शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
4
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
5
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
6
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
10
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
11
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
12
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
13
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
14
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
15
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
16
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
17
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
18
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
19
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
20
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

‘जलयुक्त’मुळे ओलमणमध्ये पाणी...

By admin | Updated: October 24, 2016 02:50 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या ओलमण या गावात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे.

कर्जत : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या ओलमण या गावात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. सिमेंट बंधारे आणि मातीच्या बांधामुळे आता त्या भागातील आदिवासी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भाजीपाला करता येणार आहे. कृषी, वन आणि लघु सिंचन विभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे तब्बल ९०.३५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे, त्यामुळे भूजल पातळीत देखील वाढ झाली आहे.रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक समजले जाणारे ओलमण या गावात राहणाऱ्या आदिवासी लोकांना उन्हाळ्यातील चार महिने प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जेमतेम १०० घरांची वस्ती असलेल्या कर्जत तालुक्यातील या गावाची ओळख म्हणजे पहिले आमदार मनोहर पादिर यांचे गाव आहे. शासनाने नळपाणी योजना राबविली आहे, मात्र योजना मोडकळीस आल्याने जानेवारी महिन्यापासून येथील आदिवासींची पाण्यासाठी धावपळ सुरू होते. त्यामुळेच ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू होताच ओलमण गावाचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. पहिल्या वर्षी वन विभागाने जलशोधक खंदक खोदून जमिनीमध्ये पाणी जिरविण्याचे काम केले. काही याठिकाणी मातीचे बांध बांधले गेले, परंतु केवळ एक सिमेंट नाला बांध ओलमण-नांदगाव रस्त्यावर पहिल्या वर्षी झाला होता.२०१५-१६ मध्ये ओलमण परिसरातील डोंगराळ भागात जमिनीमध्ये पाणी जिरविण्याचे काम करण्यासाठी ११ ठिकाणी मातीचे बांध बांधण्यात आले. पेंढरी, तेलंगवाडी या ठिकाणी मातीचे बांध बांधताना तब्बल २५ लाख रु पये खर्चून लघु पाटबंधारे विभागातील लघु सिंचन विभागाने पेंढरी येथील नाल्यावर मोठा सिमेंट बंधारा बांधला. १० दलघमी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या त्या सिमेंट बंधाऱ्यामुळे पेंढरी भागाला पाणीटंचाई भासणार नाही असे चित्र त्या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे निर्माण झाले आहे. दुसरीकडे कृषी विभागामार्फत ४ सिमेंट नालाबांध बांधले जाणार होते. सर्व कामे ई-निविदा पद्धतीने झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी दोन सिमेंट नालाबांध तयार झाले. मात्र तयार झालेले दोन्ही सिमेंट बंधारे हे मागील वर्षी बांधलेल्या बंधाऱ्याच्या वरच्या भागात दोन वेगवेगळ्या नाल्यांवर बांधले आहेत. त्यामुळे आता त्या तीन सिमेंट नालाबांधांची साखळी तयार झाली आहे. त्याचा फायदा त्या खाली असलेल्या ओलमण, तेलंगवाडी आणि पेंढरी येथील ३० हेक्टर जमिनीला होऊ शकतो.कृषी विभागाने निवडलेल्या जागांवर बांधलेल्या बंधाऱ्यांचा फायदा आदिवासी शेतकऱ्यांना होऊ शकणार आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. (वार्ताहर)