शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरून काढण्यासाठी विमा योजनेचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात ...

हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात आला. मात्र, विमा परतावा प्राप्त होत नसल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापणी केलेले भात पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्याचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा अधिक आहे. ५० टक्के पेक्षा उत्पन्न कमी असल्याचा निकष विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने उंबरठा उत्पन्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत होते. मात्र गेल्या दोन वर्षात पूर, चक्रीवादळ यामुळे पिकाचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी जागृत झाले असून, विमा योजनेकडे कल वाढू लागला आहे. सुरूवातीला दि. १५ जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्यासाठी व एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने लाभार्थींची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ७५४.८१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट

गतवर्षी १३०० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र २५० शेतकऱ्यांना १४ लाखाचा परतावा प्राप्त झाला होता. दि. १५ जुलैपर्यंत १७६८ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, मुदवाढीमुळे संख्या वाढली आहे. भातासाठी ३५११, नागलीसाठी १४० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ४२२ कर्जदार व ३,२२९ बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

---------------------

२१४ शेतकऱ्यांचे पंचनाम्यासाठी अर्ज

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्ह्यातील ३,६५१ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पैकी विमाधारक २१४ शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे अर्ज सादर केले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

---------------------

उत्पन्नाचा निकष आड

जिल्ह्याचे भाताचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा जास्त आहे. नुकसानासाठी ५० टक्केपेक्षा कमी उत्पन्न ग्राह्य धरले जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती. पेरणी ते कापणीपर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात असल्याने विमा योजनेमुळे आर्थिक हातभार लागत आहे. अटी शिथील केल्यामुळेच प्रतिसाद वाढू लागला आहे.

------------------------------

दरवर्षी खरीप तसेच फळपीक विमा योजनेत सहभागी होत दरवर्षी केवळ पैसे भरत राहणे शक्य नाही. हवामानातील बदलामुळे पिकाचे होणारे नुकसान लक्षात घेत विमाधारकांना परतावा प्राप्त होणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील खरीप हंगामातील नुकसान ग्राह्य धरले जात असून, शेतकऱ्यांना परतावा प्राप्त होत आहे. मात्र निकषात सुधारणा होणे आवश्यक असून, सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.

- प्रवीण शिंदे, शेतकरी

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी व विमा संरक्षित क्षेत्र पुढीलप्रमाणे :

तालुका शेतकरी विमा संरक्षित क्षेत्र

मंडणगड ६९८ ११३.६४

दापोली २४१ ४९.४२

खेड २७९ ८९.१७

चिपळूण २६३ ६९.६९

गुहागर २०६ ६०.८७

संगमेश्वर ४७५ ८३.७८

रत्नागिरी ९५४ १५७.४६

लांजा २०० ५१.०४

राजापूर ३३५ ७७.७२

एकूण ३६५१ ७५४.८१