शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘रक्षक’चे ८ लाख पाण्यात

By admin | Updated: February 15, 2015 00:47 IST

कृषी विभाग : हंगाम संपल्यानंतर पुरवठा झाल्याने संताप

रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत एकात्मिक भात उत्पादक कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला. भात पिकाच्या रक्षणासाठी ७५ हजार ६०० रक्षक सापळे मागविण्यात आले. त्यासाठी ८ लाख ३१ हजार ६०० रूपये खर्च करण्यात आला. या रक्षक सापळ्यांचा पुरवठा भात कापणीनंतर करण्यात आल्याने कृषी कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये सापळे पडून आहेत. रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे २०१४-१५साठी एकात्मिक भात उत्पादन कार्यक्रमातंर्गत भात पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात भात पिकावर प्रामुख्याने, तुडतुडा, लष्करी अळी, खोडकिडा सारख्या किडीचा प्रादूर्भाव प्राधान्याने होत असतो. या किडीवर कीटकनाशकांची फवारणी करून नियंत्रण मिळवले जाते. त्यासाठी रक्षक सापळ्यांची आवश्यकता नाही. शिवाय रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर दऱ्यांमधून वसलेला आहे. त्यामुळे गुंठ्यागुंठ्यांच्या प्लॉटस्मध्ये शेती करण्यात येते. वास्तविक रक्षक सापळ्यांची आवश्यकता नसतानासुध्दा त्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. शिवाय लाखो रूपये खर्च करून मागवण्यात आलेले सापळे अद्याप पडून आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय १८९० प्रात्यक्षिके घेण्यात आली. भाताच्या संरक्षणासाठी फेरोमन, लुर्स, स्टिकी पध्दतीचे सापळे मागविण्यात आले. संबंधित तीन प्रकारच्या एकूण ७५ हजार ६०० सापळ्यांसाठी ८ लाख ३१ हजार ६०० रूपये खर्च करण्यात आला. वास्तविक संबंधित सापळे जून, जुलैमध्ये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आॅक्टोबरमध्ये सापळ्यांचा पुरवठा झाल्याने ते शेतकऱ्यांपर्यत पोहोचू शकलेले नाहीत. वास्तविक रक्षक सापळ्यांची गरज नसताना देखील सापळे मागवण्यात आले. शिवाय उशिरा पुरवठा झाल्याने सापळे पडून आहेत. त्यामुळे संबंधित बाबींवर विनाकारण खर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)