शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

टाटा पॉवरची डोकेदुखी वाढणार

By admin | Updated: May 24, 2016 01:54 IST

टाटाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी खारभूमी विभागाचा ना हरकत दाखला न घेता १४९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. ती जमीन संपादनातून वगळावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने

- आविष्कार देसाई, अलिबाग

टाटाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी खारभूमी विभागाचा ना हरकत दाखला न घेता १४९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. ती जमीन संपादनातून वगळावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मागणीने टाटा पॉवर व्यवस्थापनाच्या डोकेदुखीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी सोमवारी आढावा बैठक पार पडली.टाटा पॉवरने एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन केले आहे. टाटा पॉवर ५०३ एकर जागेवर आपला प्रकल्प उभारु शकतात, असा अहवाल ऊर्जा विभागाने २ आॅगस्ट २०११ रोजी दिला आहे, असे असताना टाटा पॉवरने ६९७ एकर अतिरिक्त जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ते संपादन रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबतचा न्यायालयीन लढा सुरु आहे. त्याचप्रमाणे खारभूमी विभागाचा ना हरकत दाखला न घेता सुमारे १४९ हेक्टर जमिनीचे संपादन केले. तेही संपादनातून वगळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी केली. अंबा खोरे डावा कालव्याचे वगळलेल्या क्षेत्रासाठी पाणी देण्याचा निर्णय १२ मे २०१६ च्या बैठकीत झाला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. १९८२ नंतर खारभूमीच्या लाभक्षेत्रात खारे पाणी घुसून शेती नापीक झाली. ते क्षेत्र पुन्हा सुपीक करण्यासाठी १२ मे २०१५ च्या मंत्रालयातील बैठकीत ठरल्याप्रमाणे अंदाजपत्रक अधिकाऱ्यांनी तयार के ले नाही. या सर्व प्रश्नांची कागदपत्रे शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी मागणी केल्यानंतर सादर केल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. संबंधित विभागाचे सर्व महत्वाचे अधिकारी सोमवारच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली, असेही ते म्हणाले. खारभूमी विभागाने खारबंदिस्तीची योग्य निगा न राखल्याने शेतकऱ्यांची तीन हजार एकर शेतजमीन नापीक झाली आहे. नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकरी २६ मे रोजी अलिबागच्या खारभूमी कार्यालयावर धडकणार असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना देण्यात येईल, असे पाणबुडे यांनी सांगितले.‘लोकमत’च्या बातमीचे सामूहिक वाचन‘१० हजार शेतकऱ्यांना हवी नुकसानभरपाई’ या आशयाची बातमी ‘लोकमत’ने २३ मे रोजीच्या अंकात प्रसिध्द केली होती. शेतकऱ्यांचा जिव्हाळ््याचा विषय ‘लोकमत’ने मांडल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी त्या बातमीचे सामूहिक वाचन केले. ‘लोकमत’ने सातत्याने गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी यांचे प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करून प्रश्न सोडविले आहेत. अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ‘लोकमत’ने राहावे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.