शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

‘रक्षक’चे ८ लाख पाण्यात

By admin | Updated: February 15, 2015 00:47 IST

कृषी विभाग : हंगाम संपल्यानंतर पुरवठा झाल्याने संताप

रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत एकात्मिक भात उत्पादक कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला. भात पिकाच्या रक्षणासाठी ७५ हजार ६०० रक्षक सापळे मागविण्यात आले. त्यासाठी ८ लाख ३१ हजार ६०० रूपये खर्च करण्यात आला. या रक्षक सापळ्यांचा पुरवठा भात कापणीनंतर करण्यात आल्याने कृषी कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये सापळे पडून आहेत. रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे २०१४-१५साठी एकात्मिक भात उत्पादन कार्यक्रमातंर्गत भात पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात भात पिकावर प्रामुख्याने, तुडतुडा, लष्करी अळी, खोडकिडा सारख्या किडीचा प्रादूर्भाव प्राधान्याने होत असतो. या किडीवर कीटकनाशकांची फवारणी करून नियंत्रण मिळवले जाते. त्यासाठी रक्षक सापळ्यांची आवश्यकता नाही. शिवाय रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर दऱ्यांमधून वसलेला आहे. त्यामुळे गुंठ्यागुंठ्यांच्या प्लॉटस्मध्ये शेती करण्यात येते. वास्तविक रक्षक सापळ्यांची आवश्यकता नसतानासुध्दा त्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. शिवाय लाखो रूपये खर्च करून मागवण्यात आलेले सापळे अद्याप पडून आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय १८९० प्रात्यक्षिके घेण्यात आली. भाताच्या संरक्षणासाठी फेरोमन, लुर्स, स्टिकी पध्दतीचे सापळे मागविण्यात आले. संबंधित तीन प्रकारच्या एकूण ७५ हजार ६०० सापळ्यांसाठी ८ लाख ३१ हजार ६०० रूपये खर्च करण्यात आला. वास्तविक संबंधित सापळे जून, जुलैमध्ये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आॅक्टोबरमध्ये सापळ्यांचा पुरवठा झाल्याने ते शेतकऱ्यांपर्यत पोहोचू शकलेले नाहीत. वास्तविक रक्षक सापळ्यांची गरज नसताना देखील सापळे मागवण्यात आले. शिवाय उशिरा पुरवठा झाल्याने सापळे पडून आहेत. त्यामुळे संबंधित बाबींवर विनाकारण खर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)