शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:40 IST

शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे.

अजय कदम माथेरान : शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शासनाने प्रत्येक मुलगा, मुलगी ही शिकली पाहिजे या हेतूने विद्यार्थ्यांच्या घराच्या तीन किलोमीटर अंतरावर प्राथमिक शाळा सुरू केली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे हा उदात्त हेतू माथेरानच्या बाहेरील परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिसत नाही. डोंगरदºया चढून या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे.माथेरान डोंगराच्या पायथ्याशी हशाच्या पट्टी आणि गारबट या गावांमध्ये ४ थीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी जवळचे शहर म्हणून माथेरानच आहे. त्यामुळे येथील विद्य ार्थी हे पुढील शिक्षणासाठी माथेरानचा डोंगर चढत आहेत. एकूण त्यांना तीन किलोमीटरचा दºयाखोºयांचा डोंगर आणि तिथून तीन किमी माथेरानचा लाल मातीचा रस्ता म्हणजे येऊन जाऊन १२ किलोमीटर हे विद्यार्थी पायपीट करीत आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांच्या मानसिकतेवर व शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीचा सामना करत हे विद्यार्थी जोरदार पाण्याच्या प्रवाहामधून वाट काढत हे शिक्षण घेत आहेत. उंच कडा, नागमोडी वळणे, खोल दरीतील पाऊल ठेवण्याएवढी पाऊल वाट पार करत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने गृहपाठ करण्यासाठी वेळ मिळत नाही.त्यांच्या शिक्षणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे.प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर या शाळेने दिलेल्या माहितीनुसार माथेरानच्या अतिवृष्टीमुळे या पावसाळ्याच्या दिवसात या विद्यार्थ्यांची हजेरी रोडावते त्यामुळे हे विद्यार्थी हुशार असून ही नापास होतात. हे रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी माथेरानमध्ये राहावे जेणेकरून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही.आमच्या गावात ४ थीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी आम्हाला माथेरान जवळ असल्याने आम्ही येथे शिक्षण घेतो. हे शिक्षण घेत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. उंच डोंगर चढून माथेरानमध्ये यावे लागते त्यामुळे आमची दमछाक होते. आमची शारीरिक आणि मानसिक स्थिती या खडतर प्रवासामुळे बिघडून जाते. आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नाही, सरकारने जर आम्हा आदिवासी लोकांसाठी माथेरानमध्ये वसतिगृह बांधले तर आमचे पुढील शिक्षण सुखकर होईल.- आकाश नरेश खडके,विद्यार्थी, इयत्ता १० वी