शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यात बकरी ईद शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी झाली. कोरोना काळात होणाऱ्या या सणादरम्यान मुस्लिम बांधवांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ...

रत्नागिरी : जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी झाली. कोरोना काळात होणाऱ्या या सणादरम्यान मुस्लिम बांधवांनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत बकरी ईदीच्या नमाज घरीच अदा केला.

कोरोनामुळे बकरी ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा केला आणि दूरध्वनी तसेच सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस दलाच्यावतीने शांतता समितीच्या २८ तसेच मोहल्ला समितीच्या ४७ बैठका घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी नाकेही तैतान करण्यात आले होते. ईद शांततेत पार पडण्यासाठी मागील १० दिवसात जिल्ह्याच्या अभिलेखावरील ४२ हिस्ट्रीशिटर तसेच ६७ माहितीगार गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.

गेल्या आठवड्यात विविध पोलीस स्थानकाच्या हद्दीत दंगा काबू योजनेच्या १७ रंगीत तालीम घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे १९ जुलै संध्याकाळी ७ ते २० जुलै पहाटे ३ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईअंतर्गत जिल्ह्यात एकूण ४३ ठिकाणी नाकाबंदी करून मोटार वाहन कायद्यान्वये १०६ केसेस करण्यात आल्या. सदर मोहिमेत जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, अन्य अधिकारी व अमलदार यांनी सहभाग घेतला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ अधिकारी, ४४६ अमलदार, एस आर पीएफच्या २ तुकडया, २२२ होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. क्यूआरटी आरसीपी तसेच नियंत्रण कक्ष येथे राखीव पोलीस दल सतर्क ठेवण्यात आले होते.