शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:40 IST

शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे.

अजय कदम माथेरान : शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे हा उदात्त हेतू माथेरानच्या बाहेरील परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिसत नाही. डोंगरदºया चढून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.माथेरान डोंगराच्या पायथ्याशी हशाच्या पट्टी आणि गारबट या गावांमध्ये ४ थीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी जवळचे शहर म्हणून माथेरानच आहे. त्यामुळे येथील विद्य ार्थी हे पुढील शिक्षणासाठी माथेरानचा डोंगर चढत आहेत. एकूण त्यांना तीन किलोमीटरचा दºयाखोºयांचा डोंगर आणि तिथून तीन किमी माथेरानचा लाल मातीचा रस्ता म्हणजे येऊन जाऊन १२ किलोमीटर हे विद्यार्थी पायपीट करीत आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांच्या मानसिकतेवर व शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीचा सामना करत हे विद्यार्थी जोरदार पाण्याच्या प्रवाहामधून वाट काढत हे शिक्षण घेत आहेत. उंच कडा, नागमोडी वळणे, खोल दरीतील पाऊल ठेवण्याएवढी पाऊल वाट पार करत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने गृहपाठ करण्यासाठी वेळ मिळत नाही.त्यांच्या शिक्षणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे.प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर या शाळेने दिलेल्या माहितीनुसार माथेरानच्या अतिवृष्टीमुळे या पावसाळ्याच्या दिवसात या विद्यार्थ्यांची हजेरी रोडावते त्यामुळे हे विद्यार्थी हुशार असून ही नापास होतात. हे रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी माथेरानमध्ये राहावे जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही.आमच्या गावात ४ थीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी आम्हाला माथेरान जवळ असल्याने आम्ही येथे शिक्षण घेतो. हे शिक्षण घेत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उंच डोंगर चढून माथेरानमध्ये यावे लागते त्यामुळे आमची दमछाक होते. आमची शारीरिक आणि मानसिक स्थिती या खडतर प्रवासामुळे बिघडून जाते. आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, सरकारने जर आम्हा आदिवासी लोकांसाठी माथेरानमध्ये वसतिगृह बांधले तर आमचे पुढील शिक्षण सुखकर होईल.- आकाश नरेश खडके,विद्यार्थी, इयत्ता १० वी