शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

बनावट खतांची विक्री, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 04:36 IST

राज्यात काही ठिकाणी मूळ सेंद्रिय खताची नक्कल करून खताच्या बॅगवर चुकीचा मजकूर छापून ते खत विक्र ी करीत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. डी.ए.पी. व पोटॅश या मूळ खताच्या गोणीची नक्कल करून आॅर्गनिक डी.ए.पी. किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट नावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अलिबाग -  राज्यात काही ठिकाणी मूळ सेंद्रिय खताची नक्कल करून खताच्या बॅगवर चुकीचा मजकूर छापून ते खत विक्र ी करीत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. डी.ए.पी. व पोटॅश या मूळ खताच्या गोणीची नक्कल करून आॅर्गनिक डी.ए.पी. किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट नावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची खत विक्री ही खत नियंत्रण आदेश १९८५ या कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे. या प्रकरणी कृषी विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी असा प्रकार निदर्शनास येत आहे त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.या बनावट खतविक्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी डी.ए.पी व पालाशयुक्त खते खरेदी करताना दक्षता घ्यावी. बॅगेवरील मजकुराची शहानिशा करावी. दिशाभूल करून विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ जवळच्या पंचायत समिती, कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.केंद्र आणि राज्य शासनाने मंजूर केलेल्या खताच्या ग्रेडसारखी दिसणारी, अनुकरण, नक्कल केलेल्या खतांची खरेदी करण्यात येऊ नये. खताच्या बॅगवर त्यामध्ये असणारे रासायनिक घटक, मूलद्रव्याचे प्रमाण नमूद केलेले असणे बंधनकारक आहे. त्याची खातरजमा करण्यात यावी. उदा. डी.ए.पी. रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण १८ टक्के व स्फुरदचे प्रमाण ४६ टक्के असेल, तसा मजकूर बॅगवर छापलेला असल्याची खात्री करावी. खताच्या बॅगवर लिहिलेला मजकूर नीट वाचून, खात्री करून विक्रेत्यांशी चर्चा करून शंका समाधान झाल्यानंतरच खत खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.१ हजार १३१ निरीक्षक नियुक्त१राज्यात कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित असून या कामासाठी राज्यात ११३१ खते, बियाणे, कीटकनाशके निरीक्षकांची नेमणूक केली आहे.२सद्यस्थितीत खरीप हंगामास सुरुवात झाली असून पिकासाठी रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्र ी केंद्रातून व केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाºया अधिकृत ग्रेडच्या खतखरेदीस प्राधान्य द्यावे.३कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्र ी होत असलेल्या ठिकाणाहून, दूरध्वनीवरून संपर्क साधून विक्र ी करणारे विक्रे ते, शेतकºयांना घरपोच खत देणारे अनधिकृत विक्रे ते यांच्याकडून खतखरेदी करू नये. खरेदी केलेल्या खताची रीतसर पावती घेण्यात यावी व ती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.४खतात भेसळ असल्याची शंका दूर करण्यासाठी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी, अशा सूचना कृषी विभागाने शेतकºयांना दिल्या आहेत.

टॅग्स :newsबातम्या