शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईचा कृती आराखडा मंजूर

By admin | Updated: March 9, 2017 02:32 IST

रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी एक हजार ८१३ मिलीमीटर पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल एक कोटी

- आविष्कार देसाई, अलिबाग

रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी एक हजार ८१३ मिलीमीटर पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल एक कोटी ६५ लाख रुपयांनी घट झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याने तो भूगर्भात मुरण्याचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य ठिकाणी पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यावर मात करण्यासाठी सहा कोटी २५ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.२०१६-१७ या कालावधीमध्ये तीन हजार ७७७ मि.मी. पाऊस पडला, तर २०१५ मध्ये पर्जन्यमान सरासरी एक हजार ९६४ मि.मी. होते. याची तुलना केली असता जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि खालापूर हे तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये पर्जन्यमानामध्ये १० ते ५५ टक्क्यांची वाढ दिसून येते. अलिबाग, पेण, उरण, मुरुड, माणगाव, रोहे, सुधागड-पाली, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, पनवेल, कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये दोन ते १० टक्क्यांची घट दिसून येते. जिल्ह्यामध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने पावसाने सुखद धक्का दिला; परंतु भूगर्भामध्ये पाणी मुरण्याला कमी कालावधी मिळाला. पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरींच्या पातळीमध्ये पर्जन्यमान जास्त होऊन देखील विशेष वाढ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे डोंगराळ भाग, उतार परिसराचा भाग, जमिनीत असणाऱ्या खडकांचा भाग आणि खारेपाट विभागात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता प्रशासनाने गृहीत धरली आहे. यासाठी सहा कोटी २५ लाख रुपयांचा टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर १६ ते डिसेंबर १६ या कालावधीत पाणीटंचाई भासणार नसल्याचे प्रशासनाने गृहीत धरले होते. या कालावधी पाणीटंचाई न भासल्याने खर्चाची तरतूद करण्यात आलेली नाही.जानेवारी १७ ते मार्च १७ या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने दोन कोटी ५० लाख रुपये, तर एप्रिल १७ ते जून १७ या तिसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील ३६७ गावे एक हजार १०९ वाड्या अशा एकूण एक हजार ४७६ ठिकाणी टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा तसेच विंधण विहिरींसाठी सहा कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, पनवेल, पेण तालुक्यात टंचाई जास्त प्रमाणात जाणवणार आहे.गेल्या वर्षी कमी पाऊसगेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने टंचाई कृती आराखडा हा सात कोटी ८८ लाख रुपयांचा होता. २९२ गावे, ९२६ वाड्या अशा एकूण एक हजार २९८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. १४० गावे, ४३७ वाड्यांमध्ये ५७७ विंधण विहिरी खोदण्यात आल्या होत्या, तर नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्तीसाठी एक गाव, ६९ वाड्या अशा एकूण ७०, तर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी एका वाडीचा समावेश होता. अशा एकत्रित ४३३ गावे, एक हजार ४४३ वाड्यांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आला होता. पैकी ७२ गावे आणि ३६४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी पाच कोटी ७ लाख रुपयांचा खर्च आला होता. त्याचप्रमाणे ४३ गावे आणि १३४ वाड्यांमध्ये १७७ विंधण विहिरी खोदण्यात आल्या. त्यासाठी अंदाजित सुमारे चार कोटी रुपये प्रशासनाने खर्ची टाकले आहेत.आॅक्टोबर १६ ते डिसेंबर १६ पहिला टप्पाखर्चाची तरतूद नाहीजानेवारी १७ ते मार्च १७ दुसरा टप्पा०२ कोटी ५० लाख रुपयेएप्रिल १७ ते जून १७ तिसऱ्या टप्पा०३ कोटी ७५ लाख रुपये - जिल्ह्यातील ३६७ गावे एक हजार १०९ वाड्या अशा एकूण एक हजार ४७६ ठिकाणी टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा तसेच विंधण विहिरींसाठी सहा कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, पनवेल, पेण तालुक्यांत टंचाई जास्त प्रमाणात जाणवणार आहे.