शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

सरपंचाने काढला ग्रामसभेतून पळ

By admin | Updated: August 26, 2015 00:10 IST

ग्रामसभेत जनतेच्या विविध प्रश्नांवर अर्थातच विविध समस्यांवर चर्चा, उपाययोजना होणे अपेक्षित असताना ग्रामसभेत जनतेच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याऐवजी कळंबुसरे गावच्या

उरण : ग्रामसभेत जनतेच्या विविध प्रश्नांवर अर्थातच विविध समस्यांवर चर्चा, उपाययोजना होणे अपेक्षित असताना ग्रामसभेत जनतेच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याऐवजी कळंबुसरे गावच्या सरपंचाने प्रश्नांच्या भडिमाराच्या भीतीपोटी चक्क ग्रामसभेतूनच पळ काढला. या पळपुट्या सरपंचाच्या विरोधात कळंबुसरे ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.कळंबुसरे हे उरण पूर्व विभागातील गाव आहे. रविवारी ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. गावातील प्रश्न मांडण्यासाठी या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात पाणी, रस्ते, वीज, ग्राम स्वच्छता, शाळेच्या नव्या इमारतीचा प्रश्न असे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत सरपंच सुशील राऊत यांनी एकाही प्रश्नाला न्याय दिला नसल्याचा जनतेचा आरोप आहे. गावातील ग्रामस्थांकडून घरपट्टी नियमित वसूल करणारी ग्रामपंचायत या विभागातील कंपन्यांकडून मालमत्ता कर का वसूल करीत नाही, असा सवाल ग्रामसभेत उपस्थित केला आहे. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित ग्रामस्थ संतप्त झाले. घरपट्टी थकविली म्हणून ग्रामस्थांची अडवणूक करणारा सरपंच मालमत्ता कर थकविणाऱ्या कंपनींवर जप्तीची कारवाई करण्याऐवजी कंपन्यांची दलाली करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांनी ग्रामसभेत विविध प्रश्नांचा भडिमार केला. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता न आल्याने सरपंच सुशील राऊत यांनी ग्रामसभा अर्धवट सोडून पळ काढला. या निष्क्रीय सरपंचाचा कारभार पुढे चालू देणार नाही, असा इशारा भाजपाच्या संजय म्हात्रे यांनी दिला आहे. (वार्ताहर)