शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निर्णायक क्षणी विजय मिळवून दिला...

By admin | Updated: May 27, 2014 01:02 IST

अशोक शिंदे : कोकणने भरभरुन दिले त्याचे देशाने कौतुक केले

संजय सुर्वे -शिरगाव आम्ही ज्या मातीत वावरत आहोत, त्याच मातीत कबड्डीची सुरुवात झाली. बालपणात या खेळाशिवाय दुसरं खेळायला काहीच नव्हतं. चिपळूण तालुक्यातून सह्याद्रीच्या सोबतीला असलेल्या ओवळी (ता. चिपळूण) येथून कबड्डीने झेप घेतली. कबड्डीने त्यांना घडविले. निर्णायक क्षणी देशासाठी विजय मिळविला आणि चिपळूणचे नाव जगात उंचावले. भारतातील क्रीडा विश्वातला व कबड्डीतील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार त्यांना मिळाला. अशोक शिंदे हे त्यांचे नाव. चिपळूणच्या क्रीडाविश्वाशी मार्गदर्शक या नात्याने त्यांचे कार्य सुरु झाले आणि आज राज्यभरात कबड्डीची यशोगाथा त्यांच्या प्रयत्नातून सुरु झाली आहे. प्रत्येकाला अडचणी येतात, प्रत्येकाजवळ तितकाच वेळ आहे. मात्र हे खेळाडू घडतात कसे, असा प्रश्न पडावा, असे शिंदे यांचे कर्तृत्व आहे. शिंदे घराणे पूर्वापार सैन्यदलात व वडील पोलिस दलात. ३० जानेवारी १९६६ चा जन्म. तेव्हापासून चौथीपर्यंत ओवळीत वास्तव्य होते. प्राथमिक शाळेतच कबड्डीचे शिक्षण मिळाले व ओवळीत सुरु झालेला कबड्डीचा इतिहास आज दिग्विजयी होऊन सार्‍या राज्याचे नेतृत्व करीत आहे. गावात होणार्‍या स्पर्धा मग त्या कोणत्याही असो, त्यामध्ये आपण भाग घेतला. संघ मैदानात आला की स्फुरण चढे व नंतर प्रत्यक्षात मैदानावरच प्रवेश केला आणि मैदान हे त्याच्याआयुष्याचं सार बनून गेले. दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना उत्कृ ष्ट खेळाडू हीच ओळख कायम राहिली. ‘वाडीया कॉलेजमध्ये कबड्डीतून व्याप्ती वाढली. जिद्द कायम ठेवली व पुण्यातच माझ्या खेळाला प्रेरणा मिळाली. अमरज्योत क्रीडामंडळातून सुरुवात झाली. मावळंगकर खेळाडूंच्या सहवासात असतानाच शांताराम जाधव हे मला गुरुस्थानी लाभले. तेव्हापासून त्यांच्यासमवेत कबड्डीमध्ये प्रगती करीत गेलो. १९८२ ते ८७ या काळात केलेला सराव महत्वपूर्ण ठरला. महाराष्टÑ संघातून निवड झाल्यानंतर यश मिळाले व भारतीय संघातही निवड झाली. भारत विरुद्ध चीन यांच्यात झालेली स्पर्धा व त्यात भारताकडून मी केलेली पहिली चढाई व पहिला गुणही माझा होता व आम्ही सुवर्णपदक विजेते ठरलो. बिजींगमध्ये भारताचे राष्टÑगीत घुमले व खर्‍या अर्थाने मला जग जिंकल्याचा आनंद झाला’, असे तो सांगतो. ‘एशियन स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे प्रत्यक्ष युद्धसदृश्य परिस्थिती. देशप्रेमी क्रीडा रसिकांच्या पाठींब्यामुळे आक्रमकतेने या स्पर्धेतही देशाला विजय मिळवून दिला व आम्ही २६ गुणांनी जिंकला’, असे तो म्हणाले. कोकणाने कबड्डीला प्रेम दिलं. खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. तेथील वातावरणाशी जुळवून घेतले पाहिजे. मात्र आज जिद्द बाळगून ध्येय ठरवून परिश्रम घेणारे कमी खेळाडू आहेत. आज मैदानावर पहातो तेव्हा खेळाडूंचा फिटनेस दिसत नाही. मला शिकायचं आहे. मी स्वत:च पुढाकार घेणार आहे, ही जिद्द प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे त्याचे मत आहे. गावाकडचे खेळाडू शहरात येताना नव्या वाटा शोधण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मात्र जगात अनेकजण यशस्वी होण्यापूर्वी अडचणीतूनच पुढे गेले आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आयुष्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. शिंदे हे याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. कबड्डी येते. मी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. या भ्रमात रहाता कामा नये. तंत्रशुद्ध प्रशिक्षण, क्षमता वृद्धी यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत. आज अनेक खेळाडू प्रतिक्षेत आहेत. या सर्वांनाच कधी ना कधी राज्यासाठी, देशासाठी खेळायचे आहे. ते संधीच्या शोधात आहेत. आज कोकणात तरुण खेळाडू उदयाला येत आहेत. कबड्डीसाठी हे सुचिन्ह आहे. खेळता खेळता आपणही स्पर्धा भरवाव्यात, ही इच्छा मनात धरुन आपण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, किरण पावसकर यांच्या मदतीने मुंबईमध्ये स्पर्धा भरविल्या. राष्टÑीय स्पर्धा २०११ ला खेळाडूंच्या संयोजन व्यवस्थेतून पार पडला. यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. खेळात विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर स्वकर्तृत्वावर समाधान मानावे लागते. चिपळूण तालुक्यात ओवळीसार ग्रामीण भागात कबड्डीचा श्रीगणेशा करुन पुणे, मुंबई, दिल्ली व परराष्टÑात या खेळाला वैभवाचे दिवस प्राप्त करुन दिले. त्यातूनच आता या क्षेत्रात नवीन कबड्डीपट्टू उतरले आहेत. खेळाडूंना नोकर्‍यांमध्ये स्थान मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. कोकणात अनेक हिरे आहेत. फक्त त्यांच्यामागे आर्थिक पाठबळ व कौतुकाची थाप मारण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणतो.