शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:52 IST

जिल्ह्यातील तब्बल ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

बीड : केवळ ढगाळ वातावरण आणि वादळी वाºयाने होरपळलेल्या पिकांना शनिवारी रात्री झालेल्या संततधार पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून शेतकºयांच्या चेहºयावर हसू फुलले आहे. ग्रामीण भागातील काही छोट्या पुलांवरून पाणी वाहिल्याने गावांचा काही तासांसाठी संपर्क तुटला होता. रविवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी संततधार सुरूच होती. सायंकाळी पावसाने उघडीप दिली.यावर्षी जूनच्या सुरूवातीपासूनच पावसाने ओढ दिली आहे. सुरुवातीला झालेल्या छोट्या-मोठ्या पावसावर शेतकºयांनी खरिपाची पेरणी केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके जोपासली. परंतु केवळ पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने अनेक भागातील पिके सुकू लागली होती. काही ठिकाणी तर शेतकºयांनी दुबार पेरणी केली होती. पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे असायच्या. दिवसभर केवळ ढग यायचे आणि निघून जायचे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.अशा परिस्थितीत सावकारासह बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता त्यांना होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर आज-उद्या पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकºयांना असायची. परंतु हा अंदाज आतापर्यंत कागदावरच राहिला. शनिवारीही मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला होता. यावेळेस मात्र हा अंदाज खरा ठरल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. परळी, बीड, गेवराई आदी तालुक्यात रिपरिप पाऊस झाला होता. कोठेही जोरदार पाऊस झाला नव्हता. परंतु सायंकाळी सात नंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने संततधार हजेरी लावली. हा पाऊस रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुरूच होता. कधी मध्यम तर कधी जोरदार अशा स्वरूपात हा पाऊस होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ वातावरण कायम राहिले.