शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

अर्जुना धरण प्रकल्पग्रस्तांचे घसे अजून कोरडेच

By admin | Updated: July 16, 2014 22:42 IST

पाटबंधारे प्रकल्प : भरपावसातही टँकर भागवतोय तहान

पाचल : अर्जुना मध्यम प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातील करक व पांगरी खुर्द गावांचे पुनर्वसन करण्यात आले. करक गावातील लोकांना करक गावाच्या पायथ्याशी जागा देऊन पांगरी खुर्द गावाचे पुनर्वसन पाचल गावात अर्धे, तर उर्वरित पांगरी गावाच्या माथ्याशी असे करण्यात आले. राज्यमार्ग १५० व अणुस्कुरा घाटाच्या मध्यावर झालेल्या पुनर्वसनातील लोकांचा पिण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे भरपावसातही या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.राजापूर तालुक्याचा कायापालट करणारा प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाकडे पाहिले जाते तो अर्जुना प्रकल्प पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. ज्या गावाने आपल्या जमिनी दान करुन तालुक्याची तहान भागवण्यासाठी स्वत:चे पुनर्वसित झाले. त्या लोकांना आजघडीला पुनर्वसनस्थळी भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही संपलेली नाही. पाटबंधारे खात्यामार्फत सुरुवातीला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीवरुन सुमारे ५ किलोमीटरची पाईपलाईन तयार करुन पाणी पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ही नळपाणी योजना राबवताना पुनर्वसितांच्या पदरी निराशा आल्याने ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पाटबंधारे खात्याला पांगरी गावाचा पाणी प्रश्न डोकेदुखी ठरत असताना पुन्हा एकदा नवीन प्रयत्न केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा गावातून सुमारे ७ किलोमीटर अंतर पार करुन या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु एका म्हणीप्रमाणे ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’ अशी काहीशी स्थिती पांगरी गावच्या नळपाणी पुरवठा योजनेत होत आहे. अणुस्कुरा गावातून येणाऱ्या पाईपलाईनला वनजमिनीमुळे दिरंगाई होत आहे. पाईपलाईन समोर दिसते. पण, लाईनमधून पाणी येत नाही. जुने पाईप सडून जात आहेत. त्याचीच पुनरावृत्ती या नवीन पाईपलाईनची होणार का, असा प्रश्न केला जात आहे. तालुक्याच्या सोयीसाठी आम्ही आमचे सर्वस्व हरवून पुनर्वसित झालो. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आमची धडपड असताना मदतीला कुणी नाही, अशी भावना पांगरीवासीय व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)