शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

भुरट्या चोरट्याला अखेर गजाआड केलेच

By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST

चाफेरीतील घटना : पोलिसी खाक्याने चोरटा बोलू लागला...

सुभाष कदम - चिपळूण ,, वाढती महागाई, बेरोजगारी यांमुळे आजकाल छानछोकी जीवन जगण्यासाठी बनवाबनवी, फसवणूक किंवा भुरट्या चोऱ्या करण्यावर तरुणांचा अधिक भर असतो. चोरीच्या माध्यमातून फुकटचे पैसे मिळतात आणि समाजात ‘हायटेक’ जीवन जगता येते. ‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा स्थितीत ताठ मानेने हे तरुण फिरत असतात. गावागावात किंवा लहान शहरात किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या करुन आपला उदरनिर्वाह करणारे महाभाग समाजात कमी नाहीत. गरज म्हणून किंवा स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी चोऱ्या करता करता या दलदलीत तरुण कधी फसतात, याची जाणीव त्यांना होत नाही. ही सवय पुढे अंगवळणी पडते. मौजमजा करताना ही तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी जातात. आपली हौस व व्यसन पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्यांची पावले चोऱ्या करण्याकडे वळतात. अगदी तांब्याच्या तारेपासून खणती, कुदळ, फावडेही चोरुन विकणारी मंडळी ग्रामीण भागात आहेत. काही वेळा ते पकडले जातात. थोड्या शिव्या मिळतात. समाजात छी-थू होते. काही वेळा समाजाची बैठक घेऊन चोरट्याला पाठीशी घातले जाते, तर बहुतांश वेळा समाज अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. या संधीचा सुधारण्यासाठी उपयोग करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्याचा गैरफायदा घेत निर्ढावल्यासारखे अनेक कृत्ये केली जातात. खरे तर एखादी गोष्ट नजरेसमोर आल्यावर ती समाजाने स्पष्टपणे विचारायला हवी. वेळप्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासून संबंधिताला शिक्षा द्यायला हवी किंवा पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे. पण, समाज कठोर भूमिका स्वीकारत नाही. रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी या डोंगराळ दुर्गम भागात अशीच घटना घडली होती. चाफेरी - गवळीवाडी येथे अरविंद यशवंत केदारी हा तरुण आपल्या कुटुंबासह राहात होता. दररोज तो नित्यनियमाने आपल्या कामासाठी घराबाहेर पडत असे. त्याच्या मागे त्याची पत्नीही मुलींना शाळेत सोडून कामावर जात असे. संपूर्ण दिवसभर त्यांचे घर बंद असायचे. गावात कोण कुठे जातो? कोणाचे घर बंद आहे? याची उठाठेव करणारी काही मंडळी असते. त्यांच्या गैरहजेरीत आपले इप्सित साध्य करणारी मंडळी असते. या गावात मराठवाडीत राहणारा सचिन गणपत बैकर हा भुरटा चोर होता. त्याला वाडीतील घराबद्दल खडानखडा माहिती होती. १८ फेब्रुवारी २०१० चा तो दिवस! हा दिवस अरविंद केदारी यांच्या दृष्टीने काळा दिवस होता. नेहमीप्रमाणे केदारी आपली पत्नी सारिका व मुलींसह सकाळी ८.३० वाजता घरातून बाहेर पडले. मुलींना शाळेत सोडून पती - पत्नी कामावर निघून गेले. जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या घराला कुलूप घातले होते. ही संधी सचिन बैकरने साधली. गावात दुपारच्या वेळी नीरव शांतता असते. घरात असलेली वृद्ध मंडळी वामकुक्षी घेत असल्याने गावात सामसूम होती. या संधीचा फायदा सचिनने उठवला. आजूबाजूचा कानोसा घेत त्याने केदारी यांच्या घराच्या जेवणाच्या मागच्या पडवीची कौले काढून तो आत उतरला. त्याने संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. सामानाची उघडझाप केली. सारे घर पालथे घालून सामान अस्ताव्यस्त टाकले. परंतु, त्याच्या हाताला काही लागेना. घरात काहीच नसल्याने त्याची नजर मिळेल ते शोधण्यासाठी सैरभैर झाली होती. अखेर त्याचे लक्ष भिंतीतील कपाटाकडे गेले. त्याने त्या कपाटाची कडी उचकटून त्याचा रापाचापा घेतला. त्याला आतमध्ये एक डबी सापडली. त्या डबीत अडीच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा होत्या. त्याची त्यावेळची किंमत ४ हजार होती. ही रिंगाची डबी घेऊन त्याने तेथून पोबारा केला. नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ वाजता सारिका केदारी आपल्या मुलींना घेऊन शाळेतून घरी परतली. कुलूप उघडून त्यांनी आत प्रवेश केला आणि त्यांनी घरातील परिस्थिती पाहून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्या घरात सामानाची झालेली पडझड आणि विस्कटलेले कपडे पाहून घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. शोधाशोध करताना भिंतीतील कपाटातील सोन्याच्या रिंगा असलेली डबी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सायंकाळी उशिरा केदारी घरी आल्यावर सारिकाने घडला वृत्तांत पतीला सांगितला आणि त्यांच्या मनाला हूरहूर लागली. सायंकाळी केदारी यांनी जयगड पोलीस ठाण्यात घरफोडीची खबर दिली. जयगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी गुन्हा दाखल केला आणि घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा भुरटा चोर असावा, हे पोलिसी नजरेने बरोबर हेरले. त्यादृष्टीने तपास सुरु झाला. सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी हवालदार ए. यु. विचारे यांच्याकडे हा तपास सोपवला. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. या भागात भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. हवालदार विचारे माहिती घेत असताना त्यांच्यासमोर सचिन बैकर याचे नाव पुढे आले. यापूर्वी चोरीचे गुन्हे केल्याने सचिनचे नाव पोलीस रेकॉर्डवर होतेच. त्याला प्रथम संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी त्याची चौकशी सुरु केली. परंतु, बनेल सचिनने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. कदम यांनी परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसी खाक्या दाखवला. तसा सचिन पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. रत्नागिरी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु असताना अनंत गोविंद जाधव, वनिता दिलीप भोजने, सारिका अरविंद केदारी, तपासिक अंमलदार ए. यु. विचारे यांच्या साक्षी सरकारी वकिलांनी घेतल्या. यांच्या महत्त्वपूर्ण साक्षी सरकार पक्षाला सहाय्यभूत ठरल्या. सहायक सरकारी वकील आर. के. साळी यांनी फिर्यादी पक्षातर्फे युक्तिवाद केला. २५ आॅगस्ट २०१० रोजी रत्नागिरी न्यायालयात या चोरीप्रकरणी निकाल जाहीर झाला. आरोपी सचिन याला १ वर्षाची पोलीस कोठडी व ९०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.