शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरून काढण्यासाठी विमा योजनेचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात ...

हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात आला. मात्र, विमा परतावा प्राप्त होत नसल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापणी केलेले भात पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्याचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा अधिक आहे. ५० टक्के पेक्षा उत्पन्न कमी असल्याचा निकष विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने उंबरठा उत्पन्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत होते. मात्र गेल्या दोन वर्षात पूर, चक्रीवादळ यामुळे पिकाचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी जागृत झाले असून, विमा योजनेकडे कल वाढू लागला आहे. सुरूवातीला दि. १५ जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्यासाठी व एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने लाभार्थींची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ७५४.८१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट

गतवर्षी १३०० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र २५० शेतकऱ्यांना १४ लाखाचा परतावा प्राप्त झाला होता. दि. १५ जुलैपर्यंत १७६८ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, मुदवाढीमुळे संख्या वाढली आहे. भातासाठी ३५११, नागलीसाठी १४० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ४२२ कर्जदार व ३,२२९ बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

---------------------

२१४ शेतकऱ्यांचे पंचनाम्यासाठी अर्ज

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्ह्यातील ३,६५१ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पैकी विमाधारक २१४ शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे अर्ज सादर केले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

---------------------

उत्पन्नाचा निकष आड

जिल्ह्याचे भाताचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा जास्त आहे. नुकसानासाठी ५० टक्केपेक्षा कमी उत्पन्न ग्राह्य धरले जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती. पेरणी ते कापणीपर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात असल्याने विमा योजनेमुळे आर्थिक हातभार लागत आहे. अटी शिथील केल्यामुळेच प्रतिसाद वाढू लागला आहे.

------------------------------

दरवर्षी खरीप तसेच फळपीक विमा योजनेत सहभागी होत दरवर्षी केवळ पैसे भरत राहणे शक्य नाही. हवामानातील बदलामुळे पिकाचे होणारे नुकसान लक्षात घेत विमाधारकांना परतावा प्राप्त होणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील खरीप हंगामातील नुकसान ग्राह्य धरले जात असून, शेतकऱ्यांना परतावा प्राप्त होत आहे. मात्र निकषात सुधारणा होणे आवश्यक असून, सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.

- प्रवीण शिंदे, शेतकरी

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी व विमा संरक्षित क्षेत्र पुढीलप्रमाणे :

तालुका शेतकरी विमा संरक्षित क्षेत्र

मंडणगड ६९८ ११३.६४

दापोली २४१ ४९.४२

खेड २७९ ८९.१७

चिपळूण २६३ ६९.६९

गुहागर २०६ ६०.८७

संगमेश्वर ४७५ ८३.७८

रत्नागिरी ९५४ १५७.४६

लांजा २०० ५१.०४

राजापूर ३३५ ७७.७२

एकूण ३६५१ ७५४.८१