शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST

सुभाष चव्हाण : समन्वयकांची सभा बोलावण्याचा निर्णय

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने शासनाच्या २० टक्के शेती कर्ज देण्याच्या धोरणाचे स्वागत केले आहे. संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत दुग्ध व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय करु इच्छिणाऱ्या व्यक्तीला दोन संकरित गायी वा म्हशींसाठी १ लाख रुपये कर्ज दोन योग्य जामीन घेऊन देण्यात येणार आहे. ५ संकरित गायी व म्हशींसाठी ३ लाख कर्ज तसेच १० संकरित गायी व म्हशींसाठी ५ लाख रुपये कर्ज योग्य तारण घेऊन विनाविलंब देण्यात येणार आहे.निसर्गातील होणाऱ्या बदलामुळे शेतकरी चिंतातूर आहे. अशा स्थितीत शेतकरी शेतीत टिकून राहायचा असेल तर शेतीसाठी पूरक असलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांना जोडधंदे देणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित सर्व एजन्सीजनी समन्वय साधून कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक शक्ती देणारे व्यवसाय देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेने शासनाच्या धोरणानुसार एकूण ४५ कोटी निधीची तरतूद शेतकऱ्यांच्या शेती विषयक विकासासाठी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायांना प्राधान्य दिले आहे. यासंबंधी चिपळूण नागरी पतसंस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात संस्थेच्या सर्व समन्वयकांचा सहभाग महत्त्वाचा असेल. त्यांनी योग्य व्यक्तींची माहिती संस्थेच्या नजीकच्या शाखेत देऊन गरजूंना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन करावयाचे आहे.यासाठी संस्थेमार्फत २४ जुलै रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली. चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या व्यवसायांना प्राधान्य दिले असल्याने आता चिपळूण नाग९रपीने या साऱ्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून असे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यात यासंबधी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्याला यापुढे स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांमधून फायदा मिळण्यासाठी संस्था प्रयत्नशील. निसर्गातील बदलाचा परिणाम शेतकऱ्याच्या जीवनमानावर होत असल्याने त्याला उपकारक. पर्यायी उत्पन्नासाठी शेतकऱ्याने पशुपालनाकडे वळण्याचा संदेश.समन्वयकांतर्फे घेतले जाताहेत परिश्रम. संस्थेमार्फत २४ जुलै रोजी सभा होणार. शेतीसाठी पूरक योजना महत्त्वाच्या.