शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टाटा पॉवरची डोकेदुखी वाढणार

By admin | Updated: May 24, 2016 01:54 IST

टाटाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी खारभूमी विभागाचा ना हरकत दाखला न घेता १४९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. ती जमीन संपादनातून वगळावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने

- आविष्कार देसाई, अलिबाग

टाटाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी खारभूमी विभागाचा ना हरकत दाखला न घेता १४९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. ती जमीन संपादनातून वगळावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मागणीने टाटा पॉवर व्यवस्थापनाच्या डोकेदुखीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी सोमवारी आढावा बैठक पार पडली.टाटा पॉवरने एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन केले आहे. टाटा पॉवर ५०३ एकर जागेवर आपला प्रकल्प उभारु शकतात, असा अहवाल ऊर्जा विभागाने २ आॅगस्ट २०११ रोजी दिला आहे, असे असताना टाटा पॉवरने ६९७ एकर अतिरिक्त जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ते संपादन रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबतचा न्यायालयीन लढा सुरु आहे. त्याचप्रमाणे खारभूमी विभागाचा ना हरकत दाखला न घेता सुमारे १४९ हेक्टर जमिनीचे संपादन केले. तेही संपादनातून वगळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी केली. अंबा खोरे डावा कालव्याचे वगळलेल्या क्षेत्रासाठी पाणी देण्याचा निर्णय १२ मे २०१६ च्या बैठकीत झाला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. १९८२ नंतर खारभूमीच्या लाभक्षेत्रात खारे पाणी घुसून शेती नापीक झाली. ते क्षेत्र पुन्हा सुपीक करण्यासाठी १२ मे २०१५ च्या मंत्रालयातील बैठकीत ठरल्याप्रमाणे अंदाजपत्रक अधिकाऱ्यांनी तयार के ले नाही. या सर्व प्रश्नांची कागदपत्रे शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी मागणी केल्यानंतर सादर केल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. संबंधित विभागाचे सर्व महत्वाचे अधिकारी सोमवारच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली, असेही ते म्हणाले. खारभूमी विभागाने खारबंदिस्तीची योग्य निगा न राखल्याने शेतकऱ्यांची तीन हजार एकर शेतजमीन नापीक झाली आहे. नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकरी २६ मे रोजी अलिबागच्या खारभूमी कार्यालयावर धडकणार असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना देण्यात येईल, असे पाणबुडे यांनी सांगितले.‘लोकमत’च्या बातमीचे सामूहिक वाचन‘१० हजार शेतकऱ्यांना हवी नुकसानभरपाई’ या आशयाची बातमी ‘लोकमत’ने २३ मे रोजीच्या अंकात प्रसिध्द केली होती. शेतकऱ्यांचा जिव्हाळ््याचा विषय ‘लोकमत’ने मांडल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी त्या बातमीचे सामूहिक वाचन केले. ‘लोकमत’ने सातत्याने गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी यांचे प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करून प्रश्न सोडविले आहेत. अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ‘लोकमत’ने राहावे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.