शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अकृषिक’चे अधिकार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना; गरिबांचे घरांचे स्वप्न भंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:48 IST

अलिबागला ये-जा करावी लागणार

- गिरीश गोरेगावकर माणगाव : जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्याकरिता आणि त्याच्या कार्यप्रणालीमध्ये सुलभता आणण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ मध्ये सुधारणा करून गावठाणपासून २०० मी. हद्दीतील सर्व जागा गावठाण क्षेत्रात समाविष्ट करण्याचे अधिकार तलाठ्यास देण्यात आले. त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा फायदा झाला. मात्र, १८ जानेवारीच्या परिपत्रकानुसार अकृषिक करण्याचे हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. या परिपत्रकानुसार रायगड जिल्ह्यातील हजारो नागरिकांना आता पुन्हा एकदा अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पायपीट करावी लागणार आहे.

अलिबागला वारंवार फे ºया माराव्या लागणार असल्याने वेळ आणि पैसा खर्च होणार असल्यानेहे आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार यांना स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या परिपत्रकाच्या दिनांकापासून ४२अ, ४२ब, ४२क व ४२ड नुसार कार्यवाही न करता, क्षेत्रीय स्तरावर कलम ४२अ, ४२ब, ४२क, ४२ड नुसार आदेश निर्गमित केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास किंवा ते प्रमाणित केलेले नसल्यास संबंधितांनी कार्यवाही करू नये. नियमान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यास संबंधितांनी दक्षता घ्यावी, हा आदेश व कार्यवाही सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत, असे आदेश रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते.

यापूर्वी २०० मी.च्या आत घर बांधावयाचे असेल तर स्थानिक पातळीवर अकृषिक न करता, परवानग्या दिल्या होत्या. आता मात्र जिल्हाधिकाºयांकडून परवानगी घेणे बंधनकारक झाले असल्याने अकृषिक करीत जिल्हाधिकाºयांकडे धावाधाव करावी लागणार आहे. माणगावात अकृषिक न करणाºयांना त्यांचे बांधकाम अनधिकृत व बेकायदेशीर ठरविण्यात आले असून, ११६ जणांना ही बांधकामे नियमित करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे माणगावमध्ये खळबळ उडाली होती. सध्या अनधिकृत बांधकामाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

पूर्वी तहसीलदार परवानगी देत होते. मात्र, त्यामध्ये अनेक वेळा त्रुटी राहत असल्याने हा निर्णय बदलण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केलेले आहे. अकृषिक जमीन करताना गरिबांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जमीन अकृषिक करण्यासाठी दलाल लाखो रुपये घेत असतात. कार्यालयातील अधिकारी प्रत्येक कागदपत्रासाठी पैशांची मागणी करीत असतात.

१४ मार्च २०१८ पासून स्थानिक स्तरावर अकृषिक परवानग्या मिळत होत्या. आता मात्र पूर्वीसारखेच जिल्हाधिकारी यांच्याकडून अकृषिक करण्यास परवानगी घ्यावी लागणार आहे. अनेक जण कर्ज काढून प्रसंगी पोटाला चिमटे काढून घर बांधण्याचे स्वप्न बघतात. आता मात्र गरिबांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिक स्थानिक पातळीवर अकृषिक (बिनशेती) होण्यासाठी मागणी करीत आहेत.

अकृ षिकसाठी१५ परवानग्यांची गरज

रायगड जिल्ह्यात गोरगरिबांना आणि सामान्य माणसाला घर बांधण्याचे स्वप्न पाहायचे असेल तर अनेक अडचणींच्या अग्निदिव्यातून यापुढे जावे लागणार आहे. पूर्वी एखाद्याने गावठाण वगळता २०० मी.च्या आत घर बांधले असेल तर तलाठी किंवा नायब तहसीलदार दरवर्षी दंड म्हणून ५०० ते ५००० रुपये महसूल जमा करीत होता.

मात्र, आता त्यांना हे अधिकार राहिले नाहीत. अकृषिकसाठी कमीत कमी १५ परवानग्या व आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता लागते. त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा, ८अ चा उतारा, जमिनीचे सर्व मूळ फेरफार, संबंधित विभागाचा झोन दाखला, वास्तुविशारदच्या बांधकाम नकाशाच्या प्रती, मोजणी नकाशा, जमीनमालक संमतीपत्र किंवा कूळ अखत्यारपत्र, नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आदी आवश्यक कागदपत्रे आहेत. अशा जाचक अटी व नियम असल्याने सामान्य माणूस घर बांधण्याचे स्वप्न पाहू शकणार नाही.

मौजे चिंचवली येथील माझी जागा बिनशेती करण्यासाठी दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. ही जागा ४२ ड नुसार बिनशेती होण्यासाठी गावठाणपासून २०० मीटरच्या आत असूनसुद्धा अद्याप बिनशेती झाली नाही. बिनशेती होईल म्हणून प्रथम सांगितले होते. मात्र, जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या परिपत्रकानुसार आता माझी जागा बिनशेती आमच्या कार्यालयात होणार नसल्याचे तहसीलदार माणगाव कार्यालयाकडून कळविले आहे.- किरण तांबडे, चिंचवली

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र