शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

अर्जुना धरण प्रकल्पग्रस्तांचे घसे अजून कोरडेच

By admin | Updated: July 16, 2014 22:42 IST

पाटबंधारे प्रकल्प : भरपावसातही टँकर भागवतोय तहान

पाचल : अर्जुना मध्यम प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातील करक व पांगरी खुर्द गावांचे पुनर्वसन करण्यात आले. करक गावातील लोकांना करक गावाच्या पायथ्याशी जागा देऊन पांगरी खुर्द गावाचे पुनर्वसन पाचल गावात अर्धे, तर उर्वरित पांगरी गावाच्या माथ्याशी असे करण्यात आले. राज्यमार्ग १५० व अणुस्कुरा घाटाच्या मध्यावर झालेल्या पुनर्वसनातील लोकांचा पिण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे भरपावसातही या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.राजापूर तालुक्याचा कायापालट करणारा प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाकडे पाहिले जाते तो अर्जुना प्रकल्प पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. ज्या गावाने आपल्या जमिनी दान करुन तालुक्याची तहान भागवण्यासाठी स्वत:चे पुनर्वसित झाले. त्या लोकांना आजघडीला पुनर्वसनस्थळी भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही संपलेली नाही. पाटबंधारे खात्यामार्फत सुरुवातीला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीवरुन सुमारे ५ किलोमीटरची पाईपलाईन तयार करुन पाणी पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ही नळपाणी योजना राबवताना पुनर्वसितांच्या पदरी निराशा आल्याने ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पाटबंधारे खात्याला पांगरी गावाचा पाणी प्रश्न डोकेदुखी ठरत असताना पुन्हा एकदा नवीन प्रयत्न केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा गावातून सुमारे ७ किलोमीटर अंतर पार करुन या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु एका म्हणीप्रमाणे ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’ अशी काहीशी स्थिती पांगरी गावच्या नळपाणी पुरवठा योजनेत होत आहे. अणुस्कुरा गावातून येणाऱ्या पाईपलाईनला वनजमिनीमुळे दिरंगाई होत आहे. पाईपलाईन समोर दिसते. पण, लाईनमधून पाणी येत नाही. जुने पाईप सडून जात आहेत. त्याचीच पुनरावृत्ती या नवीन पाईपलाईनची होणार का, असा प्रश्न केला जात आहे. तालुक्याच्या सोयीसाठी आम्ही आमचे सर्वस्व हरवून पुनर्वसित झालो. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आमची धडपड असताना मदतीला कुणी नाही, अशी भावना पांगरीवासीय व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)