शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

राष्ट्रीय अस्मितेचा आराेग्यमय उत्सव - स्वतंत्रता दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST

‘स्वतंत्रता’ हे मानवीय मूल्यांच्या ‘जपणुकीचा’ आणि सामूहिक ‘सहजीवनाच्या’ विकासकाचा आरोग्यदायी, उपकारक, प्रेरक आणि उत्साह याचा शाश्वत ठेवा आहे. ‘अस्मिता’ ...

‘स्वतंत्रता’ हे मानवीय मूल्यांच्या ‘जपणुकीचा’ आणि सामूहिक ‘सहजीवनाच्या’ विकासकाचा आरोग्यदायी, उपकारक, प्रेरक आणि उत्साह याचा शाश्वत ठेवा आहे. ‘अस्मिता’ आणि ‘अस्तित्व’ यातून नैसर्गिक ‘कार्यक्षमता’ बहरते. म्हणूनच एखादा कवी स्वातंत्र्याचा जयघोष करण्यासाठी, त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी, त्याच्या अस्तित्वाची ग्वाही जगभर देण्यासाठी अत्यंत मार्मिक गाणं लिहून जातात. म्हणतात... ‘दिल दिया है, जाँ ऽऽ भी देंगे ऽऽ ये वतन तेरे लिये...!’’ हे आणि अशी अनेक गाणी आजच्या दिनी किंवा पूर्व संध्येला किंवा आदल्या दिवशी सर्व माध्यमातून गुंजन करतात. मन रोमांचित करतात. स्फूर्ती देतात. उत्साहाचे उधाण असतं आणि १५ ऑगस्ट स्वतंत्र भारत माता याचा जयघोष करीत स्वतंत्र भारताच्या अस्तित्वाचा ध्वज. ‘विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊँचा रहे हमारा...’ गुंजारव करतात, आकाशात तो दिमाखाने फडकतो. तेव्हा भारतीय मन आणि शरीर एका विशिष्ट रसायनाने मोहरून उठतं. असा एकही भारतीय माणूस, ही अनुभूती अनुभवत नाही, असा या भारत भू वर नाही. हीच तर प्रसन्न आरोग्याचा शिडकाव करते. हा राष्ट्रीय सणाचा उत्कट क्षण, एका अत्युच्च अस्मिता, अस्तित्व, सामूहिकत्व, राष्ट्रीय एकात्मत्व याचं एक पक्क रसायन असतं. हेच आपलं सुरक्षा कवच असतं. सार्वभौमत्व असतं. म्हणूनच जिथे जिथे भारतीय माणूस आहे. तो या उत्सवाची आतुरतेने वाट पहातो. या राष्ट्रीय सणाच्या दिवशी आपल्या अस्तित्वाचे आरोग्य अत्युच्च शिखराच्या आनंदाच्या ठेव्यात अनुभवतो. जगभर या भारतभूच्या या सणानिमित्त शुभेच्छा आणि अभिनंदनाचा राष्ट्रीय सोहळा बहरून उठतो.

हा दिवस संकल्प करण्याचाही असतो. वर्षभर देशासाठी केलेल्या कार्याची उजळणी करण्याचाही असतो. म्हणूनच भारताच्या राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान महोदय आपल्या संकल्पांचा, राष्ट्रहिताच्या गुजगोष्टींचा गुंजारव करतात. वर्षभर त्याचा पाठपुरावा करण्याची ताकद या गुंजारवात असते. अनेकदा ते एकता, यही भारत की विशेषत:, प्रत्येक राज्याच्या राजधानीत मुख्यमंत्री आणि शासकीय कार्यालये, संस्थात्मक कार्यालये, इत्यादी सर्व ठिकाणी आपल्या या अस्तित्वाच्या, अस्मितेच्या ‘झेंडे को सलामी दो...! च्या रोमांचक ऐकोप्याच्या ललकारीने संपूर्ण परिसर, आसमंत, त्यांची मने चैतन्याने भारावून जातात, राष्ट्रीयत्वाने मोहरून उठतात आणि एक सूर, एक लय, एक ताल आणि एकच भारतीय मन याने एकत्वाचे राष्ट्रीय गान सुरू होतं...‘जन-गन-मन-अधिनायक जय हे...!’ आणि प्रत्येक जन मन स्तब्ध होतं. हात सॅल्युटसाठी उठतात. भारत माता की जय असा जयघोष होतो. पुढील आनंददायी कार्यक्रम इत्यादी सुरु होतात. किती-किती आल्हाददायक आहे हे, आरोग्यदायी आहे, हे !

हा आपल्या देशाचा वाढदिवस असतो. २६ जानेवारी हा ही गणतंत्र दिवस असतो. हे दोन राष्ट्रीय सण भारतीय सार्वभौमत्वाचे उत्सव आहेत. या दिवशी शक्यतो कुणीही आंदोलन, धरणे, काळ्या फिती लावून काम करत नाहीत. करू नये. आपण आपल्या आप्त स्वकियांचा वाढदिवस आनंदात साजरा करतो. हा तर राष्ट्रीय अस्मितेचा शुभक्षण आहे. वाढदिवस आहे. कारण हा उत्कट आनंदाच्या क्षणांचा, सार्वविकासक शक्तीच्या प्रेरणेचा असतो. हा दिवस संकल्प, प्रेरणा, उत्साह, कर्तव्य, सामुहिकता, एकता निर्मिती या संस्कारांचा सण असतो. या देशाच्या राष्ट्रीय अस्मितेत, अस्तित्वात सर्वांच्या गरजा भागवण्याचं सामर्थ्य आहे. त्याची आठवण करून घेणे याचाही हा दिवस आहे. म्हणूनच तर ‘जहाँ डाल डाल पर सोने कि चिडिया करती है, बसेरा वो भारत देश है, मेरा’ किंवा ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले, हिरे मोती’ सारखी गाणी आपणास रोमांचित करतात. हेच तर राष्ट्रीय आरोग्याचे गाणं आहे. म्हणून एक सुरात आणि एक दिलाने म्हणतो ‘भारत माता की जय...!’

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी