांना किती कष्टमय जीवन जगावे लागते, हे पाहिल्यास त्याचे विदारक चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळेल.

धरणासाठी किंवा अन्य कारणासाठी जमिनी अधिग्रहण केल्यानंतर तेथील जमीन मालकांच्या कुटुंबीयांना सोयीसुविधांपासूनही वंचित राहावे लागते. जमीन अधिग्रहण करताना संबंधित जमीन मालकांसह त्यांच्या कुटुंबीयांचा अगोदरच विचार होणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही. जमिनी अधिग्रहण करताना त्या मालकाला तसेच त्याच्या कुटुंबीयांना पुरेपूर त्याचा फायदा, लाभ मिळेल कसा, याकडेही लक्ष देणे अवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याचे चित्र आहे. शासनदारी एखाद्या विषयाचे घोंगडे भिजत पडले की, त्याचा कधी निर्णय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे घोंगडे भिजत ठेवण्यापेक्षा त्यावर वेळीच उपाययोजना तसेच त्यावर पर्याय शोधून तो विषय वेळीच मार्गी लागल्यास संपूर्ण यंत्रणेचाही वेळ वाया जाणार नाही.

रत्नागिरी पंचायत समिती स्वत:च्या मालकीची इमारत असतानाही ती मोडकळीस आल्याने अन्य ठिकाणी कार्यालय हलविण्यात आले. परिषद भवनाच्या आवारातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीमध्ये सुरू आहे, तर पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे कार्यालय अन्य ठिकाणी वसविण्यात आले आहे. अशी परिस्थिती पंचायत समितीची स्वत:च्या मालकीची जमीन असतानाही शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे झाली आहे. इमारत मोडकळीस आल्याने ती पाडून नवीन इमारत बांधणीची तयारीही जिल्हा परिषदेने केली होती. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. अखेर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे गेली तीन वर्षे पंचायत समितीच्या इमारतीचे काम अडकले आहे. काही लोकप्रतिनिधींनी या इमारतीचे काम आपल्याच कारकीर्दीत मार्गी लागावे, यासाठी प्रशासकीय स्तरावरही प्रयत्न केले. निधी मंजूर असतानाही रत्नागिरी पंचायत समितीची इमारत होऊ शकलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून ही इमारत कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पंचायत समितीची स्वत:च्या मालकीची जमीन असतानाही जिल्हा प्रशासनाने ती जमीन ताब्यात घेतली. पंचायत समितीला अन्य ठिकाणी जमीन दिली आहे. मात्र, तीही जमीन पंचायत समितीला वेळेत मिळालेली नाही. त्यामुळे जमीन असतानाही पंचायत समितीवर बेघर असल्यासारखीच परिस्थिती ओढवली आहे.