शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जीवघेण्या चिरेखाणी जीवनदायी ठरतील

By admin | Updated: July 29, 2016 23:26 IST

जिल्हाधिकारी यांची सतर्कता : महिलेचा बळी गेल्याने चिरेखाणींबाबत अहवाल देण्याचे आदेश

रत्नागिरी : वेळवंड (ता. रत्नागिरी) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याने रिकाम्या चिरेखाणी बंदिस्त करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व मंडल अधिकाऱ्यांना चिरेखाणीसंदर्भातील अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पाणी साठवणुकीचा पर्याय म्हणून या खाणींकडे पाहिले गेले तर या जीवघेण्या खाणी जीवनदायी खाणी ठरतील, एवढी या खाणींची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, प्रशासन वा लोकप्रतिनिधींकडून आजपर्यंत त्यादृष्टीने कधीही लक्ष देण्यात आलेले नाही.गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रिकाम्या चिरेखाणी सध्या पाण्याने तुडुंब भरलेल्या दिसत आहेत. सोमवारी सायंकाळी वेळवंड येथील कमल यशवंत गावडे या महिलेचा शेतीनजीक असणाऱ्या चिरेखाणीवर हातपाय धुण्यासाठी गेली असता बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे चिऱ्यांचे उत्खनन झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या चिरेखाणी बुजवून टाकाव्यात अथवा त्याभोवती कुंपण घालावे, हा नियम चिरेखाण मालकांकडून धुडकावला जात आहे, हे सत्य समोर आले आहे.मात्र, चिरेखाण मालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक भागात अशा रिकाम्या चिरेखाणी उघड्याच असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे या चिरेखाणी उघड्या राहिल्याने पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये भरलेल्या या चिरेखाणींमध्ये जनावरे पडून मृत झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र, त्याची दखल संबंधित चिरेखाण मालकांकडून घेतली जात नसल्याचे दिसून येत असून, प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कडक कारवाई केल्याचे अजूनतरी निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत.सोमवारी वेळवंड येथील महिलेचा अशा पाण्याने भरलेल्या चिरेखाणीमुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात अशा परवानाधारक पण रिकाम्या झालेल्या चिरेखाणी बंदिस्त करण्याचा प्रयत्न किती चिरेखाण मालकांकडून झाला आहे. किती उघड्या आहेत, याचा अहवाल गोळा करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून सर्व चिरेखाणींचा अहवाल लवकरात लवकर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील चिरेखाणी रिकाम्या झाल्यानंतर बुजवून टाकण्यात आल्या आहेत आणि किती चिरेखाणींभोवती कुंपण घालण्यात आले आहे, याची माहिती या अहवालाद्वारे मिळणार आहे. (प्रतिनिधी)चिरेखाणी बुजविणे : कुंपण बंधनकारकखरेतर चिरेखाणीतील उत्खनन पूर्ण झाल्यावर त्या चिरेखाणी बुजवून टाकणे किंवा त्यांच्याभोवती कुंपण घालणे, चिरेखाणमालकांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. ही अट मान्य असलेल्या चिरेखाणी मालकांनाच परवाने दिले जातात. त्याची अमलबजाणवणी होत नाही.रिकाम्या चिरेखाणींचा पाणी साठवण्यासाठी चांगल्या रितीने उपयोग होऊ शकेल. पावसाळ्यातील चार महिने या चिरेखाणीत पाणी साठून राहाते. हे पाणी झिरपत आसपासच्या अनेक विहिरींना जाऊन मिळते. यासाठी चिरेखाणींच्या पाण्यात ‘रेडियो आयसोटोप्स’चे विविध रंग टाकले, तर कुठल्या चिरेखाणीतील पाणी कुठल्या विहिरीत जाते, हे लक्षात येईल. त्यामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. खाणींभोवती बंदिस्त कुंपण घालून त्यांचा उपयोग पावसाळ्यातील जलसंचयासाठी केला तर चिरेखाणी घातक न ठरता उपयुक्त ठरतील. यासाठी संबंधित यंत्रणेने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी.- प्रा. श्रीधर शेंड्ये (सेवानिवृत्त),सदस्य, भारतीय पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान शाखा, रत्नागिरी.