शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

नुकसान भरून काढण्यासाठी विमा योजनेचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST

हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात ...

हवामानावर आधारित पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगामासाठी लागू करण्यात आली. भात व नागली पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात आला. मात्र, विमा परतावा प्राप्त होत नसल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापणी केलेले भात पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्याचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा अधिक आहे. ५० टक्के पेक्षा उत्पन्न कमी असल्याचा निकष विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत असल्याने उंबरठा उत्पन्नामुळे जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत होते. मात्र गेल्या दोन वर्षात पूर, चक्रीवादळ यामुळे पिकाचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी जागृत झाले असून, विमा योजनेकडे कल वाढू लागला आहे. सुरूवातीला दि. १५ जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्यासाठी व एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने लाभार्थींची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ७५४.८१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट

गतवर्षी १३०० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र २५० शेतकऱ्यांना १४ लाखाचा परतावा प्राप्त झाला होता. दि. १५ जुलैपर्यंत १७६८ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, मुदवाढीमुळे संख्या वाढली आहे. भातासाठी ३५११, नागलीसाठी १४० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ४२२ कर्जदार व ३,२२९ बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

---------------------

२१४ शेतकऱ्यांचे पंचनाम्यासाठी अर्ज

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात जिल्ह्यातील ३,६५१ शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. पैकी विमाधारक २१४ शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे अर्ज सादर केले होते. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

---------------------

उत्पन्नाचा निकष आड

जिल्ह्याचे भाताचे उंबरठा उत्पन्न ७० टक्केपेक्षा जास्त आहे. नुकसानासाठी ५० टक्केपेक्षा कमी उत्पन्न ग्राह्य धरले जात असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी कापलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती. पेरणी ते कापणीपर्यंतचे नुकसान ग्राह्य धरले जात असल्याने विमा योजनेमुळे आर्थिक हातभार लागत आहे. अटी शिथील केल्यामुळेच प्रतिसाद वाढू लागला आहे.

------------------------------

दरवर्षी खरीप तसेच फळपीक विमा योजनेत सहभागी होत दरवर्षी केवळ पैसे भरत राहणे शक्य नाही. हवामानातील बदलामुळे पिकाचे होणारे नुकसान लक्षात घेत विमाधारकांना परतावा प्राप्त होणे आवश्यक आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील खरीप हंगामातील नुकसान ग्राह्य धरले जात असून, शेतकऱ्यांना परतावा प्राप्त होत आहे. मात्र निकषात सुधारणा होणे आवश्यक असून, सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे.

- प्रवीण शिंदे, शेतकरी

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी व विमा संरक्षित क्षेत्र पुढीलप्रमाणे :

तालुका शेतकरी विमा संरक्षित क्षेत्र

मंडणगड ६९८ ११३.६४

दापोली २४१ ४९.४२

खेड २७९ ८९.१७

चिपळूण २६३ ६९.६९

गुहागर २०६ ६०.८७

संगमेश्वर ४७५ ८३.७८

रत्नागिरी ९५४ १५७.४६

लांजा २०० ५१.०४

राजापूर ३३५ ७७.७२

एकूण ३६५१ ७५४.८१