शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बुरूड व्यवसायासाठी नव्या धोरणाची मागणी

By admin | Updated: August 6, 2015 23:43 IST

उद्योग अडचणीत : औद्योगिकीकरणाच्या युगात जुन्या कला कौशल्यांचा विसर

खेड : औद्योगिकीकरण व आधुनिक युगामध्ये भारतीय संस्कृतीमधील १२ बलुतेदारांपैकी असलेल्या बुरूड व्यवसायाला विविध कारणांनी़़़ आता उतरती कळा लागली आहे. पोट भरण्यासाठी या समाजावर आता लाकडाची मोळी विकण्याची वेळ आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या अवजांरामुळे हा उद्योग अडचणीत आला आहे़ याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा व या व्यवसायाच्या तेजीसाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे़ विशेष म्हणजे याकरिता राज्य सरकारने नवे धोरण जाहीर करण्याची मागणी या समाजाकडून होत आहे़शेती लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहणार की काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे़ भातधान्य साठविण्यासाठी लागणारी टोपली , सुपं, चाळणी, वेतापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तु शेतकरी मोठया प्रमाणात वापरतात़ या सर्व वस्तु बांबूंच्या साहाय्याने तयार करण्यात येत असल्याने बांबूच्या वाढलेल्या दराचा परिणाम या वस्तुंच्या दरावर होत आहे़ बांबूच्या या वस्तुंच्या दराच्या तुलनेत सध्या प्ल्ॉस्टीकच्या वस्तु किंमतीत स्वस्त असल्याने या व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला आहे़ विशेष म्हणजे प्लॅस्टीकच्या वस्तु वापरणे सोयीचे आणि कमी खर्चाचे असल्याने त्यांना बाजारात मागणी आहे़ याउलट बांबूंचे वाढते दर आणि अव्वाच्या सव्वा मजुरीचे दर यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला आहे़ शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याने वेतांच्या वस्तुची मागणी घटली़ तर दुसरीकडे प्लास्टीकचे आक्रमण झाल्याने या वस्तु इतिहास जमा होऊ लागल्या आहेत़बांबु व वेताची किंमती वाढल्या़ वस्तुंच्या किमतीपेक्षा जास्त मेहनत पडत असल्याने सध्या भूक भागविणे कठिण झाले असल्याने बुरूड व्यवसाय धोक्यात आला आहे. काहींनी आपला पारंपारीक व्यवसायही बंद केला आहे़ त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे़. अनेकांना मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे़ तर काहींनी वडीलोपार्जित धंदा म्हणून सुरू ठेवला आहे़ अशातच बांबूंची कमतरता आणि चढत्या किंमती या साऱ्यात बुरूड व्यवसाय आज लोप पावला आहे़ याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा बुरूड समाजाची आहे़ या समाजाला न्याय मिळाल्यास या व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल़खादी ग्राम उद्योगाने या व्यवसायाला संरक्षण देणे आवश्यक आहे़ खादीच्या अनेक योजना या व्यवसायाला पूरक आहेत़ विशेष सवलतीही दिल्या जात आहेत़ मात्र घेतलेल्या कर्जाचा विनीयोग केला जात नसल्याची ओरड आहे़ खादी ग्रामोद्योगकडून कर्ज घेतांना अनेकांना मध्यस्थांची मदत घ्यावी लागत आहे़ अज्ञानामुळे हे अनेकवेळा घडते़ त्याकरिता त्यांना मध्यस्थांना काही पैेसे किंवा टक्केवारीही मोजावी लागल्याचे अनकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे कर्जाची परतफेड करताना या व्यावसायीकांना मोठया अडचणी येतात़ मात्र या व्यावसायाला उत्तेजनासंदर्भात राज्य सरकारने ठोस कृती केल्यास थेट या व्यावसायिकालाच कमी दराने कर्जपुरवठा होऊ शकेल़ आणि यातूनच या आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या वस्तुंच्या बाजारपेठेत बुरूड व्यवसाय टिकू न राहू शकेल. (प्रतिनिधी)