शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पावसाअभावी यंदा माशांचा पाळणा लांबण्याची भीती!

By admin | Updated: July 8, 2014 00:19 IST

मच्छीमारांनाही फटका

मेहरुन नाकाडे : रत्नागिरी, पावसाने पाठ फिरवल्याने केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर मच्छिमारांनाही मोठा फटका बसण्याची भीती आहे. पाऊस कमी झाल्याने यंदा पावसाळ्यातही तापमान वाढले आहे. त्यामुळे मच्छीच्या प्रजननासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. पाऊस उशिराने सुरू झाल्याने हा काळ लांबण्याची शक्यता आहे आणि जर पाऊस कमी झाला तर मत्स्य प्रजननच खूप कमी प्रमाणात होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यंदा उशिराने सुरू झालेल्या पावसाचा परिणाम शेतीवर झाला आहेच, पण त्याचबरोबर मत्स्योत्पादनावरही त्याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. पावसाळा हा माशांचा प्रजननाचा हंगाम असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू होते. जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत समुद्राच्या पाण्याचे तापमान बदलते. यावेळी पृष्ठभागावरचे थंड पाणी तळाशी जाते व तळातील उष्ण पाणी वरती येते. याचदरम्यान माशांसाठी पोषक द्रव्ये पृष्ठभागावर येतात. माशांच्या पिलांसाठी प्लवंग (खाद्य) तयार होतं. पावसाळ्यातील थंडगार वारे, पावसाचे तुषार, जोरदार येणाऱ्या लाटा हे वातावरण माशांच्या प्रजननासाठी पोषक ठरतं. परंतु पाऊस नसल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून उष्णता वाढली आहे. समुद्री भागात तर ही उष्णता जास्तच आहे. उष्णतेमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरही गरम पाणी असतं, रात्रीच्या वेळी तापमान खाली आल्यावर पाणी थंड होतं. त्यामुळे माशांच्या प्रजननकाळासाठी पोषक वातावरण अजूनही निर्माण झालेले नाही. किनारपट्टीवरील कांदळवन, खाजण भागात मासे अंडी घालतात. नदीनाल्याच्या पाण्यातून वाहत येणारे क्षारयुक्त पाणी माशांसाठी खाद्य तयार होते. मात्र, पाऊस जोरदार पडत नसल्यामुळे माशांना व पिलांना आवश्यक ते खाद्य उपलब्ध होत नाही. याचा परिणाम माशांच्या प्रजननावर होणार आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. पाऊस उशिरा झाला, तर प्रजननाचा काळ लांबण्याची शक्यता आहे.नदीपात्रातील पाणीदेखील अद्याप कमी आहे. नदीच्या पात्रातही हीच प्रक्रिया होते. पावसाचे तुषार झेलण्यासाठी मासे उथळपात्रात येतात. मात्र, उष्णतेमुळे पाण्याच्या तापमानात वाढ होते. सध्या माशांमध्ये अंडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. उष्ण तापमानामुळे माशांची अंडी नष्ट होण्याची शक्यता आहे. किंबहुना नदीपात्रातील मासे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.