शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जिल्ह्यात बकरी ईद शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी झाली. कोरोना काळात होणाऱ्या या सणादरम्यान मुस्लिम बांधवांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ...

रत्नागिरी : जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी झाली. कोरोना काळात होणाऱ्या या सणादरम्यान मुस्लिम बांधवांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बकरी ईदीच्या नमाज घरीच अदा केला.

कोरोनामुळे बकरी ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा केला आणि दूरध्वनी तसेच सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने शांतता समितीच्या २८ तसेच मोहल्ला समितीच्या ४७ बैठका घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाकेही तैतान करण्यात आले होते. ईद शांततेत पार पडण्यासाठी मागील १० दिवसात जिल्ह्याच्या अभिलेखावरील ४२ हिस्ट्रीशिटर तसेच ६७ माहितीगार गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.

गेल्या आठवड्यात विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीत दंगा काबू योजनेच्या १७ रंगीत तालीम घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे १९ जुलै संध्याकाळी ७ ते २० जुलै पहाटे ३ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईअंतर्गत जिल्ह्यात एकूण ४३ ठिकाणी नाकाबंदी करून मोटार वाहन कायद्यान्वये १०६ केसेस करण्यात आल्या. सदर मोहिमेत जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, अन्य अधिकारी व अमलदार यांनी सहभाग घेतला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ अधिकारी, ४४६ अमलदार, एस आर पीएफच्या २ तुकडया, २२२ होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. क्यूआरटी आरसीपी तसेच नियंत्रण कक्ष येथे राखीव पोलीस दल सतर्क ठेवण्यात आले होते.